Headlines

जिल्ह्यात गतवर्षी 5.95 लाख हेक्टर‎पेरणी तर यंदा 2.22 लाख हेक्टरवर:समाधानकारक पावसाअभावी 67 टक्के जमीन अद्याप पेरणीविना‎

जिल्ह्यात पावसाच्या लहरीपणामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतीचे गणित बिघडले आहे. गतवर्षी मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व दमदार पावसामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यापासून पेरण्यांना वेग आला होता. गेल्या वर्षी जूनअखेर जिल्ह्यात ५ लाख ९५ हजार ६२० हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली होती. मात्र, यंदा जून महिना संपून जुलैचा पहिला आठवडा सुरू झाला तरी अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेतच आहेत….

Read More

पब, बार रात्री 1.30 वाजता सक्तीने बंद:नियमांचे उल्लंघन केल्यास आता थेट गुन्हा, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्तांची नियमावली

शहरातील बिअर बार रात्री दीड वाजता बंद होण्याचा नियम असला तरी अनेक बार शटर डाऊन करून पहाटेपर्यंत सुरू असायचे. रात्रभर चालणाऱ्या या धिंगाण्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाली होती. अलीकडेच जालना रोडवरील एका व्यावसायिकाची हत्या आणि सिडको एन-७ मधील सुरभी बार बाहेर पहाटे ४ वाजता दोन गटांत झालेला राड्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या…

Read More

सायबरमाफियांच्या जाळ्यात अडकलेल्या नाशिकच्या तरुणाची आपबिती:आम्ही इथून जिवंत बाहेर पडू अशी आशा आता मावळली आहे

नोकरीच्या आमिषाने थायलंडला गेलेल्या महाराष्ट्रातील, विशेषतः नाशिकमधील ८ आणि बीडमधील १७ तरुणांना म्यानमार सीमेवरील ‘गोल्डन ट्रँगल’ भागात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरुणांना तिथे १६ ते १८ तास ऑनलाइन फसवणुकीचे काम करण्यास भाग पाडले जात आहे.अडकलेल्या एका तरुणाने ‘दिव्य मराठी’शी संवाद साधताना सांगितले की, आम्हाला इथे सायबर फ्रॉड करण्याचा प्रचंड दबाव आहे,…

Read More

प्रगतिशील शेतकरी:अवघ्या 20 गुंठ्यात वांग्यातून 9 महिन्यांत साडेचार लाख उत्पन्न, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा 900 वांग्याच्या रोपांची लागवड करत प्रयोग

बदलत्या हवामानामुळे पारंपरिक शेतीचे गणित दिवसेंदिवस कठीण होत असताना लातूर जिल्ह्यातील जेवळी येथील प्रगतिशील शेतकरी अमन गंपले यांनी अवघ्या २० गुंठ्यांत ९०० वांग्याच्या रोपांची लागवड करून केवळ नऊ महिन्यांत सुमारे ६ लाख रुपयांचे उत्पादन मिळते. यात दीड लाखांचा खर्च वगळला तर साडेचार लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळवले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, नियोजन आणि सातत्यपूर्ण व्यवस्थापनाच्या बळावर त्यांनी…

Read More

जहागीरपूर संस्थानच्या संचालकांनी भक्ताच्या अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडले:ओमप्रकाश परतानी यांनी माणुसकीचे अनोखे उदाहरण ठेवले

जहागीरपूर (ता. तिवसा) येथील श्री महारुद्र मारुती संस्थानचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश परतानी यांनी एका वृद्ध महिला भक्ताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे आणि आध्यात्मिक निष्ठेचे अनोखे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. नातेवाईकांच्या अनुपस्थितीत परतानी यांनी ही जबाबदारी स्वीकारली. संबंधित ८७ वर्षीय महिला भक्त अनेक वर्षांपासून श्री महारुद्र मारुती संस्थानच्या नित्य भक्त होत्या. त्या नियमितपणे अमरावतीहून जहागीरपूर येथे…

Read More

एकाच वेळी 24 आध्यात्मिक पुस्तकांचे प्रकाशन, नवा विक्रम:ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक प्र. के. घाणेकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

पुणे येथे प्रसाद प्रकाशन आणि अनाहत प्रकाशनच्या वतीने एकाच वेळी २४ आध्यात्मिक पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यात ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक प्र. के. घाणेकर यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरणही झाले. या कार्यक्रमाचे आयोजन नवी पेठ येथील एस. एम. जोशी सभागृहात करण्यात आले होते. ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांना कै. मनोहर य. जोशी स्मृती गौरव…

Read More

मुधोळकर पेठ मनपा उद्यानाची दूरवस्था:व्यायामाचे साहित्य तुटले, गवत वाढले; नागरिकांमध्ये संताप

अमरावती शहरातील मुधोळकर पेठ येथील महानगरपालिकेचे उद्यान सध्या दूरवस्थेत असून देखभालीअभावी ते अस्वच्छ झाले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. उद्यानातील व्यायामाचे साहित्य तुटले असून, वाढलेल्या गवतामुळे पायी फिरणेही कठीण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी नागरिकांच्या आरोग्यासाठी बसवण्यात आलेले ओपन जीमचे साहित्य मोठ्या प्रमाणात तुटले आहे. उद्यानात ठिकठिकाणी गवत आणि झुडपे वाढली असून,…

Read More

दोन पोलिस शिपायांविरुद्ध खंडणीचा गुन्हा:बुधवार पेठेत तरुणांना धमकावून पैसे उकळल्याचा आरोप

पुणे शहरातील फरासखाना पोलिस ठाण्यातील दोन पोलिस शिपायांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार पेठेत तीन तरुणांना गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून दोन हजार रुपये उकळल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई विवेक पाटील आणि राहुल दाभाडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत एका २४ वर्षीय तरुणाने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली…

Read More

आंतरजिल्हा दूध भेसळ रॅकेट उद्ध्वस्त:13 जणांना अटक; पुणे LCB-FDA ची 5 जिल्ह्यांत कारवाई, 3 कोटींचा मुद्देमाल जप्त

पुणे ग्रामीण पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने (FDA) संयुक्त कारवाई करत एका मोठ्या आंतरजिल्हा दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत १३ जणांना अटक करण्यात आली असून, ५ जिल्ह्यांमध्ये छापे टाकून सुमारे ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर हे या रॅकेटचे मुख्य केंद्र असल्याचे समोर आले आहे. पुणे…

Read More

राजेश भुयार अमरावतीचे नवे जिल्हा उपनिबंधक:शंकर कुंभार यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदावर नियुक्ती

राजेश विनायकराव भुयार यांनी अमरावती येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (डीडीआर) म्हणून पदभार स्वीकारला आहे. शंकर कुंभार यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने नुकतीच काही अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली होती, ज्यात भुयार यांचाही समावेश होता. त्यांच्या कामाची दखल घेऊन सहकार, वस्त्रोद्योग व पणन विभागाने त्यांना डीडीआरची महत्त्वपूर्ण…

Read More