Headlines

आरोग्य विभागाच्या पदभरतीमधील अनियमिततेवरून पालकमंत्री झिरवाळांची नाराजी:दोषींवर कारवाईचे दिले आदेश, जिल्हा नियोजन समितीची बैठक

हिंगोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी पदभरतीमधील दिरंगाई व अनियमितता यावरून पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी तिव्र नाराजी व्यक्त करून या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया वादात सापडणार असल्याचे चित्र आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाईन पध्दतीने रविवारी ता. 4 झाली. यावेळी पालकमंत्री झिरवाळ यांच्यासह खासदार रामराव वडकुते,…

Read More

सामाजिक दायित्व:जि.प.तील 260 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे केले वितरण, कस्तुरीची "वारी शिक्षणाची'' वंचितांच्या दारी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल व आदिवासी बहुल भागातील जि. प. प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या वंचित व उपेक्षित विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सामाजिक संस्था “कस्तुरी’ने राबवलेल्या “वारी शिक्षणाची’ हा सेवाभावी उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करीत सामाजिक दायित्व निभावले. अकोट तालुक्यातील जनुना व वस्तापूर या असणाऱ्या गावात भेटी देऊन तेथील जि. प. प्राथमिक शाळेत वर्ग १ते…

Read More

200 कोटींच्या रस्त्याला भेगा; "उबाठा'चे आंदोलन,:अकाेला-अकाेट मार्गाची दुरावस्था; आतापर्यंत 28 जणांचा गेला जीव‎

मृत्युच्या सापळ्यात अडकलेल्या अकोला-अकोट व देवरी फाटा-शेगाव या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर निष्पाप नागरिकांचे बळी जात असल्याचा आरोप शिवसेना (उबाठा) पक्षाने शेतकऱ्यांना सोबत घेत शनिवारी भरपावसातच रास्ता रोको आंदोलन केले. या रस्त्यासाठी गत नऊ वर्षांत २०० कोटींचा खर्च झाल्यानंतर ठिकठिकाणी रस्त्याला भेगा पडल्या आहेत. अद्यापही रस्ता अंदाजपत्रकानुसार झालेला नाही. तसेच या रोडवर २८ जणांचा अपघातात मृत्यू…

Read More

सेंद्रीय, नैसर्गिक शेती करणाऱ्या 20 शेतकऱ्यांवर कौतुकाची थाप:कृषी दिनानिमित्त कृषी विभागाकडून सन्मान, जिल्हा परिषदेत कार्यक्रम‎

नैसर्गिक व सेंद्रीय पद्धतीने शेती करुनसुद्धा कधीही तोटा न होऊ देणाऱ्या जिल्ह्यातील २० गुणी शेतकऱ्यांचा मंगळवारी जाहीर सत्कार करण्यात आला. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला. . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे,…

Read More

Government sorghum procurement center closed; Protest at tehsil office, many sorghum left at home, payments for purchased sorghum pending

येथील शासकीय ज्वारी खरेदी केंद्र बंद पडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पुढारी तथा नगरपंचायतीचे गटनेते प्रकाश मारोटकर व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समीर दहातोंडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडक दिली. बंद पडलेले खरेदी केंद्र त . खासगी बाजारपेठेत ज्वारी पिकाला कवडीमोल भाव असल्याने शासनाने हमीभाव देऊन पंधरा दिवसांपूर्वी येथे ज्वारी खरेदीचे शासकीय केंद्र सुरु केले…

Read More

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पंढरपूरला दिली पहिलीच भेट:बळीराजा सुखी तर संसार सुखी, पाऊस पडू दे; सुनेत्रा पवारांचे विठ्ठलाला साकडे

बळीराजा सुखी झाला तरच जगाचा संसार सुखी होतो. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरात लवकर चांगला पाऊस पडू दे, राज्यातील माझा शेतकरी सुखी आणि समाधानी राहू दे, असे साकडे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी घातले. उपमुख् . मंचर तालुक्यातील एका मठाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते शनिवारी झाले. यानिमित्ताने त्यांचा दौरा होता. यावेळी आमदार दिलीप वळसे…

Read More

संत मुक्ताबाई मार्ग:पालखी मार्गाची दुरवस्था; रिधोरे, माढा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, 2 वर्षांपूर्वी झालेल्या नूतनीकरणानंतरही रस्ता मृत्यूचा सापळा‎

पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या मानाच्या पालख्यांपैकी एक असलेल्या संतश्रेष्ठ मुक्ताबाईंच्या पालखी मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. रिधोरे ते माढा या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता’ असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. २४ जून रोजी जळगाव जिल्ह्यातील श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथून मुक्ताबाईंच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. २० जुलै रोजी रिधोरे, वडशिंगे मार्गे…

Read More

दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात:नेवासेतील ज्ञानेश्वर कॉलनीत समस्यांचा विळखा, नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात‎

पावसाळापूर्व कामांकडे नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ज्ञानेश्वर कॉलनीतील शेकडो नागरिकांचे जीवन सध्या सांडपाण्याच्या संकटात सापडले आहे. साचलेल्या पाण्यामुळे बोअरवेल दूषित झाल्याचा आरोप, फुटलेल्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा दूषित होत असल्याची भीती आणि अतिवृष्टीत पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बसस्थानक, पोलीस लाईन व गंगानगर भागातील सांडपाणी तसेच पावसाचे पाणी वाहून नेणारा नैसर्गिक…

Read More

महामार्गाच्या संथ कामामुळे निफाडला 3 तास कोंडी:दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; नागरिकांमध्ये संताप,

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सुरू असलेल्या रस्ते कामाच्या संथ गतीचा फटका शनिवारी (दि. ४) निफाडकरांना बसला. शांतीनगर चौफुली परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. यामुळे प्रवाशांसह नागरिकांना तीन तास कांेडीचा सामना करावा लागला. प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. निफाड शहरातून जाणाऱ्या नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्ग तसेच सुरत-शिर्डी महामार्गावर…

Read More

डॉक्टरांनी मानवी मूल्यांना प्राधान्य देत व्यवसायाचे पावित्र्य जपावे- डॉ. दौंड:पाचोड येथील शिवछत्रपती महाविद्यालयात ‘डॉक्टर्स दिन’ उत्साहात साजरा‎

डॉक्टर हा केवळ एक व्यवसाय किंवा उपजीविकेचे साधन नसून मानवतेची सेवा, करुणा, संवेदनशीलता आणि समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव जपणारा एक पवित्र मार्ग आहे. आजच्या काळात काही ठिकाणी वैद्यकीय क्षेत्र आर्थिक फायद्याशी जोडले जात असल्याचे चित्र आहे, ही बाब चिंताजनक आहे. डॉक्टरांनी आर्थिक लाभापेक्षा रुग्णांची सेवा आणि मानवी मूल्यांना प्राधान्य देत आपल्या व्यवसायाचे पावित्र्य जपले पाहिजे,…

Read More