Headlines

हिंगोलीत 250 ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे असहकार आंदोलन:चुकीच्या पद्धतीने झालेले निलंबन रद्द करण्यासह इतर मागण्यांचा समावेश

हिंगोली जिल्हयात चुकीच्या पद्धतीने झालेले निलंबन रद्द करावे तसेच वेतन वाढ रोखण्याचा निर्णय रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी ग्राम पंचायत अधिकारी संघटनेने गुरुवारपासून ता. २० असहकार आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात २५० ग्रामपंचायत अधिकारी सहभागी झाले आहेत. पुढील काळात आंदोलन आणखी तिव्र करण्याचा निर्णय संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या संदर्भात ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या…

Read More

Prakash Ambedkar Statement on Shiv Sena Symbol Dispute

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून ठाकरे गट आणि शिंदे गटामधील कायदेशीर लढाई निर्णायक टप्प्यात पोहोचली असतानाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या संपूर्ण संघर्षाबाबत मोठा राजकीय दावा केला आहे. सर्वोच्च . अकोला येथे पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादासह सर्वोच्च न्यायालयातील सुरू असलेल्या सुनावणीवर भाष्य केले….

Read More

शिक्षण व्यवस्थेचा 'लातूर पॅटर्न'?:अभिजित दिपके यांच्या 'स्कूल ठीक करो' मोहिमेत ZP शाळेत अवतरले खासगी शाळेचे विद्यार्थी, औसा येथे बोगसगिरी उघड

दिल्लीतील जंतरमंतरवर पेपरफुटीच्या विरोधात झालेल्या देशव्यापी आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्या आंदोलनात तरुणाईचे नेतृत्व करणारे सामाजिक कार्यकर्ते अभिजित दिपके यांनी आता देशातील आणि राज्यातील सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी ‘स्कूल ठीक करो’ मोहीम हाती घेतली आहे. 15 ऑगस्ट रोजी हिंगोलीतून सुरू झालेली ही मोहीम जेव्हा लातूर जिल्ह्यातील औसा शहरात पोहोचली, तेव्हा तिथे जे…

Read More

Chhatrapati Sambhajinagar B Raghunath Award 2026; Venkatesh Solanke Arsad

मराठी साहित्य विश्वात आपल्या लेखनाने स्वतंत्र ठसा उमटवणारे ज्येष्ठ साहित्यिक बी. रघुनाथ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा यंदाचा प्रतिष्ठित ‘बी. रघुनाथ पुरस्कार’ जाहीर झाला आहे. प्रा. व्यंकटेश सोळंके यांच्या ‘अरसड’ या अत्यंत चर्चिल्या गेलेल्या काद . कादंबरीचे लेखक प्रा. व्यंकटेश सोळंके हे नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील बरबडा येथील ‘जवाहरलाल नेहरू कनिष्ठ महाविद्यालयात’ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत….

Read More

आदित्य ठाकरेंचे फडणवीसांना पत्र:कंपन्या स्थलांतरित होण्याचा धोका; हिंजवडीतील वाहतूक, रस्ते, पाणी आणि कचऱ्याचा प्रश्न तातडीने सोडवा

पुण्याच्या हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी, खराब रस्ते, रखडलेले मेट्रो काम, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट हस्तक्षेपाची मागणी केली आहे. हिंजवडीतील समस्यांकडे सरकारने तातडीने लक्ष न दिल्यास चाकणप्रमाणेच मोठ्या कंपन्याही इतर ठिकाणी स्थलांतर करण्याचा मार्ग स्वीकारू शकतात, असा इशारा त्यांनी दिला आहे. आदित्य…

Read More

महिन्यानंतरही आश्वासनांची पूर्तता नाही:आश्रमशाळा-दिव्यांगांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यास मंत्री सावेंवर हक्कभंग आणावा लागेल- बच्चू कडू

आश्रम शाळेंच्या परिस्थितीबद्दल मी स्वत विधींमंडळात चर्चा केली असून मंत्री अतूल सावे यांनी मला शब्द दिला आहे की मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो. पण त्या गोष्टीला एक महिना झाला असून आता अतूल सावे यांच्यावरच हक्कभंग सादर करावा लागेल अशी परिस्थिती आमच्यावर आली आहे. आम्हाला दिलेल्या आश्वासनांची पुर्तता होत नाही, सत्तेत राहुन आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ येऊ नये…

Read More

Ashok Saraf Nagpur Felicitation; Devendra Fadnavis Honors Superstar

महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या ऐंशीव्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त नागपुरात त्यांच्या नागरी सत्काराचा सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते हा सत्कार करण्यात आला. अशोक सराफ . देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, त्यांच्या अभिनयात अत्यंत सहजता असून कुठलीही कृत्रिमता जाणवत नाही. प्रत्येक भूमिका त्यांनी अतिशय तन्मयतेने साकारली….

Read More

आराेप-प्रत्याराेप:शिंदे-नाईक संघर्षात आता ‘डेटा सेंटर’ आणि ‘टीडीआर’वरून वादाचा भडका, टीडीआर तब्बल 4,000 कोटी रुपयांचा असल्याचा दावा

टीडीआर प्रकरणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात वाद सुरू असतानाच आता ठाण्यातील प्रस्तावित “डेटा सेंटर’ आणि टीडीआर प्रकरणावरून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. गडकरी रंगायतन येथील जनता दरबारात बोलताना गणेश नाईक यांनी ठाणे महापालिका व प्रशासनाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. टीडीआर प्रक्रियेवर स्टे आणण्यासंदर्भात बोलताना, “स्टे देण्यास नक्कीच उशीर झाला, पण बैल…

Read More

भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी बीएलएच्या नियुक्तीवरून पदाधिकाऱ्यांना फटकारले:नाशिक येथे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक

मतदार यादी पुनरीक्षणासाठी राज्यात १ लाख ३६ हजार बूथ असून आतापर्यंत भाजपचे ९३ हजार बीएलए नियुक्त आहेत. अद्याप ४३ हजार बीएलएंची नियुक्ती बाकी असून ही चालढकल चालणार नाही, असा सज्जड दम देत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी नाशिकमधील विभागीय बैठकीत पदाधिकाऱ्यांना फटकारले. बूथबाहेर बसून निवडणुका जिंकता येत नाहीत. मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे, बूथवर…

Read More

पुढच्या जन्मी नक्की डॉक्टर बनेल…:वैजापूर तालुक्यात 'नीट'च्या विद्यार्थ्याची सुसाईड नोट लिहून आत्महत्या

वैजापूर तालुक्यातील खंडाळा (भवरबेंद) येथे एक अत्यंत सुन्न करणारी घटना घडली आहे. ‘नीट’ परीक्षेची तयारी करणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सूरज सुभाष शिंदे (वय 19) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली अत्यंत भावनिक चिठ्ठी निष्पन्न झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सूरज हा नेहमीप्रमाणे त्याच्या घरातील…

Read More