Headlines

भरधाव वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या:कारण अस्पष्ट, गोलटगाव फाटा परिसरातील घटना‎

छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावरील गोलटगाव फाटा परिसरात शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास एका २२ वर्षीय तरुणाने भरधाव अज्ञात वाहनासमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. पवन कडूबा बुचुडे (वय २२, रा. शेवगा) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरहून जालन्याकडे जाणाऱ्या एका वेगवान अज्ञात वाहनासमोर पवनने अचानक उडी घेतली. या भीषण अपघातात तो गंभीर…

Read More

वाकला जिल्हा परिषद शाळेसमोर विद्यार्थ्यांकडून थाळीनाद आंदोलन:सहा शिक्षकांची पदे भरण्याची मागणी, सोमवारी पायी दिंडी काढण्याचा निर्धार‎

तालुक्यातील वाकला जिल्हा परिषद प्रशालेत मुख्याध्यापकासह सहा शिक्षकांची पदे रिक्त असून, ती भरण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी शुक्रवारी शाळेस कुलूप ठोकले होते. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने शनिवारी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी भर पावस . हातात थाळ्या आणि चमचे घेऊन विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आम्हाला शिक्षक द्या, शिक्षणाचा हक्क मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मुसळधार…

Read More

आगामी 4 दिवस महाराष्ट्रात पाऊस:बंगालचा उपसागर, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण, राज्यातील 6 जिल्ह्यांना रेड, 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रात 16 दिवसांच्या खंडानंतर परतलेला मान्सून जोरदार कोसळत आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर वरुणराजाने रौद्ररूप धारण केले आहे. मुंबईत शनिवारी 6 तासांतच 164 मिमी पाऊस झाला. मुंबईत 64 ठिकाणी झाडे, तर 9 ठिकाणी भिंत कोसळली. सुदैवाने जीवितहानी टळली. वसईतील मधुबन टाऊनशिप येथे शाळेला पुराने वेढले. त्यामुळे शाळेत 41 शिक्षक अडकले होते. त्यांना आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन…

Read More

नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरण:मेमन, कुरेशीचा जामीन नाशिक कोर्टाने फेटाळला

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी कारागृहात असलेले संशयित आरोपी रजा मेमन आणि शाहरुख कुरेशी या दोघांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. एका नामांकित आयटी कंपनीत घडलेल्या कथित धर्मांतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा न्यायाधीश अमित खारकर यांनी हा निर्णय दिला. अशा परिस्थितीत संशयितांना जामीन दिल्यास ते पुराव्यांशी छेडछाड करू शकतात आणि पीडितांना धमकावू शकतात, असा युक्तिवाद सरकारी…

Read More

पक्षप्रवेशापूर्वी ‘तळ्यातमळ्यात’ भूमिकेमुळे अडचण:मंत्रिमंडळ विस्तारात ओमराजे वेटिंगवर, बारणे-शिंदे आघाडीवर!

राजकारणात योग्य वेळी घेतलेला निर्णय जितका महत्त्वाचा असतो, तितकाच मोठा फटका संभ्रमावस्थेमुळे बसू शकतो. ठाकरे गटातून बंडखोरी करत शिंदे गटात दाखल झालेल्या ६ खासदारांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आला. मात्र, या सत्तानाट्यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची बंडखोरीच्या वेळची ‘तळ्यातमळ्यात’ भूमिका आता त्यांना भोवण्याची चिन्हे आहेत. आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला ३ मंत्रिपदे…

Read More

पूल दुरुस्तीसाठी मराठवाड्यास हवेत 2,051 कोटी रुपये:केंद्राकडून निधी मिळताच क्षेत्रनिहाय वाटप- ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे

अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान सोसावे लागलेल्या मराठवाडा विभागातील पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाने मोठी पावले उचलली आहेत. विभागातील जिल्हा परिषदांच्या अखत्यारीतील खराब झालेले रस्ते आणि खचलेल्या पुलांच्या दुरुस्तीसाठी तब्बल २,०५१.६४ कोटी रुपयांचा विस्तृत प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. विधान परिषदेत आमदार सतीश चव्हाण आणि विक्रम काळे…

Read More

पाण्याच्या टाकीत 5 दिवस मृत बैल सडत होता,:तेच पाणी 51 गावांना पुरवले- खडसे, मुक्ताईनगरच्या सारोळ्यातील प्रकार विधान परिषदेत

मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा प्रादेशिक जलशुद्धीकरण केंद्रातील अत्यंत धक्कादायक प्रकार विधान परिषदेत चर्चेस आला. या केंद्राच्या पाण्याच्या टाकीत पडून एका बैलाचा मृत्यू झाला. मात्र, ५ दिवस हा मृत बैल टाकीतच सडत होता आणि याच टाकीतील पाणी मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील ५१ गावांतील हजारो नागरिकांना पिण्यासाठी पुरवले गेले. या गंभीर हलगर्जीपणावरून एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत सरकारला…

Read More

Ketan Agrawals Grandfather Devichand Agrawal Passes Away

लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावरून ढकलून हत्या करण्यात आलेले प्रसिद्ध तरुण उद्योजक केतन अग्रवाल यांच्या कुटुंबावर आणखी एक मोठा आघात झाला आहे. केतनचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे शनिवारी संध्याकाळी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. . मिळालेल्या माहितीनुसार, देवीचंद अग्रवाल यांना कर्करोगाचे निदान झाले होते. नातवाच्या अचानक झालेल्या क्रूर हत्येमुळे अग्रवाल कुटुंब आधीच मानसिकदृष्ट्या खचले होते….

Read More

पुण्यात आरएसएसच्या संघ शिक्षा वर्गाचा समारोप:हिंदू संघटन संहारक नाही, तर संरक्षक; भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी पुण्यात प्रतिपादन केले की, हिंदूंचे संघटन कोणाच्याही विरोधात नाही, तर ते शांतता, सत्य आणि न्यायाच्या मार्गाने चालणारा समाज घडवण्यासाठी आहे. जगाच्या कल्याणासाठी उभी राहिलेली ही संघटित शक्ती संहारक नसून, नेहमीच संरक्षक भूमिका बजावणारी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे आयोजित ‘संघ शिक्षा वर्गाचा’…

Read More

अकरावी प्रवेशाची चौथी विशेष फेरी सुरू:प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना 6 जुलैपर्यंत मुदत

अकरावी प्रवेशाची चौथी म्हणजेच विशेष फेरी सुरू झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या तीन नियमित फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळाला नाही किंवा ज्यांचे प्रवेश काही कारणास्तव निश्चित झाले नव्हते, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही फेरी खुली आहे. या फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या विशेष फेरीची गुणवत्ता यादी आणि महाविद्यालय वाटप (कॉलेज अलॉटमेंट)…

Read More