Headlines

लोहगड बदनामीविरोधात गिर्यारोहण महासंघ आक्रमक:किल्ल्याची बदनामी थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाच्या मागण्या केल्या

लोहगड किल्ल्यावर नुकत्याच घडलेल्या गुन्हेगारी घटनेनंतर समाजमाध्यमांवर किल्ल्याची बदनामी सुरू झाली आहे. यावर अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने तीव्र आक्षेप घेतला आहे. महासंघाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून या प्रकरणी तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे. महासंघाच्या मते, लोहगड हा केवळ एक पर्यटनस्थळ नाही, तर महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाचा एक महत्त्वाचा…

Read More

Sanjay Shirsat Claims Operation 3.0 Begins

राज्यातील राजकीय घडामोडी पुन्हा एकदा वेग घेण्याची शक्यता असून सत्ताधारी शिवसेनेचे ‘ऑपरेशन 3.0’ सुरू झाले आहे. लवकरच एक मोठा ‘महाभूकंप’ पाहायला मिळेल, असा खळबळजनक दावा मंत्री संजय शिरसाट यांनी आज पत्रकार परिषदेत केला. तसेच, उद्धव ठाकरे यांच्या घंटानाद . ऑपरेशन 3.0 सुरू, महाभूकंप होणार उद्धव ठाकरे गट सोडून जाणाऱ्या कार्यकर्त्यांवर ‘पैसे घेऊन गेल्याचा’ आरोप संजय…

Read More

मुंबईत मुसळधार पावसाचा कहर:अनेक ठिकाणी कंबरेएवढे पाणी, कुठे झाडे कोसळली; फोटो-व्हिडिओमधून पाहा मुंबईची तुंबई झालेली अवस्था

मुंबईकरांची सकाळ पुन्हा एकदा मुसळधार पावसाने झाली आहे. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई आणि उपनगरांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दादर, हिंदमाता, सायन, कुर्ला आणि अंधेरी सबवेसह अनेक सखल भागांमध्ये कंबरेएवढे पाणी साचल्याने वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. तर, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरात ठिकठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. कामावर निघालेल्या चाकरमान्यांना पाण्यातून वाट काढताना प्रचंड…

Read More

पुणे मनपाचा अजब कारभार:भरपावसात रस्त्याच्या दुभाजकातील झाडांना टँकरने पाणी; व्हिडिओ व्हायरल होताच उठली टीकेची झोड

सध्या राज्यभरात पावसाचा जोर वाढत असताना, पुणे शहरातील एक अत्यंत ‘अजब’ व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मुसळधार पाऊस सुरू असताना, रस्त्याच्या कडेला दुभाजकांवरील झाडांना एका टँकरद्वारे पाणी घातले जात असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावरून नेटकऱ्यांनी पुणे महापालिकेच्या कारभारावर प्रचंड टीका करत ‘ही करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी आहे’ असा संताप व्यक्त केला. मात्र, या…

Read More

शासकीय रुग्णालयाच्या छतावर बिअरच्या बाटल्यांचा खच:3 पोत्यांसह काही बादल्यां रिकाम्या बाटल्यांनी भरलेल्या, प्रशासनाचं दुर्लक्ष

हिंगोली येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालय अन रुग्णालयाच्या छतावर बिअरच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून आला असून याठिकाणी तीन पोते भरून तसेच काही बादल्यांमध्ये रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. यामुळे रुग्णालय प्रशासनातच काही तळीराम असल्याचे स्पष्ट होत आहे. ज्या ठिकाणी सलाईनच्या रिकाम्या बाटल्या असणे अपेक्षित आहेत्या ठिकाणी चक्क बिअरच्या बाटल्या आढळून आल्याने रुग्ण अन नातेवाईकांमधून तिव्र संताप…

Read More

साकीनाका मॅनहोल दुर्घटना:अमित साटम यांच्या हसण्यावरून राज ठाकरेंचे फडणवीसांना खरमरीत पत्र, तर राऊतांचा 'मौत के सौदागर' म्हणत घणाघात

साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या गंभीर घटनेवर भाजपचे मुंबईतील आमदार अमित साटम हे हसल्याचा प्रकार समोर आल्यानंतर सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत पत्र लिहून भाजपच्या असंवेदनशीलतेवर बोट ठेवले आहे,…

Read More

पुण्याच्या उरुळी देवाचीमध्ये कापड दुकानात चोरी:खिडकीचे गज उचकटून पाऊणपाच लाख लंपास

वस्त्रदालनाच्या खिडकीचे गज उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील चार लाख 60 हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वस्त्रदालनाच्या मालकांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर-सासवड रस्त्यावर ऊरळी देवाची परिसरात नवल टेक्सटाईल मार्केट हे वस्त्रदालन आहे. वस्त्रदालनाच्या मागील बाजूस…

Read More

जालन्यात भीषण अपघात:दोन बसची समोरासमोर धडक; 25 शाळकरी मुलांसह 30 जण जखमी, दोन्ही चालक गंभीर

जालना-वडीगोद्री महामार्गावर शनिवारी सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. शहापूरजवळील गल्हाटी नदीच्या पुलावर दोन एसटी बसेसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अपघातात ‘मानव विकास मिशन’च्या बसमधून प्रवास करणाऱ्या २५ शाळकरी विद्यार्थ्यांसह सुमारे ३० प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र दोन्ही बसेसचे मोठे नुकसान झाले असून दोन्ही चालक…

Read More

'उबाठा'त फक्त उद्धव ठाकरे-संजय राऊतच उरणार:मूर्खांच्या हाती सत्ता गेल्यावर सोबत कोण राहणार, संजय केनेकरांचा ठाकरेंना रोकडा सवाल

उबाठा पक्षाची सूत्रे आता उद्धव ठाकरेंऐवजी संजय राऊतांच्या हातात गेल्याचे दिसत असून, राऊत ठाकरेंना पूर्णपणे बुडवतील. मूर्खांच्या हाती सत्ता गेल्यावर त्यांच्यासोबत कोण राहील, आगामी काळात या पक्षात केवळ ठाकरे आणि राऊत हे दोघेच शिल्लक राहतील आणि सर्व शिवसैनिक व कार्यकर्ते पक्ष सोडतील, असा दावा भाजपचे माजी आमदार संजय केनेकर यांनी केला आहे. संजय केनेकर म्हणाले…

Read More

मुंबईत मध्यरात्री भीषण अपघात:मद्यधुंद टँकरचालकाने डिलिव्हरी बॉयला चिरडले; पळणाऱ्या चालकाला नागरिकांनी पकडलं

मुंबईतील जोगेश्वरी भागात मध्यरात्री एका मद्यधुंद टँकरचालकाने दुचाकीस्वार डिलिव्हरी बॉयला चिरडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या या चालकाला स्थानिक नागरिकांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. अजित ग्लास गार्डन परिसरात अपघात या अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव हर्ष…

Read More