Headlines

कन्नडमध्ये 70 हायटेक कॅमेऱ्यांची राहणार नजर:पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते होणार उद्घाटन, आमदार जाधव राहणार उपस्थित‎

५५ हजार लोकसंख्या असलेल्या कन्नड शहरावर निगराणी ठेवण्यासाठी प्रत्येक रस्त्यावर, प्रमुख चौकात हायटेक व विविध वैशिष्ट्ये असलेले सत्तर एआय कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांवर नियंत्रण करणाऱ्या कक्षाचे उद्घाटन आज सायंकाळी सहा वा‌. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रघुनाथ सानप यांनी दिली आहे. आमदार संजना जाधव, ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ….

Read More

शिवसेना पक्षचिन्ह व धनुष्यबाणाच्या वादावर 30 जुलै रोजी सुनावणी:तुमच्या नेत्यांना माध्यमांत बोलण्यापासून रोखा, सरन्यायाधीशांनी ठाकरे गटाला फटकारले

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण वादावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी ३० जुलैला होणार आहे. तत्पूर्वी, न्यायालयाने ठाकरे गटाला अतिशय कठोर शब्दांत फटकारले. “आधी तुमच्या लोकांना माध्यमांमध्ये जाऊन ‘सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नाही’ अशी बेजबाबदार विधाने करण . ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी हे प्रकरण ३ वर्षांपासून प्रलंबित असल्याचे सांगत तातडीच्या सुनावणीची विनंती केली होती. मात्र, ठाकरे…

Read More

सातारच्या लाल मातीत 52 व्या 'हिंदकेसरी' कुस्ती महासंग्रामाचा शड्डू!:दमदार डावपेचांनी रंगला पहिला दिवस

सातारच्या लाल मातीत शुक्रवारी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या ५२ व्या पर्वाचा दमदार शुभारंभ झाला. पारंपरिक जल्लोष, मल्लांच्या गर्जना आणि कुस्ती शौकीनांच्या उत्साहात छत्रपती शाहू स्टेडियम परिसर अक्षरशः कुस्तीमय बनला होता. उद्घाटनानंतर लगेचच आखाड्यात रंगलेल्या प्राथमिक लढतींमध्ये देशभरातील मल्लांनी ताकद, चपळाई आणि डावपेचांचा जबरदस्त नजराणा सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन…

Read More

मुख्यमंत्री फडणवीस: भारत 'विश्वगुरू' बनेल:आध्यात्मिक महासत्ता होण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनातून

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, भारताला ‘विश्वगुरू’ बनवण्याचे स्वप्न केवळ आर्थिक किंवा लष्करी सामर्थ्यावर आधारित नाही, तर ते आपल्या समृद्ध आध्यात्मिक वारशात रुजलेले आहे. भारताला आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखालीच प्रशस्त होत आहे, असे गौरवपूर्ण उद्गार त्यांनी काढले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बंगळुरू येथील ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग…

Read More

दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा!:UDID कार्डासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ, मंत्री अतुल सावेंची महत्त्वाची घोषणा

राज्य शासनाने विशेष सहाय्य अनुदान योजनांअंतर्गत लाभ घेणाऱ्या, परंतु वैश्विक ओळखपत्र नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अशा लाभार्थ्यांना वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या कालावधीत त्यांचे अनुदान सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी दिली. मंत्री अतुल सावे…

Read More

पुणे पोलीस दलात मोठे फेरबदल:संजय दराडे नवे सह पोलिस आयुक्त; तेजस्वी सातपुते गुन्हे शाखेच्या अपर आयुक्त

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत. यामध्ये पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नत्यांचा समावेश आहे. या फेरबदलांमध्ये संजय दराडे यांची पुणे शहराच्या पोलीस सह आयुक्तपदी, तर तेजस्वी सातपुते यांची पुणे शहर गुन्हे शाखेच्या अपर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहरात…

Read More

खरीप आढावा बैठकीत अंबादास दानवेंचा आक्रमक पवित्रा:खतटंचाई आणि बियाणे लिंकिंगवरून प्रशासनाला इशारा; कर्जमाफीवरूनही सरकारवर टीका

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात शुक्रवार, 15 मे रोजी खरीप हंगामपूर्व तयारी आढावा संपन्न झाली. या बैठकीत शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई, पीक कर्ज वितरणातील अडचणी आणि बियाण्यांच्या संभाव्य लिंकिंगप्रकाराचा मुद्दा उपस्थित करत खरीप हंगामात खतटंचाई आणि पीक कर्जाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो…

Read More

मनोज जरांगेंचा पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा:8 महीने उलटूनही सातारा गॅझेटचा जीआर न निघाल्याने संताप, मुख्यमंत्र्यांवरही टीका

मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. मुंबईच्या आंदोलनावेळी मराठा आरक्षणाचा सातारा गॅझेटचा जीआर एका महिन्यात काढतो असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यावर आठ महीने जाले तरी काहीही कारवाई करण्यात आली नाही. मराठा आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेतले गेले नाहीत, अशा शब्दात जरांगे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. मनोज…

Read More

सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांना डावलले!:दोघांच्याही पदांचा उल्लेख नाही; निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रातून नवी माहिती समोर

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात खासदार सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर कार्याध्यक्ष हे पद नमूद केलेले नाही. त्यामुळे ही दोन्ही नेते त्या पदांवर आहेत की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने केंद्रीय…

Read More

आंबा-काजू उत्पादकांच्या प्रश्नावरून राजू शेट्टींनी सरकार घेरलं:म्हणाले- कायदा मोडून सत्ता टिकवता, मग आमचा लढा चुकीचा कसा?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. राज्य सरकार नियम आणि कायदे पायदळी तुडवत सत्ता चालवत असेल, तर शेतकरी आणि कष्टकरी जनतेच्या न्यायासाठी सविनय कायदेभंग केला तर त्यात चुकीचे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार गंभीरपणे लक्ष देत नसल्याचा…

Read More