Headlines

कृउबास संचालकांत एकमताच्या ‎अभावामुळे मंत्री महाजनांची एन्ट्री:ऐनवेळी नाव बदलण्याच्या परंपरेमुळे सूत्रे घेतल्याची चर्चा‎

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर‎ भाजपची पकड मजबूत असली तरी‎ अंतर्गत राजकारणाने सध्या डोकेवर‎ काढले आहे. विशेष म्हणजे नवीन ‎टर्ममधील दोन्ही सभापतींना अविश्वास‎ प्रस्तावामुळे आपली पदे गमवावी लागली‎ आहेत. या पार्श्वभूमीवर, संचालकांवर‎ विश्वास नसल्याने अखेर राज्याचे‎ ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी‎ आता या निवडीचे नियंत्रण स्वतःच्या ‎हातात घेतले आहे. बाजार समितीच्या राजकारणात ‎अविश्वासाचे सत्र सुरूच…

Read More

मुंबई-बंगळुरू आता अवघ्या साडेपाच तासांत:गडकरींच्या घोषणेमुळे महाराष्ट्राला मोठा फायदा; पुणे ते संभाजीनगर मार्गालाही मंजुरी

मुंबई ते बंगळुरू हा प्रवास आता अवघ्या साडेपाच तासांत पूर्ण करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती दिली. संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या कामाची पाहणी केल्यानंतर त्यांनी नव्या महामार्गाबाबत घोषणा केली. या मार्गाच्या पहिल्या टप्प्याची निविदा काढण्यात…

Read More

बनेश्वरच्या जंगलात दुर्मिळ ‘स्वर्ग नर्तका’चे दर्शन:शहरीकरणामुळे अधिवासावर संकट, पक्षीप्रेमींकडून चिंता व्यक्त

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील प्रसिद्ध बनेश्वर देवस्थानच्या जंगल परिसरात अत्यंत दुर्मिळ ‘स्वर्ग नर्तक’ (एशियन पॅराडाइज फ्लायकॅचर) या पक्ष्याचे दर्शन झाले आहे. या देखण्या पक्ष्याच्या दर्शनामुळे वन्यजीव अभ्यासक आणि पक्षीप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. पुणे जिल्हा वन्य प्राणी व सर्प रक्षक असोसिएशनचे अध्यक्ष सुशील विभुते आणि विशाल शिंदे हे या परिसरात एका मोहिमेवर असताना त्यांना…

Read More

‘एसपी-ई-संवाद’द्वारे घरबसल्या साधता येणार पोलिसांशी संपर्क:नागरिकांचा वेळ आणि प्रवासाचा त्रास वाचवण्यासाठी ऑनलाइन मीटिंगची सुविधा‎

जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या, तक्रारी आणि सूचना आता अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक पद्धतीने प्रशासनापर्यंत पोहोचवता याव्यात, यासाठी अकोला पोलिस दलाने एक आधुनिक पाऊल उचलले आहे. येथील पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून ‘एसपी-ई-संवाद’ही ऑनलाईन मीटिंगची अभिनव सुविधा नव्याने सुरू करण्यात आली आहे. या आधुनिक सुविधेमुळे आता नागरिकांना आपल्या समस्या किंवा निवेदने…

Read More

वर्षा गिरी, अश्विनी जाधव यांना सदाफुली पुरस्कार

आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगल यांची १२ मे रोजी जयंती जागतिक स्तरावर परिचारिकांच्या अमूल्य योगदानासाठी साजरी करण्यात येतो. या महान सेवाकार्याची दखल म्हणून कस्तुरी या सेवाभावी संस्थेच्या वतीने आरोग्य सेवा क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या वर्षा गिरी आणि अश्विनी जाधव या दोन परिचारिकांचा “सदाफुली’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मागील ३० वर्षापासून समर्पित भावनेने सेवा करणाऱ्या…

Read More

छावा प्रतिष्ठानचा महिला अत्याचारावर आधारित देखावा:महिलांच्या हस्ते जलाभिषेक अन् बुधभूषण ग्रंथाचे पूजन, शिवराज्य सेनेकडून शरीरसौष्ठव स्पर्धा

बार्शी शहर व तालुक्यात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती विविध संघटनांच्या वतीने अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शहरात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण परिसर शंभूभक्तीत न्हाऊन निघा . छावा प्रतिष्ठानच्या वतीने जयंतीचे औचित्य साधून बार्शी शहरातील राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, शासकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांतील महिलांना सन्मानित करण्यात आले….

Read More

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट‎:पुराचा धोका टाळण्यासाठी सीना नदी पात्राचे रुंदीकरण, खोलीकरण सुरू

अहिल्यानगर शहरातून वाहणाऱ्या आणि गेल्या अनेक वर्षांपासून अरुंद झालेल्या सीना नदीच्या पात्राचा श्वास मोकळा करण्यासाठी पात्राचे रुंदीकरण व खोलीकरण सुरू करण्यात आले आहे. राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या २० कोटी रुपयांच्या निधीतून महानगरपालिकेमार्फत हे काम सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात बुरुडगाव ते लोखंडी पुलापर्यंत सुमारे अडीच किमीचे काम केले जाणार आहे. या कामामुळे पुराचा धोका…

Read More

नगरपालिकेत चकरा:कन्नड पालिकेतील सफाई कर्मचारी ग्रॅच्युइटी, जीपीएफ लाभापासून वंचित, पालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे मुख्याधिकाऱ्यांना साकडे

कन्नड नगर परिषदेतील सफाई कर्मचारी पंचवीस ते तीस वर्षे काम करून सेवानिवृत्त झाले. त्यातल्या काही जणांचा मृत्यू झाला. काही जण जिवंत आहेत. मागील दहा वर्षांपासून कर्मचारी व त्यांचे वारसदार जीपीएफ, ग्रॅच्युइटी, रजा रोखीकरण, गट विम्याचे हक्काचे पैसे मागत आहेत. परंतु अजूनही त्यांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. या संदर्भात यशोदा दशरथ भालेराव, गोविंद दगडू साळवे, कुसुम…

Read More

डिफेन्स हब:शिर्डीत 3,000 कोटी रुपये गुंतवणुकीतूनतोफगोळ्यांचा जगातील तिसरा मोठा प्रकल्प, संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते 23 मे रोजी लोकार्पण

साईबाबांची भूमी शिर्डी आता देशाचे महत्त्वाचे संरक्षण केंद्र (डिफेन्स हब) म्हणून उदयास येत आहे. निवे ग्रुपने शिर्डी एमआयडीसीत अवघ्या १२ महिन्यांत ३ हजार कोटींच्या गुंतवणुकीतून हा भव्य प्रकल्प उभारला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते २३ मे रोजी याचे लोकार्पण होणार आहे. राज्य शासनाचा पुढाकार व ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’च्या माध्यमातून हा प्रकल्प वेगाने…

Read More

हिंदू राष्ट्र जागृती सभेसाठी अंबादेवी, एकवीरादेवीला साकडे:आयोजकांनी निर्विघ्नतेसाठी पूजा-अर्चा केली

अमरावती येथील दसरा मैदानात ७ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या निर्विघ्न आयोजनासाठी हिंदू जनजागृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आई अंबादेवी आणि एकवीरादेवीला साकडे घातले आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दोन्ही मंदिरांमध्ये जाऊन पूजा-अर्चा व आरती केली. आयोजकांनुसार, हिंदूबहुल देशात हिंदूंना घुसखोरी, गोहत्या, धर्मांतर, लव्ह जिहाद, हलाल जिहाद आणि वक्फ जिहाद यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे…

Read More