कृउबास संचालकांत एकमताच्या अभावामुळे मंत्री महाजनांची एन्ट्री:ऐनवेळी नाव बदलण्याच्या परंपरेमुळे सूत्रे घेतल्याची चर्चा
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपची पकड मजबूत असली तरी अंतर्गत राजकारणाने सध्या डोकेवर काढले आहे. विशेष म्हणजे नवीन टर्ममधील दोन्ही सभापतींना अविश्वास प्रस्तावामुळे आपली पदे गमवावी लागली आहेत. या पार्श्वभूमीवर, संचालकांवर विश्वास नसल्याने अखेर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आता या निवडीचे नियंत्रण स्वतःच्या हातात घेतले आहे. बाजार समितीच्या राजकारणात अविश्वासाचे सत्र सुरूच…