Headlines

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली:ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू; सर्व नियोजित कार्यक्रम रद्द

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अचानक ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांतील सततची धावपळ यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांना तीव्र ताप आणि प्रचंड अशक्तपणा जाणवू लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. शुक्रवारी विधिमंडळातच भरला…

Read More

सातत्याने प्रयत्न केल्यास यश हमखास- प्रा. ललित काळपांडे:माळी महासंघाच्या वतीने गुणवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार‎

अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी कौतुक सोहळा व पालक मेळावा आयोजित करण्यात आला. सद्य परिस्थितीतील विविध परीक्षांमधील स्पर्धा व चढाओढ पाहता विद्यार्थ्यांनी व अतिशय परिश्रामने सातत्याने प्रयत्न केले यशप्राप्ती होईल, असे प्रमुख वक्ते प्रा. ललित काळपांडे म्हणाले. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेश संघटक गणेश काळपांडे, उद्घाटक अखिल भारतीय माळी महासंघाचे विश्वस्त…

Read More

Mumbai Monsoon Rain Intensifies; Heavy Showers Forecast

राज्यभरात पावसाचा जोर कमालीचा वाढला असून आज (४ जुलै) देखील बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा कडक इशारा देण्यात आला आहे. जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात वरुणराजाने धडाकेबाज बॅटिंग सुरू केल्याने बळीराजा सुखावला . दुसरीकडे, विदर्भातील गोंदिया, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, उर्वरित सर्व…

Read More

चिखलदऱ्यात पर्यटनाचा पहिला विकेंड; सुरक्षेसाठी 200 पोलिस:धोकादायक सेल्फी आणि ड्रंक अँड ड्राईव्हवर पोलिसांची राहणार करडी नजर

14 दुचाकीद्वारे राहणार सतत गस्त‎ . विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक येतात. दरम्यान पावसाळ्यातील शासकिय सुटी व विकेंड अर्थात शनिवारी, रविवारी पर्यटकांची संख्या अधिक असते. यातच चिखलदरा व परिसरात यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानंतर ४ व ५ जुलै हा पहिलाच विकेंड आहे. यातच चिखलदरा येथे मागील काही तासांपासून सुरू असलेला सततधार पाऊस…

Read More

कचरा टाकणाऱ्यांना दंड करा- आ. जगताप:कचरा प्रश्न सोडवण्यासाठी वरिष्ठ मनपा अधिकारी उतरणार रस्त्यावर

शहरातील सार्वजनिक स्वच्छता, कचऱ्याचे साचलेले ढीग, विस्कळीत पाणीपुरवठा अशा नागरी समस्यांवर आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी (३ जुलै) महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. मनपा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या नगरसेवकांनी केलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेत नगरसेवक व वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सूचना न ऐकणार्‍या कर्मचार्‍यांच्या बिनपगारी करण्याच्या सूचना दिल्या. आमदार जगताप यांच्या सूचनेनंतर घनकचरा व्यवस्थापन विभाग व प्रभाग समितीचे वरिष्ठ…

Read More

कळवण न्यायालय आवार जलमय; वकील, पक्षकारांची वाढली गैरसोय:सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात वकिलांत नाराजी‎

येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या आवारात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून वकील, पक्षकार आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या समस्येबाबत वारंवार पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे….

Read More

Pune Murder Accused Siya Goyal, Chetan Chaudhary in 14-Day Custody

पुणे6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पुण्यातील वडगाव न्यायालयाने शुक्रवारी केतन अग्रवालच्या हत्येतील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोघांना पुण्यातील येरवडा कारागृहात ठेवण्यात येणार आहे. पोलिसांनी दोघांची कोठडी वाढवण्याची मागणी केली होती, परंतु न्यायालयाने ती फेटाळून लावली. न्यायालयात हजर केले असता सिया आणि चेतनने नार्को (पॉलीग्राफ) चाचणी करण्यास स्पष्ट…

Read More

बहिरगाव येथे कृषी मार्गदर्शन शिबिर:कापूस क्रांतीसह हुमणी अळी नियंत्रणावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन‎

हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून १ ते ७ जुलै दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कृषी सप्ताह साजरा केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी प्रकाश…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:सत्ताधारी आमदारांना 830 तर, विरोधकांना फक्त 70 कोटी, आमदार विरोधी पक्षांचे, शिक्षा मात्र शेतकऱ्यांना

जो सत्तेत तोच शक्तिमान याचा प्रत्यय राज्यातील २९ मतदारसंघांतील शेतकऱ्यांना आला आहे. ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’त सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघांवर ३ कोटींपासून थेट १८.८२ कोटींपर्यंतच्या निधीची उधळण करण्यात आली. तर विरोधी पक्षातील आमदारांच्या पदरात मात्र प्रत्येकी २.५० कोटींचा दिला आहे. या राजकीय कुरघोडीत शिक्षा मात्र शेतकऱ्यांना मिळाली आहे. विरोधी आमदार असलेल्या भागात निधीअभावी कमी कामे…

Read More

मृताच्या नावाने घेतलेले कर्ज मंजूर; 8 दिवसांत चौकशी:साताऱ्यात सहायक व जिल्हा उपनिबंधक निलंबित

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील महाबळेश्वरवाडी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे चक्क मृत व्यक्तींच्या नावाने कर्ज मंजूर करून बनावट स्वाक्षऱ्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा कथित प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची पुढील सात दिवसांत सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे कडक निर्देश गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी…

Read More