Headlines

पुण्यात पाच वर्षांत हजारो उच्च कौशल्याधारित रोजगार:जपानी कंपनीच्या गुंतवणुकीला महापौरांकडून सहकार्याचे आश्वासन

भारत आणि जपान यांच्यातील आर्थिक तसेच तंत्रज्ञान सहकार्यातून पुण्यात उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. या संदर्भात टोकियो येथील आय. एम. कॉर्पोरेशनचे अध्यक्ष रेन्या किकुची आणि वरिष्ठ सल्लागार ताकाशी इतामिया यांनी पुणे महापालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांची सदिच्छा भेट घेतली. टोकियो स्थित फिडेलसॉफ्टचे संस्थापक अध्यक्ष सुनील कुलकर्णी यांच्या पुढाकाराने ही भेट झाली. यावेळी जपानी…

Read More

सियाने मित्राला सांगितले होते – लग्न जे होणार नाही:स्नॅप चॅट समोर आले; केतनच्या हत्येच्या 24 दिवसांपूर्वी बोलणे झाले होते

पुणे येथील केतन अग्रवाल खून प्रकरणात आरोपी मंगेतर सियाची स्नॅपचॅटवर एका मैत्रिणीसोबतची चॅटिंग व्हायरल होत आहे, ज्यात लिहिले आहे- हे लग्न होणार नाही. या ओळीमुळे केतन खून प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे. दरम्यान, पोलिस या चॅटची चौकशी करत आहेत. २५ मे रोजीच्या चॅटमध्ये सिया आपल्या एका मित्राकडे लग्नाच्या बुकिंगसाठी आधार कार्ड मागते. पण यानंतर…

Read More

सब्र का फल मिठा होता है:ज्या पदासाठी थांबलो ते 8-10 दिवसांत मिळणार, रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत भरत गोगावलेंचे सूचक विधान

रायगडच्या पालकमंत्रिपदावरून गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय तिढ्यावर आता लवकरच पडदा पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेना शिंदे सेनेचे आमदार भरत गोगावले यांनी “ज्या पदासाठी आम्ही थांबलो होतो, ते येत्या आठ ते दहा दिवसांत मिळणार आहे,” असे सूचक वक्तव्य करत रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत मोठा दावा केला आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदाची घोषणा आता अंतिम टप्प्यात असल्याची…

Read More

Shashikant Shinde Denies NCP Merger Rumours; Party Unity Strong

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देत, “काँग्रेसमध्ये जाण्याचा किंवा पक्षाचे विलीनीकरण करण्याचा कुठलाही विचार नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले. गेल्या काही दिवस . पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थिती, विरोधकांची भूमिका, राम मंदिरातील कथित गैरव्यवहार, मुंबईतील पावसाची परिस्थिती, कायदा-सुव्यवस्था आणि…

Read More

ई-20 इंधनामुळे कार्यक्षमतेत नगण्य घट:वाहनांची कठोर चाचणी, सुरक्षिततेची हमी; इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत एआरएआयचे स्पष्टीकरण

पुण्यातील ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ (एआरएआय) च्या कोथरूड येथील मुख्य कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ‘ई-२०’ (२० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल) इंधनाच्या वापराबाबत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण देण्यात आले. एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, बाजारात आणण्यापूर्वी प्रत्येक वाहनाची अत्यंत कठोर चाचणी घेतली जाते. ग्राहकांना सुरक्षित आणि विश्वासार्ह…

Read More

टाळ-मृदंगाचा गजर अन् माऊलींचा जयघोष:संत मुक्ताईंची पालखी जालन्यात दाखल; रविवारी रंगणार भव्य रिंगण सोहळा

‘आदीशक्ती मुक्ताईंचा जयघोष, टाळ-मृदंगाचा गजर आणि विठू माऊलीच्या दर्शनाची आस…’ अशा अत्यंत भक्तीमय वातावरणात पंढरपूरकडे निघालेली संत मुक्ताईंची पालखी शनिवारी जालना जिल्ह्यात दाखल झाली. रिमझिम कोसळणारा पाऊस आणि त्यात ओसंडून वाहणारा वारकऱ्यांचा उत्साह, यामुळे संपूर्ण जालना जिल्हा विठ्ठलमय झाला आहे. वाघरूळ सीमेवर प्रशासनाकडून स्वागत जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुलडाणा आणि जालना जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वाघरुळ येथे…

Read More

Nagpur: Bavankule Slams Uddhav Thackeray On Hindutva

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामातील कथित अनियमितता आणि दानपेट्यांच्या चोरीच्या मुद्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाच तारखेला राज्यभरात ‘घंटानाद’ आणि ‘रामरक्षा आंदोलन’ करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणे . उद्धव ठाकरेंना चांगली बुद्धी सुचली, आता ती टिकवावी उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर टीका करताना बावनकुळे म्हणाले, “जेव्हा संपूर्ण देश आणि राज्याचा आग्रह…

Read More

जिल्हा बँक निवडणूक:पैठणमध्ये 4 तासांत 86.66 टक्के मतदान, आमदार विलास भुमरेंनी बजावला मतदानाचा हक्क

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी शनिवारी पैठण येथील उपनिबंधक कार्यालयातील मतदान केंद्रावर सकाळी ८ ते १२ या चार तासांत उत्साहात मतदान झाले. विविध मतदारसंघांतील मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत दुपारी १२ वाजेपर्यंत ८६.६६ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत आमदार विलास भुमरे यांनीही मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या उपस्थितीमुळे मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांची…

Read More

6 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस-वादळाचा धोका:गरज असेल तरच बाहेर पडा, मुख्यमंत्र्यांच्या राज्याला महत्त्वाच्या सूचना

मुंबईसह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, मुंबई महानगर प्रदेशात सलग कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाचा हा जोर अपेक्षेपेक्षा जास्त असून, येत्या 6 तारखेपर्यंत हे संकट कायम राहणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. मुंबई-ठाण्यात…

Read More

'आम्ही रस्त्यावर, ते फक्त पोस्ट टाकतात':अमित साटमांचा राज ठाकरेंना टोला, संदीप देशपांडेंचा पलटवार- तुंबलेल्या पाण्यात फिरणं म्हणजे फिल्डवर असणं नव्हे

मुंबईतील मुसळधार पाऊस, रस्त्यांवरील पाणी साचणे, साकीनाका मॅनहोल मृत्यू प्रकरण आणि महापालिकेच्या कामकाजावरून सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता नवे वळण मिळाले आहे. साकीनाका मॅनहोल मृत्यू प्रकरणात भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमित साटम हे हसल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. यावरूनच आज राज ठाकरे यांनी या असंवेदनशीलतेवरून मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले. आता अमित साटम…

Read More