Headlines

पुण्यात पावसाचा हाहाकार:एका सोसायटीची सीमाभिंत कोसळली; शहरात 30 ठिकाणी झाडे पडली, 18 वाहनांचे नुकसान

पुण्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कात्रजमधील जांभुळवाडी येथील एका सोसायटीची सीमाभिंत रविवारी पहाटे कोसळली. या घटनेत नऊ मोटारी आणि नऊ दुचाकींसह एकूण १८ वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. समृद्धी लेक सोसायटीची ही सीमाभिंत पार्किंग शेडवर कोसळली. घटनेची माहिती मिळताच कात्रज आणि सिंहगड रस्ता अग्निशमन केंद्रातील जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव…

Read More

वारीत अत्यावश्यक रुग्णांकरिता प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा:आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची माहिती, 'आरोग्य संपन्न वारी' मोबाईल ॲपचे लाँचिंग

आषाढी यात्रेसाठी पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी भाविक येत असतात. त्यांच्या आरोग्यासाठी पालखी मार्गावर तसेच आषाढी यात्रा कालावधीत यावर्षीपासून अत्यावश्यक रुग्णांकरिता नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांना पालखी मार्ग व तळांवर देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांबाबतच्या…

Read More

संत नामदेव महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान:हिंगोलीत सोमवारी रिंगण सोहळा रंगणार, पालखी सोहळ्याचे 31 वे वर्ष

संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथून संत नामदेव महाराजांच्या पायी पालखी सोहळयाचे रविवारी ता. ५ पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. यावेळी शेकडो भाविक पालखी सोहळ्यात सहभागी झाले असून सोमवारी हिंगोलीत रिंगण सोहळा रंगणार आहे. पालखीचे हे ३१ वे वर्ष आहे. नर्सी नामदेव येथून दुपारी रामकृष्ण हरीच्या गजरात पालखी निघाली. यावेळी संस्थानच्या परिसरात पालखीचे पूजन…

Read More

Kalyan Kale Alleges Dhanashakti Win

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महायुतीने २० पैकी १८ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या विजयावर काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी गंभीर आरोप केला आहे. ही निवडणूक ‘धनशक्ती’च्या जोरावर जिंकली असून, मतदारांना कंटाळा येईपर्यं . रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून जिल्हा मध्यवर्ती बँकेत मतमोजणीला सुरुवात झाली. महायुतीने संचालक मंडळ निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले….

Read More

स्पर्धा परिक्षेचे शुल्क कमी करून परिक्षा वेळेत घ्यावात:छात्रों की गूंज’ कार्यक्रमातून विद्यार्थ्यांची मागणी, विद्यार्थीनींनी मांडल्या व्यथा

शासनाने स्पर्धा परिक्षेचे शुल्क कमी करावे तसेच या परिक्षा ठरलेल्या वेळेतच घ्यावात अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी रविवारी ता. ५ आयोजित छात्रों की गूंज कार्यक्रमात व्यक्त केली आहे. यावेळी विद्यार्थीनींनी परिक्षेची तयारी करतांना येणाऱ्या अडचणी व व्यथा मांडल्या. हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय येथे आज जिल्हा काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस व एनएसयुआयच्या वतीने ‘छात्रों की गूंज’ या…

Read More

Kurla Tree Fall Death; Mumbai BMC Anger Over Negligence

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईत धोकादायक झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या घटनांची मालिका सुरूच आहे. या घटनांमध्ये निष्पाप मुंबईकरांचे बळी जात आहेत. कुर्ला येथे एका दुकानावर झाड कोसळून ६३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घ . मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला येथील नौपाडा परिसरात महापालिकेच्या शाळेजवळील एका दुकानावर रविवारी अचानक एक भलेमोठे झाड कोसळले. स्थानिक लोकप्रतिनिधींनी…

Read More

Amit Satam Statement Sparks Aggression; MNS Activists Show Black Flags in Bhandup

काही दिवसांपूर्वी विधीमंडळ परिसरातील एका दुर्घटनेवर हसल्याचा अमित साटम यांचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओवरून राज ठाकरे यांनी साटम आणि भाजपवर सडकून टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना अमित साटम यांनी थेट राज ठाकरे . मनसैनिकांचा आक्रमक पवित्रा: बॅनरला फासले काळे अमित साटम यांच्या या वक्तव्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे…

Read More

मुलांना आजी-आजोबांकडे सोपवा- मोहन भागवत:मानसिक मशागतीसाठी 'गुगल बाबा'ऐवजी कौटुंबिक संस्कारांवर भर द्या

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मुलांना मोबाईलऐवजी आजी-आजोबांकडे सोपवण्याचे आवाहन केले आहे. नागपूर येथे ‘सन्मार्ग माइंड वेलनेस व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या’ उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. मुलांच्या नैसर्गिक मानसिक जडणघडणीसाठी हे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर उपस्थित होते. डॉ. भागवत म्हणाले की, पूर्वीच्या काळी आजी-आजोबा नातवंडांना…

Read More

रामरक्षा' नव्हे, आधी ‘पक्षरक्षा’ अन् ‘आमदाररक्षा’ आंदोलन करा:टॉलस्टॉयच्या म्हाताऱ्याची गोष्ट उद्धव ठाकरेंनाच तंतोतंत लागू होते; भाजपचा राऊतांना टोला

उद्धव ठाकरे यांनी प्रथम आपल्या पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा म्हणत राऊत यांच्या ‘राम रक्षा आंदोलन’ महाराष्ट्राबाहेर नेण्याच्या दाव्यावर बन यांनी टीका केली आहे. महाराष्ट्राबाहेर विस्ताराच्या घोषणा करण्यापेक्षा पक्षातील संघटनात्मक आव्हानांवर लक्ष केंद्रित करावे. तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात घरातून कारभार केला आता प्रभू श्रीरामांच्या नावाचा वापर हा राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी केला जात आहे,…

Read More

लाखनी नगरपंचायतीत राजकीय भूकंप?:नगराध्यक्ष अन् उपाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल, 17 पैकी 13 नगरसेवकांचे बंड, 7 जुलैच्या विशेष सभेकडे लक्ष

भंडारा – स्थानिक नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष त्रिवेणी मनोज पोहरकर व उपाध्यक्ष लता रमेश रोडे यांच्यावर 13 नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव 1 जुलै रोजी जिल्हाधिकारी भंडारा यांच्याकडे दाखल केला आहे. आता हा अविश्वास प्रस्ताव मंजूर होतो की बारगळतो? याकडे नगरवासीयांच्या नजरा लागल्या आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून 17 सदस्यीय लाखनी नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर 2021 व जानेवारी 2022 अशा…

Read More