Headlines

“पडावं स्वतःच्या प्रेमात अन् पाहावं देवानं काय दिलंय…’:अनघा तांबोळींच्या काव्याने रंगले वसंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प‎

“साहित्य, कथा, कादंबरी आणि काव्य हे दुसरं काही नसून आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांचा आणि समाजमनाचा आरसा असते,” असा सूर वसंत व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पातून उमटला. “कविता ऐकताना माणूस त्यात पूर्णपणे हरवून जातो; त्यातील आनंद, दुःख, प्रेम आणि . केवळ कौतुक आणि मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन कवयित्री तांबोळी यांनी त्यांच्या रचनांमधून आजच्या सामाजिक वास्तवातील विदारकता आणि मध्यमवर्गीयांचे…

Read More

दुहेरी मार्गावरून 1 जूनपासून प्रथमच 110किमीच्या वेगाने धावणार 27 रेल्वे:30 मे ला विसापूर ते सारोळादरम्यान होणार शेवटची चाचणी; प्रवाशांचा वाचणार वेळ‎

. दौंड-मनमाड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम आता टप्प्यात पोहोचले आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून सोमवारी (१८ मे) अकोळनेर ते निंबळक या विभागातील १८.२१ किमी अंतरावर ताशी १३० किमी या वेगाने हायस्पीड इलेक्ट्रिक इंजिनची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर ३० मे रोजी या रेल्वे दुहेरीकरणाचा अंतिम टप्पा असलेल्या विसापूर ते सारोळा दरम्यान १६ किमी अंतरावर रेल्वेची…

Read More

नवउद्योजकांसाठी तब्बल 60 कोटींच्या कर्जास मंजुरी:सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे "एमएसएमई क्रेडिट आऊटरीच'' मेळावा‎

देशातील पहिली स्वदेशी राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’च्या अहिल्यानगर विभागातर्फे आयोजित भव्य ‘एमएसएमई क्रेडिट आऊटरीच कार्यक्रम’ व उद्यमिता मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात जिल्ह्यातील नवउद्योजकांसाठी तब्बल ६० कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी देण्यात आली. एमआयडीसी परिसरात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन क्षेत्रीय प्रबंधक नरेशकुमार दुबे आणि ‘आमी’चे अध्यक्ष जयरथ खकाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी…

Read More

कांद्याच्या हमीभावासाठी पंतप्रधानांची भेट घेणार:ताहाराबाद येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे आश्वासन‎

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि कांद्याला योग्य भाव मिळवून देण्यासाठी आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट घेणार आहोत. कांद्याला कमीतकमी १५ रुपये प्रतिकिलो प्रमाणे भाव मिळावा, यासाठी आमचे विशेष प्रयत्न राहतील, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. ताहाराबाद (ता. बागलाण)…

Read More

टंचाई:मोसम खोऱ्यात 45 हून अधिक‎गावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर‎, हरणबारी धरणातून तिसरे आवर्तन सोडण्याची नागरिकांची मागणी‎

मोसम खोऱ्यासह संपूर्ण बागलाण तालुक्यात यंदा उन्हाची तीव्रता कमालीची वाढली असून, भूजल पातळी खालावल्याने अनेक गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, हरणबारी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठीचे तिसरे आवर्तन तातडीने सोडावे, अशी मागणी मोसम खोऱ्यातील नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, हे आवर्तन सोडण्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून, पुढील आठवड्यात त्याला मंजुरी मिळण्याची…

Read More

3 वर्षांपासून मोसंबीला भाव मिळेना; 3,500 हेक्टरवरील झाडांवर कुऱ्हाड:जिल्ह्यात 24 हजार 67 हेक्टर मोसंबीचे क्षेत्र, वर्षाचे उत्पन्न 30 हजार‎

उत्पादनाची हमी असल्याने काही वर्षांत जिल्ह्यातील शेतकरी मोसंबी लागवडीकडे वळले होते. त्यानुसार २४ हजार ६७ हेक्टरवर प्रत्यक्ष लागवड करण्यात आली. मात्र, तीन वर्षांपासून ५ ते ८ रुपयांचा किरकोळ भाव मिळत आहे. त्यामुळे मोसंबीसाठी वर्षभर केलेला खर्चही पदरी पडत नाही. परिणामी, तीन वर्षांत ३,५०० हेक्टरवरील झाडांवर कुऱ्हाड फिरविल्याची विदारक स्थिती आहे. बाजारपेठेतील मंदी, मिळणारा कवडीमोल भाव…

Read More

Uterine rental racket on social media offering Rs 8 lakhs, deal made through chatting, calls

सोशल मीडियावरून सरोगसीचे रॅकेट चालत असल्याची धक्कादायक बाब ‘दिव्य मराठी’ च्या स्टिंगमधून पुढे आली आहे. विवाहितांनाच नव्हे तर अविवाहित युवतींनाही सोशल मीडियावर घेरतात. त्यांना बेंगळुरू, कोलकाता, हैदराबादला बोलावतात. ७ ते ८ लाखांचे आमिष दाखवून त्यांचे . पेमेंट पद्धत : गर्भधारणा ते प्रसूतीपर्यंत टप्प्याटप्प्याने पैसे रिलीज केले जातात गर्भधारणेवेळी १० टक्के रक्कम दिली जाते. त्यानंतर बाळाच्या…

Read More

नीट प्रकरण:पुण्यात तिसरी कारवाई, बॉटनीच्या प्राध्यापिकेला अटक, मॉडर्न कॉलेजमध्ये 24 वर्षांपासून कार्यरत मनीषा मांढरे पेपरफुटीत सूत्रधार

नीट पेपर फुटीप्रकरणी पुण्यातील मॉडर्न कॉलेजात २४ वर्षांपासून इयत्ता ११, १२ वीला बॉटनी विषय शिकवणाऱ्या आणि नीट परीक्षेच्या पेपर सेटर प्रा. मनीषा गुरुनाथ मांढरेला दिल्लीतून अटक करण्यात आली. लातूरचे केमिस्ट्रीचे पेपर सेटर प्रा. पी. व्ही. कुलकर्णी, पुण्यातील ब्यूटिशियन व्यावसायिक मनीषा वाघमारे यांच्याशी हातमिळवणी करून तिने बॉटनी (वनस्पतीशास्त्र), झुऑलॉजी (प्राणिशास्त्र) विषयाचे प्रश्न फोडून काही विद्यार्थ्यांना दिल्याचा…

Read More

निवडणुकांमधील पराभवानंतर आता उद्धवसेना पक्षाची रचना बदलणार:जि. प. गटाऐवजी पं. स. गणस्तरावर विभागप्रमुख

शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून जाणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच, आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संघटनेने नव्याने बांधणीला सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात पक्षाला मुळापासून बळकट करण्यासाठी आणि सातत्याने होणाऱ्या पराभवाचा दणका रोखण्यासाठी शिवसेना आता तळागाळात नवे संघटनात्मक बदल केले जात आहेत. या नव्या प्रयोगांतर्गत आता पंचायत समिती गणाच्या पातळीवर एक विभागप्रमुख आणि दोन उपविभागप्रमुख नेमले…

Read More

शहीद सुखदेव थापर यांना जयंतीनिमित्त विचारांनी अभिवादन:नवजागरण समितीने अमरावतीत आयोजित केला कार्यक्रम

अमरावती येथे नवजागरण मनिषी व क्रांतिकारी स्मरण समितीच्या स्थानिक शाखेने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारी शहीद सुखदेव थापर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित केला. महावीर नगर येथील समिती कार्यालयात क्रांतिकारी विचारांच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात शहीद सुखदेव थापर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘साम्राज्यवाद मुर्दाबाद’, ‘शहीद…

Read More