Headlines

मोठी दुर्घटना! पुण्यात दोन मजली इमारत कोसळली:14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. मोशी कचरा डेपो परिसरातील दोन मजली इमारत अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत सुमारे 10 ते 14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोशी कचरा डेपोजवळील दोन मजली इमारत…

Read More

नागपुरात चाकूचा धाक दाखवत दाम्पत्याला लुटलं- VIDEO:कारच्या मागील सीटवर बसलेल्या मुलीने कॅमेऱ्यात कैद केला थरार

प्रवासात रस्ता चुकल्यानंतर अनोळखी व्यक्तींना रस्ता विचारण्याची आपली सवय असते, पण हीच सवय नागपुरातील एका दाम्पत्याच्या चांगलीच अंगलट आली आहे. नागपूरजवळील बुटीबोरी परिसरात रस्ता विचारण्याच्या बहाण्याने दोन दुचाकीस्वारांनी एका कारचा पाठलाग केला आणि भररस्त्यात चाकूचा धाक दाखवत दाम्पत्याकडील तब्बल सव्वा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटले. या संपूर्ण थरारक घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ कारमध्ये मागे…

Read More

'फसवी कर्जमाफी' म्हणत रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल:बैठक ऐनवेळी रद्द, 36 लाख शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप करत आंदोलनाचा इशारा

राज्यातील ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ ही प्रत्यक्षात कर्जमाफी नसून ‘कर्जवसुली योजना’ असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेतकरी कर्जमाफीसंदर्भातील समितीचे प्रमुख प्रवीणसिंह परदेशी यांच्यासोबत होणारी बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्यास इच्छुक नसल्याचा आरोपही त्यांनी केला. या कथित अन्यायाविरोधात…

Read More

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर पर्यटकांना लुटणारे पोलिस गजाआड:'ड्रग्ज'ची भीती दाखवून मागितली 5 लाखांची खंडणी

पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर लोणावळ्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची गाडी अडवून त्यांच्याकडून ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गाडीत अमली पदार्थ (ड्रग्ज) असल्याचा खोटा आरोप करत ही खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, खंडाळा महामार्ग पोलीस केंद्रातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण पाच आरोपींना अटक करण्यात…

Read More

No Smashan Proof, No Nidhi!; Maharashtra Ministers Big Announcement

राज्यातील ग्रामीण भागात मरणानंतरही मरणयातना संपत नसल्याचे अत्यंत विदारक चित्र आहे. राज्यात आजही तब्बल 7 हजार 444 (20 टक्के) गावांमध्ये स्मशानभूमीच उपलब्ध नाही. परिणामी, पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून वाट काढत किंवा उघड्यावर अंतिम संस्कार करावे लागतात. . गावात स्मशानभूमी असल्याचा दाखला द्या, तरच निधी! राज्यातील स्मशानभूमींच्या दुरवस्थेवर आणि उपलब्धतेवर बोलताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की,…

Read More

केडीएमसी मारहाण प्रकरणी कठोर कारवाई करणार:उद्धव ठाकरेंच्या काळात पालघर साधू हत्याकांड विसरलात का?- भाजप

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टर, नर्स आणि सुरक्षा रक्षकांना झालेल्या मारहाण प्रकरणाची राज्य सरकारने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्या कोणालाही, कोणत्याही प्रकारचे राजकीय संरक्षण दिले जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह विभाग या प्रकरणात कायद्यानुसार कठोर कारवाई करणार आहेत, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. उबाठा गटाचे…

Read More

सत्ताधाऱ्यांना कायदा हातात घेण्याचे 'लायसन्स' मिळालेय का?:ज्या प्रभू श्रीरामाच्या कृपेने सत्तेत आले, त्यांच्याच दानपेटीवर दरोडा टाकला- भास्कर जाधव

राज्यात सध्या सत्ताधारी पक्षाचे लोक अत्यंत बेजबाबदारपणे वागत असून त्यांना कोणालाही मारण्याचे आणि कुठेही कायदा हातात घेण्याचे जणू ‘लायसन्स’च मिळाले आहे. तुम्ही काहीही करा, तुमच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही, अशाच अविर्भावात सत्ताधारी पक्षाचे वर्तन सुरू आहे, अशा तीव्र शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे….

Read More

भांडुपमध्ये बेस्ट ई-बसचा भीषण अपघात:पादचाऱ्याला चिरडलं, तीन दुचाकी आणि रिक्षेचंही मोठं नुकसान

मुंबईकरांची ‘लाइफलाईन’ आणि सुरक्षित प्रवास अशी ओळख असलेली ‘बेस्ट’ बस आता रस्त्यांवरील पादचाऱ्यांसाठी जीवघेणी ठरू लागली आहे का? असा संतप्त सवाल निर्माण करणारी एक भीषण घटना भांडुपमधून समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी दादरमध्ये बेस्ट बसचा अपघात झाला होता. आता भांडुपच्या कोकण नगर परिसरात एका अनियंत्रित ई-बसने रस्त्यावर अक्षरशः धुमाकूळ घातला. या भरधाव बसने रस्त्यावरील अनेक…

Read More

7 सप्टेंबरला ठाकरे गटातील 15 आमदार जाणार:हिंदुस्थानी भाऊचा दावा, संजय राऊतांना 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत टोला

शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. एकीकडे अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित दान चोरीच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी ‘रामरक्षा आंदोलन’ पुकारले आहे. दुसरीकडे सोशल मीडियावरील प्रसिद्ध रीलस्टार ‘हिंदुस्थानी भाऊ’ याने एक दावा केला आहे. येत्या ७ सप्टेंबरला ठाकरे गटाचे तब्बल १५ आमदार आणि २५ नगरसेवक पक्ष सोडणार असल्याचा मोठा दावा त्याने इन्स्टाग्रामवर…

Read More

50 हजार वारकऱ्यांसह निवृत्तीनाथांची दिंडी लोणीत:ज्ञानोबा-तुकाराम,पांडुरंग हरीच्या जयघोषाने सहकार पंढरी दुमदुमली‎

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे (मोठी दिंडी) मंगळवारी लोणीत भक्तिमय आणि अभूतपूर्व उत्साहात आगमन झाले. ६५ दिंड्या आणि तब्बल ५० हजार वारकऱ्यांचा समावेश असलेला हा भव्य सोहळा सहकार पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणी बुद्रूक (ता. राहाता) येथे दाखल होताच संपूर्ण परिसर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेला. टाळ-मृदंगाचा कडकडाट आणि भगव्या पताक्यांनी आसमंत उजळून निघाला होता….

Read More