Headlines

भूकंपाच्या सलग 4 धक्क्यांनी हिंगोली जिल्हा हादरला:शिरली परिसरात 4.6 रिश्टर स्केलच्या तीव्रतेमुळे नागरिकांची रात्र जागून, अनेक घरांना तडे

हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी ता. 9 पहाटे अवघ्या दोन तासात चार भूकंपाच्या धक्याने जिल्हा हादरला असून शिरळी परिसरात 4.6 रिश्‍टर स्केलची नोंद झाली आहे. या भूकंपाच्या धक्यांमुळे नागरिकांनी रात्र जागून काढली. हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षापासून भूकंपाची मालिकाच सुरु आहे. सतत होणाऱ्या भूकंपामुळे नागरीक भयभित झाले आहेत. गुरुवारी ता. 9 पहाटे 1 वाजून 37 मिनिटांनी 4.6…

Read More

आषाढी यात्रा काळात पावसाची शक्यता; यंदा 20 पर्यायी पत्राशेड:जर्मन हँगर मंडप, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची भाविकांच्या दर्शन रांगेची तयारी‎

यंदाची आषाढी एकादशी जुलै महिन्याच्या अखेरीस येत असल्याने, यात्रेदरम्यान संभाव्य पावसाचा अंदाज घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. मंदिर परिसरातील नवीन दर्शन मंडपाच्या कामामुळे दरवर . पंढरपुरात दरवर्षी आषाढी यात्रेला येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी रिद्धी-सिद्धी गणपती दर्शन रांगेत साधारण १० ते १२ पत्राशेड उभारले जातात. परंतु, यंदा…

Read More

निरोगी जीवनशैलीसाठी ध्यान अन् सकारात्मक विचार आवश्यक:निसर्गोपचार तज्ज्ञ हेमा सेलोत यांचे प्रतिपादन, केला पर्यावरण संवर्धनाचा निर्धार‎

आजच्या धावपळीच्या जीवनात नैराश्‍य, तणाव आणि मानसिक अस्वस्थता ही अनेक गंभीर आजारांची प्रमुख कारणे बनत आहेत. या समस्यांवर औषधांपेक्षा सकारात्मक विचार, नियमित योग, ध्यान आणि शिस्तबद्ध जीवनशैली हा अधिक प्रभावी उपाय आहे, असे प्रतिपादन निसर्गोपचार तज्ज्ञ हेमा सेलोत यांनी केले. महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहावे, पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक व्हावी आणि प्रत्येक…

Read More

बागलाण फाउंडेशनची पंढरपूर सायकल वारी‎:9 ते 11 जुलैदरम्यान 51 सायकलपटूंचा 410 किमी प्रवास‎

आषाढी एकादशीनिमित्त बागलाण सायकल फाउंडेशनच्या वतीने ९ ते ११ जुलै या कालावधीत सटाणा ते पंढरपूर पर्यावरणपूरक सायकल वारी आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमातून आरोग्यदायी जीवनशैली, पर्यावरण संवर्धन आणि इंधन बचतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक सोनवणे यांनी दिली. यावर्षीच्या सायकल वारीत एकूण ५१ सायकलपटू सहभागी होणार आहे. सुमारे ४१० किलोमीटरचा…

Read More

ना सुविधा, ना देखरेख; कावसानकर स्टेडियम अतिक्रमणाच्या विळख्यात:शहरातील स्टेडियम परिसराला अतिक्रमणाचा विळखा‎

ग्रामीण भागातील गुणवंत आणि गरजू खेळाडूंना स्थानिक पातळीवरच दर्जेदार व आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पैठण येथे कावसानकर स्टेडियम उभारण्यात आले आहे. मात्र, हे स्टेडियम प्रशासकीय अनास्थेमुळे गैरसोयीचे बनले आहे. आज ना नियमित देखरेख आहे, ना खेळाडूंसाठी आवश्यक मूलभूत सुविधा. त्यातच आता स्टेडीयम परिसराला बेकायदेशीर अतिक्रमणाने वेढल्यामुळे अस्तित्वच धोक्यात आले आहे. परिसरातील अतिक्रमणे…

Read More

नांदूर मधमेश्वरमधून 18,403 क्युसेकने आवक:गेल्या 24 तासांत धरण क्षेत्रात केवळ 10 मिलीमीटर पावसाची नोंद‎

पैठण नाशिक जिल्हा आणि गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. या पुरामुळे नाशिकमधील नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडी धरणाच्या दिशेने १८ हजार ४०३ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी गुरुवारी सकाळपर्यंत जायकवाडी धरणाच्या जलाशयात दाखल होण्याची शक्यता असून, यामुळे धरणाच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ होईल,…

Read More

सीमाप्रश्नी बैठकीनंतर पवारांची शिंदेंसाेबत बंद दाराआड चर्चा:30 वर्षांनंतर विधानभवनात अशा बैठकीस पवार हजर

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी बुधवारी विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात ३० वर्षांनंतर विधानभवनातील अशा बैठकीस शरद पवार उपस्थित राहिले. बैठकीनंतर ते थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनात गेले. त्यामुळे कॅबिनेट बैठक सोडून शिंदे स्वत:च्या दालनात पोहोचले. तेथे पवारांनी आधी त्यांच्याशी बंद दाराआड २० मिनिटे चर्चा केली. नंतर पवारांनी स्वत:च्या पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. पवारांचे एकनाथ…

Read More

बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, काँग्रेसचा प्रशासनाला इशारा:कंपन्यांवर गुन्हे दाखल न झाल्यास 'जोडे मारा' आंदोलन

तिवसा, प्रतिनिधी: तालुक्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांमुळे झालेल्या लाखो रुपयांच्या नुकसानीविरोधात तालुका काँग्रेस कमिटीने आज तीव्र आंदोलन केले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांना इशारा निवेदन सादर करत, संबंधित कंपन्यांवर कारवाई न झाल्यास ‘जोडे मारा’ आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बोगस बियाण्याचे पोते ठेवून आपला तीव्र निषेध नोंदवला. निकृष्ट…

Read More

अमरावती जिल्ह्यात पाऊस ८८% वर; ६ तालुक्यांनी ओलांडली सरासरी:चांदूर बाजारमध्ये सर्वाधिक १२०.९%, अचलपुरात ६६.१% पाऊस

अमरावती जिल्ह्यात सध्या पावसाळी वातावरण असले तरी, १४ पैकी केवळ सहा तालुक्यांनीच सरासरी पावसाची नोंद ओलांडली आहे. जिल्ह्याचा एकूण पाऊस गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत ८८.९ टक्क्यांवर आहे. चांदूर बाजार तालुक्यात सर्वाधिक १२०.९ टक्के पावसाची नोंद झाली असून, अचलपूर तालुक्यात सर्वात कमी ६६.१ टक्के पाऊस झाला आहे. १ जून ते ८ जुलै या कालावधीत जिल्ह्यात एकूण…

Read More

सामरा नगरातील कुंटनखान्यावर पोलिसांची कारवाई:३ महिला, १ पुरुष आणि संचालिका ताब्यात

अमरावती येथील सामरा नगरात सुरू असलेल्या एका कुंटनखान्यावर राजापेठ पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत देहव्यापारात गुंतलेल्या तीन महिला, एक पुरुष ग्राहक आणि देहव्यापाराचे संचालन करणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेण्यात आले. सामरा नगरातील एका निवासी इमारतीमधील फ्लॅटमध्ये हा कुंटनखाना सुरू होता. अनेक दिवसांपासून या फ्लॅटमध्ये संशयास्पद लोकांची ये-जा सुरू असल्याची माहिती होती, मात्र निवासी भाग असल्याने…

Read More