Headlines

पावसाळी अधिवेशन:विधीमंडळाच्या कामकाजाला सुरुवात; विधानसभेत पूरस्थितीवरून सरकार-विरोधक आमनेसामने

महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तेरावा दिवस आहे. दोन्ही सभागृहांच्या विशेष कामकाजाला सुरुवात झाली आहे. आजच्या 14 व्या दिवशी विधानसभेत ‘लक्षवेधी’च्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी जनतेच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. आज विधीमंडळात अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले जाणार असून, विरोधक विविध प्रश्नांवरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे, काल विधीमंडळात मुंबईतील…

Read More

गद्दाराच्या छताखाली बैठका कशासाठी?:शरद पवारांना बैठकीसाठी अख्खे विधान भवन काय ओस पडले होते? पवारांच्या बैठकीवरून राऊतांचा टोला

शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत, यात शंका नाही. मात्र, ज्यांनी आपले सरकार पाडले, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका घेतल्याने नेत्यांची विश्वासार्हता कमी होते आणि घसरते, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. तर एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला भ्रष्टाचार आणि गद्दारीची कीड लावली आहे. पवारांना…

Read More

BJP-Congress Only Major Parties for 2029 Polls: Harshvardhan Sapkal

देशात सध्या भाजप आणि काँग्रेस हे दोनच प्रमुख पक्ष उरले असून 2029 ची आगामी निवडणूक याच दोन पक्षाच्या माध्यमातून लढली जाईल. इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी एकत्रितपणे भाजपविरोधात लढावे, हीच काँग्रेसची भूमिका आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपका . नाशिकमधील एका घटनेचा हवाला देत हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटेपणाचा आरोप केला. ते म्हणाले,…

Read More

कारभाराचे धिंडवडे:मोहोळ मध्ये झेडपी मुलींच्या शाळेत अस्वच्छता, स्वच्छतागृहाचा अभाव, आहार निकृष्टतेचा ठपका

मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने नियुक्त केलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या अचानक केलेल्या पाहणीत मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचा धक्कादायक कारभार चव्हाट्यावर आला आहे. तालुक्यातील तपासणी केलेल्या ६ पैकी तब्बल ५ शाळांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या. मुलींच्या शाळेत अस्वच्छता, प्रांगणातील साचलेले पाणी आणि विद्यार्थ्यांना दिला जाणारा निकृष्ट दर्जाचा पोषण आहार यावरून समितीने प्रशासनावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले….

Read More

वनमहोत्सवानिमित्त महागाव येथे स्वस्तिक पद्धतीने 1000 वृक्षांची लागवड करणार:ग्रामस्थ, राष्ट्रीय सेवा योजनेत स्वयंसेवकांनी नोंदवला उत्स्फूर्त सहभाग‎

पावसाच्या सुरुवातीचा कालावधी वृक्षारोपणासाठी अत्यंत अनुकूल असल्याने १ ते ७ जुलै या कालावधीत “वन महोत्सव’ अंतर्गत बार्शीटाकळी तालुक्यातील महागाव येथे स्वस्तिक पद्धतीने एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला. . उपक्रमाचे नियोजन व कार्यान्वयन एस. नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या वृक्षारोपण मोहिमेत श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय,…

Read More

सोयाबीन न उगवल्याच्या 197 तक्रारी:पावसाच्या आगमनामुळे खरिपाची 57% पेरणी पूर्ण; उगवण न झाल्याने शेतकऱ्यांसमाेर आर्थिक संकट‎

जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणीने वेग घेतला असून आतापर्यंत सरासरी क्षेत्राच्या ५७ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनला सर्वाधिक पसंती दिली आहे. तरीही, पेरलेले सोयाबीनचे बियाणे न उगवल्याने (जर्मिनेशन प्रॉब्लेम) शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. संपूर्ण जिल्ह्यातून कृषी विभागाकडे सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या एकूण १९७ तक्रारी आल्या आहेत. यावर्षी जिल्ह्यात सोयाबीनची सर्वाधिक म्हणजेच १,१८,७६५.७ हेक्टरवर पेरणी…

Read More

आरक्षणाच्या रक्षणासाठी लढणार; संवैधानिक हक्कासाठी करणार संघर्ष:उपवर्गीकरण विरोधी संघर्ष परिषदेत व्यक्त करण्यात आला निर्धार‎

शहर काँग्रेस कमिटी व समाज क्रांती आघाडीच्या संयुक्त विद्यमाने उपवर्गीकरणविरोधी संघर्ष परिषद आयोजित करण्यात आली. अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे संरक्षण, संवैधानिक हक्क अबाधित राखणे, उपवर्गीकरणाच्या विरोधात जनजागृती करणे या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली. विविध सामाजिक, राजकीय, विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मोठ्या संख्येने नागरिकही उपस्थित होते. परिषदेच्या शेवटी उपस्थितांनी संविधानाच्या संरक्षणासाठी, अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या…

Read More

नमुना गल्लीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खोलीमधील गॅस सिलिंडरला आग:घरापर्यंत जाण्याचा मार्ग अरुंद, अग्निशमन विभागाची तारांबळ‎

शहरातील नमूना गल्ली क्र. ५, काळे हॉस्पीटलजवळ असलेल्या घरातील सिलिंडरला भीषण आग लागल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले. विशेष बाब अशी की, वरच्या मजल्यावर ही आग लागली तेथे विद्यार्थी राहात होते. बरे घरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग अरुंद असल्याने अग्निशमन विभागाला आगीपर्यंत पोहोचणे सहज शक्य होत नसल्याने जवानांची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर…

Read More

राज्यात पावसाचा जोर ओसरला:विदर्भाला विश्रांती! तरीही पुणे-साताऱ्यासह 17 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

गेले चार दिवस संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर आज थोडा कमी झाला आहे. सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, आज पावसाने काहीशी उसंत घेतल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. पावसाचा जोर कमी…

Read More

33 पालख्या अन् 204 दिंड्याचे माढा तालुक्यामध्ये होणार स्वागत:मराठवाड्याचे प्रवेशद्वार वैष्णवांच्या मेळ्यासाठी सज्ज; कुर्डुवाडीत भाविकांची लगबग

कुर्डुवाडी हे रेल्वेचे जंक्शन असून मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा यांना जोडणाऱ्या कुर्डुवाडी शहरात व परिसरात आषाढी एकादशी निमित्त येणाऱ्या दिंड्या पालखी सोहळ्यांच्या स्वागतासाठी तालुका व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. आषाढी वारी आता काही दिवसांवर आली असून माढा तालुक्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या ३३ पालख्या व २०४ दिंड्यांच्या स्वागतासाठी येथील शासकीय यंत्रणा…

Read More