Headlines

48 कारखान्यांकडे 298 कोटींची अजून थकबाकी:विधान परिषदेत थकबाकीचा विषय गाजला

राज्यातील २०२५-२६ च्या ऊस गाळप हंगामात एकूण २१० साखर कारखान्यांनी १०४५.६३ लाख मेट्रिक टन (एलएमटी) ऊसाचे गाळप केले असून, ३० जून २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना ४०,१४८ कोटी रुपयांची प्रत्यक्ष एफआरपी अदा करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष एफआरपी भुगतानाचे प्रमाण ९९.२६ टक्क्यांवर पोहोचले असले, तरीही ४८ कारखान्यांकडे तब्बल २९८ कोटी रुपयांची एफआरपी थकबाकी असल्याचे साखर आयुक्तालयाच्या अद्ययावत…

Read More

श्री शिवाजी महाविद्यालयात नव्या सत्राचा दीक्षारंभ सुरू:प्राचार्य डॉ. मेटे यांचा हितोपदेश, 11 जुलैपर्यंत विविध उपक्रम

अमरावती येथील श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात २०२६-२७ या शैक्षणिक सत्राचा दीक्षारंभ कार्यक्रम सुरू झाला आहे. या कार्यक्रमात नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना महाविद्यालयाविषयी आवश्यक माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. प्राचार्य डॉ. महेंद्र मेटे यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना हितोपदेश केला. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी हा दीक्षारंभ कार्यक्रम आयोजित केला जातो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी…

Read More

29 शेतकऱ्यांच्या शेतीचा वीजपुरवठा दीड महिन्यांपासून खंडित:कळमजापूरजवळ ट्रान्सफॉर्मर जळाल्याने महावितरणवर संताप, तातडीने डीपी बदलण्याची मागणी

चांदूर रेल्वे तालुक्यातील कळमजापूर शेतशिवारात पळसखेड पांधन डीपीवरील ट्रान्सफॉर्मर जळाल्याने तब्बल दीड महिन्यांपासून २९ शेतकऱ्यांच्या शेतीचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे ही समस्या निर्माण झाली असून, शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने पिकांना वेळेवर सिंचन करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, वीजपुरवठा बंद असल्याने शेतकऱ्यांना त्यांचे वीज पंप सुरू…

Read More

मुख्याध्यापक ठाकरे यांनी शाळेला दिला 51 हजारांचा निधी:सेवापूर्तीनिमित्त खुल्या जीपमधून स्वागत, डिजिटल पॅनल भेट

नांदगाव खंडेश्वर येथील नांदगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रदीप ठाकरे यांनी आपल्या सेवापूर्तीनिमित्त शाळेला ५१ हजार रुपयांचा निधी अर्पण केला. शाळेने त्यांचे एका दिमाखदार सोहळ्यात स्वागत केले, ज्यात त्यांना खुल्या जीपमधून आणण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले यांनी भूषवले. शिक्षक महासंघाचे संस्थापक शेखर भोयर, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद अशोक देशमुख…

Read More

पुणे-मुंबई रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी:डेक्कन क्वीनसह अनेक गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द, लोणावळा घाटात दरड कोसळल्याचा फटका

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत, विशेषतः मुंबई, पुणे आणि कोकणात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका रेल्वे वाहतुकीला बसला असून, लोणावळा-कर्जत रेल्वे मार्गावर 6 जुलै रोजी अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. यामुळे विस्कळीत झालेली रेल्वेसेवा पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, दुरुस्तीच्या कामाला वेळ लागणार असल्याने…

Read More

'आयटी आणि एआय दिंडी'चे आळंदीतून प्रस्थान:'मुखी विठ्ठल नाम, करु देश बलवान!' घोषवाक्यासह 1200 वारकरी सहभागी

पुणे येथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तंत्रज्ञांनी सुरू केलेल्या ‘आयटी दिंडी’चे आज, गुरुवार, ९ जुलै २०२६ रोजी आळंदी येथून पुणे शहराच्या दिशेने प्रस्थान झाले. संत ज्ञानेश्वर माउलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासोबत अध्यात्म आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधणारी ही दिंडी मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाली. ‘मुखी विठ्ठल नाम, करु देश बलवान!’ हे यावर्षीचे घोषवाक्य असून, यात ‘आत्मनिर्भर भारत’…

Read More

शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन:छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

शिक्षक संघटना समन्वय समिती, छत्रपती संभाजीनगरच्या वतीने शिक्षकांवरील अन्याय दूर करण्यासाठी आणि त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीसाठी आज जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. गुरुवार, ९ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन देण्यात आले असून, यात शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे….

Read More

खाकीतील देवमाणूस!:वारीच्या वाटेवर वारकऱ्याला आली फिट; वाहतूक शाखेचे उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी वाचवले प्राण

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य केवळ कायद्याच्या चौकटीपुरते मर्यादित न ठेवता, पुणे पोलिसांनी माणुसकीचा एक मोठा आदर्श घालून दिला आहे. आषाढी वारीनिमित्त ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषात पुण्यात दाखल झालेल्या पालखी सोहळ्यादरम्यान एका वारकऱ्याला अचानक फिट आल्याने तो रस्त्यावर कोसळला. मात्र, यावेळी तिथे बंदोबस्तावर असलेले पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त (DCP) डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्या तत्परतेमुळे या वारकऱ्याचे…

Read More

नागपूर कृषी विभागात नातेवाइकांच्या दुकानांमधून साहित्याची सक्ती:भंडारा उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव

नागपूर कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत शासकीय योजनांचा लाभ स्वतःच्या आणि नातेवाइकांच्या खासगी व्यवसायांना मिळवून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या ‘प्रति थेंब अधिक पीक’ आणि ‘कृषी यांत्रिकीकरण’ योजनेतंर्गत शेतकऱ्यांना विशिष्ट केंद्रांमधूनच साहित्य आणि कृषी अवजारे खरेदी करण्यासाठी भाग पाडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याप्रकरणी भंडारा येथील…

Read More

MLA Pragnya Satav Demands Expert Committee For Hingoli Earthquake Probe

हिंगोली जिल्ह्यात विशेषतः वसमत तालुक्यांमध्ये वारंवार घडणाऱ्या भूकंपाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तज्ञांची समिती नियुक्त करावी अशी मागणी विधान परिषदेच्या आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी गुरुवारी तारीख 9 विधान परिषदेत केली आहे. . वसमत तालुक्यामध्ये पांगरा शिंदे व परिसरात गुरुवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे परिसरातील गावकऱ्यांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने या भागात पाहणी…

Read More