जायकवाडीत 30 टक्के पाणीसाठा:संभाजीनगरला महिनाभर पुरेल इतक्या पाण्याची 8 तासांत आवक, नाशिकसह वरच्या भागात मुसळधार पावसामुळे विसर्ग
नाशिक जिल्हा आणि जायकवाडी धरणाच्या वरील पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणात गुरुवारी दिवसभरात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. अवघ्या आठ तासांमध्ये धरणाच्या जिवंत पाणीसाठ्यात एका टक्क्याची वाढ झाली असून, या वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याची महिनाभराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. दोन्ही जिल्ह्यांना महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा ८ तासांत जमा झाल्याची माहिती…