Headlines

जायकवाडीत 30 टक्के पाणीसाठा:संभाजीनगरला महिनाभर पुरेल इतक्या पाण्याची 8 तासांत आवक‎, नाशिकसह वरच्या भागात मुसळधार पावसामुळे विसर्ग

नाशिक जिल्हा आणि जायकवाडी धरणाच्या वरील पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणात गुरुवारी दिवसभरात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. अवघ्या आठ तासांमध्ये धरणाच्या जिवंत पाणीसाठ्यात एका टक्क्याची वाढ झाली असून, या वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याची महिनाभराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. दोन्ही जिल्ह्यांना महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा ८ तासांत जमा झाल्याची माहिती…

Read More

गल्लेबोरगाव ते टाकळी, बोरसर रस्त्यावर खड्डे:वाहनधारक त्रस्त, ऐन पावसाळ्यामध्ये चाळीस गावांची वाहतूक व्यवस्था ठप्प‎

तालुक्यातील गल्लेबोरगाव ते टाकळी आणि टाकळी ते बोरसर हा रस्ता या भागातील ४० गावांची मुख्य दळणवळण वाहिनी आहे. मात्र, सध्या या रस्त्यावर गुडघाभर खड्डे पडले असून, हा रस्ता प्रवाशांसाठी एक यातनाघर बनला आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना दररोज छोटे-मोठे अपघ . या रस्त्यावर २०१३ मध्ये गल्लेबोरगाव फाटा ते अंतापूर २ किमी आणि २०१४-१५ मध्ये अंतापूर…

Read More

संभाजीनगरचा महेश कुंभार मोशीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकला:चमत्कार घडावा अन् माझा भाऊ जिवंत असावा; संतोष कुंभारची भावना

मोशीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली महेश कुंभार अडकला आहे. ३२ वर्षीय महेश मूळचा छत्रपती संभाजीनगरचा. एमबीएचं शिक्षण घेतल्यावर तो वेस्ट एनर्जी प्रकल्पात वर्षभरापासून एचआर म्हणून नोकरीस लागला. दुर्घटनेत महेश इमारतीत अडकल्याचे त्याच्या कुटुंबीयांना मध्यरात् . मात्र, तो होऊ शकला नाही. त्यानंतर महेशचा भाऊ संतोष कुंभार तातडीने घटनास्थळी पोहोचला. आपला भाऊ सुरक्षित असेल, या विचारात तो आला, पण…

Read More

उत्तर प्रदेशच्या धर्तीवर राज्यामध्ये रुग्णालयांत "पोर्टेबल एमआरआय’:मंत्री हसन मुश्रीफ यांची विधान परिषदेत माहिती

उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित पोर्टेबल एमआरआय मशीन उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधान परिषदेत दिले. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी अर्ध्या तासाच्या चर्चेच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. या सुविधेच्या अंमलबजावणीसाठी राज्याच्या वैद्यकीय आणि शिक्षण…

Read More

48 कारखान्यांकडे 298 कोटींची अजून थकबाकी:विधान परिषदेत थकबाकीचा विषय गाजला

राज्यातील २०२५-२६ च्या ऊस गाळप हंगामात एकूण २१० साखर कारखान्यांनी १०४५.६३ लाख मेट्रिक टन (एलएमटी) ऊसाचे गाळप केले असून, ३० जून २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना ४०,१४८ कोटी रुपयांची प्रत्यक्ष एफआरपी अदा करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष एफआरपी भुगतानाचे प्रमाण ९९.२६ टक्क्यांवर पोहोचले असले, तरीही ४८ कारखान्यांकडे तब्बल २९८ कोटी रुपयांची एफआरपी थकबाकी असल्याचे साखर आयुक्तालयाच्या अद्ययावत…

Read More

श्री शिवाजी महाविद्यालयात नव्या सत्राचा दीक्षारंभ सुरू:प्राचार्य डॉ. मेटे यांचा हितोपदेश, 11 जुलैपर्यंत विविध उपक्रम

अमरावती येथील श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात २०२६-२७ या शैक्षणिक सत्राचा दीक्षारंभ कार्यक्रम सुरू झाला आहे. या कार्यक्रमात नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना महाविद्यालयाविषयी आवश्यक माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. प्राचार्य डॉ. महेंद्र मेटे यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना हितोपदेश केला. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी हा दीक्षारंभ कार्यक्रम आयोजित केला जातो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी…

Read More

29 शेतकऱ्यांच्या शेतीचा वीजपुरवठा दीड महिन्यांपासून खंडित:कळमजापूरजवळ ट्रान्सफॉर्मर जळाल्याने महावितरणवर संताप, तातडीने डीपी बदलण्याची मागणी

चांदूर रेल्वे तालुक्यातील कळमजापूर शेतशिवारात पळसखेड पांधन डीपीवरील ट्रान्सफॉर्मर जळाल्याने तब्बल दीड महिन्यांपासून २९ शेतकऱ्यांच्या शेतीचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे ही समस्या निर्माण झाली असून, शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने पिकांना वेळेवर सिंचन करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, वीजपुरवठा बंद असल्याने शेतकऱ्यांना त्यांचे वीज पंप सुरू…

Read More

मुख्याध्यापक ठाकरे यांनी शाळेला दिला 51 हजारांचा निधी:सेवापूर्तीनिमित्त खुल्या जीपमधून स्वागत, डिजिटल पॅनल भेट

नांदगाव खंडेश्वर येथील नांदगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रदीप ठाकरे यांनी आपल्या सेवापूर्तीनिमित्त शाळेला ५१ हजार रुपयांचा निधी अर्पण केला. शाळेने त्यांचे एका दिमाखदार सोहळ्यात स्वागत केले, ज्यात त्यांना खुल्या जीपमधून आणण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले यांनी भूषवले. शिक्षक महासंघाचे संस्थापक शेखर भोयर, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद अशोक देशमुख…

Read More

पुणे-मुंबई रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी:डेक्कन क्वीनसह अनेक गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द, लोणावळा घाटात दरड कोसळल्याचा फटका

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत, विशेषतः मुंबई, पुणे आणि कोकणात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका रेल्वे वाहतुकीला बसला असून, लोणावळा-कर्जत रेल्वे मार्गावर 6 जुलै रोजी अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. यामुळे विस्कळीत झालेली रेल्वेसेवा पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, दुरुस्तीच्या कामाला वेळ लागणार असल्याने…

Read More

'आयटी आणि एआय दिंडी'चे आळंदीतून प्रस्थान:'मुखी विठ्ठल नाम, करु देश बलवान!' घोषवाक्यासह 1200 वारकरी सहभागी

पुणे येथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तंत्रज्ञांनी सुरू केलेल्या ‘आयटी दिंडी’चे आज, गुरुवार, ९ जुलै २०२६ रोजी आळंदी येथून पुणे शहराच्या दिशेने प्रस्थान झाले. संत ज्ञानेश्वर माउलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासोबत अध्यात्म आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधणारी ही दिंडी मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाली. ‘मुखी विठ्ठल नाम, करु देश बलवान!’ हे यावर्षीचे घोषवाक्य असून, यात ‘आत्मनिर्भर भारत’…

Read More