Headlines

इंदूर नमकीनचा परवाना तत्काळ निलंबित:अस्वच्छता आणि बुरशीयुक्त अन्न आढळल्याने एफडीएची कारवाई

नागपुरात अन्न भेसळ आणि अस्वच्छतेविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आपली कारवाई तीव्र केली आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रसिद्ध हिरा स्वीटवर कारवाई केल्यानंतर आता ‘इंदूर नमकीन प्रॉडक्ट्स’ या मोठ्या आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ९ जुलै रोजी अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती ए. एन. खंदारे यांच्या पथकाने…

Read More

मंगलप्रभात लोढांनी उद्यापासून नट-बोल्ट, सिमेंट खावे:शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्न खाऊ नये; रविकांत तुपकरांची संतप्त टीका, म्हणाले- अन्नदात्याची माफी मागा

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या विधानावर संतप्त टीका केली आहे. भारत शेतकऱ्यांमुळे सोने कि चिडिया नव्हता असे विधान लोढांनी केले होते. यावर टीका करताना तुपकर म्हणाले की, मंगलप्रभात लोढांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. हा देश पूर्वही कृषीप्रधान होता, आजही कृषीप्रधान आहे आणि भविष्यातही कृषीप्रधान…

Read More

मंदिर विधेयकावरून वडेट्टीवारांचा सरकारला सवाल:अयोध्येच्या तिजोरीत चोरी, मग रामटेक देवस्थानात राजकारणी कशाला?

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ‘श्री राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था, रामटेक विधेयक’ यावरून काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. प्रभू रामचंद्रांबद्दल जनतेच्या मनात प्रचंड श्रद्धा असताना, रामटेकसारख्या ऐतिहासिक मंदिराच्या व्यवस्थापनात घाईघाईने राजकीय हस्तक्षेप करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. “या मंदिराच्या विश्वस्त मंडळावर लोकप्रतिनिधी किंवा राजकीय व्यक्तींची…

Read More

Pimpri-Chinchwad Scam | Sanjay Raut Has No Moral Right: BJPs Navnath Ban

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कथित घोटाळ्याच्या मुद्द्यावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. दोषी कोणताही असो, चौकशी करून कारवाई केली जाईल; मात्र संजय राऊतांना भ्र . आज सकाळीच खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात पालिकेच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश केला आहे. नियमानुसार, ३ लाख रुपयांपेक्षा…

Read More

अधिवेशनाचा शेवटचा दिवस तरीही निर्णय नाही:शिक्षकांच्या आंदोलनावरून रोहित पवार आक्रमक, म्हणाले- सरकारने अंत बघू नये, अन्यथा परवडणार नाही

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आपल्या प्रलंबित आणि न्याय्य मागण्यांसाठी भर पावसात आंदोलन करत असलेल्या शिक्षकांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. २२ जूनपासून सुरू असलेल्या या आंदोलनावर पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत कोणताही तोडगा न निघाल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “देशाचे भवितव्य…

Read More

डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण; रमेश म्हात्रेंना रुग्णालयातून डिस्चार्ज:आज कोर्टात हजर करणार; दोन डॉक्टरांचे राजीनामे, निलंबनाची मागणी जोरात

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना थेट कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण देत ते कळवा शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र, न्यायालयाने प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. यापूर्वी रमेश…

Read More

लोकांनी महायुतीविरोधात निवडून दिलंय, मग खासदार अस्वस्थ का?:2029 मध्ये देशात 'इंडिया' आघाडीच सत्तेत येणार- संजय राऊत

आमच्या पक्षातून किंवा शरद पवारांच्या पक्षाकडून निवडून आलेल्या खासदारांना लोकांनी महायुतीच्याविरोधात निवडून दिले आहे. मग त्यांनी अस्वस्थ का व्हावे? असा सवाल उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शरद पवार गटातील 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत, पंतप्रधान मोदी आणि शहा त्यांच्यामागे लागले आहेत ते खासदार काय करतील सांगता येत नाही या पृथ्वीराज चव्हाण यांच्या…

Read More

शरद पवारांचे 5-6 खासदार अस्वस्थ:पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्याने खळबळ! खासदार बजरंग सोनवणे आणि शशिकांत शिंदेंनी दिलं थेट उत्तर

राज्याच्या राजकारणात सध्या फोडाफोडीच्या आणि नाराजीच्या चर्चांनी जोर धरला आहे. यातच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे 5 ते 6 खासदार सध्या अस्वस्थ आहेत आणि ते काय करतील हे सांगता येत नाही,” असे विधान चव्हाण…

Read More

अनुदान संपवण्याचा घाट; संचमान्यतेसाठी घातक निकष:मुंबईत झालेल्या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने घेतला सहभाग‎

शिक्षकांच्या संचमान्यतेला घातक निकषांचा आधार असून, या माध्यमातून अनुदानित व्यवस्था संपवण्याचा घाट घालण्यात येत आहे, असा आरोप करत विज्युक्टातर्फे (विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशन) धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाच्या या नकारात्मक भूमिकेच्या विरुद् . महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर, विज्युक्टाचे अध्यक्ष तथा महासंघाचे कार्याध्यक्ष अकोल्याचे डॉ….

Read More

मुसळधार पावसाला ब्रेक!:पुढील 10 दिवस महाराष्ट्रात तुरळक सरी; मात्र 'या' भागांसाठी अजूनही सतर्कतेचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचा जोर आता हळूहळू कमी होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती, दरडी कोसळणे आणि नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र हवामान विभाग आणि तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यात बहुतांश भागात पावसाची तीव्रता कमी राहणार असली, तरी काही भागांमध्ये अधूनमधून जोरदार सरींची शक्यता कायम आहे. पुढील…

Read More