Headlines

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट‎:पातोंड्यात महिन्यापासून नळ कोरडे; शेवाळयुक्त पाणी पिण्याचा धोका

अकोट तालुक्यातील पातोंडा गावात पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. ग्रामस्थांना आता जीव धोक्यात घालून दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. सुमारे ६०० लोकवस्ती असलेल्या या गावात गेल्या अनेक दिवसांपासून नळ कोरडे पडले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे गावकऱ्यांचा संताप टोकाला पोहोचला आहे. खारपान पट्ट्यातील पातोंडा गावात आधीच क्षारयुक्त पाण्याचा गंभीर प्रश्न आहे….

Read More

ट्रॅक्टरद्वारे शेतीच्या मशागत खर्चामध्ये मोठी वाढ; डिझेल दरवाढीचा फटका:नांगरणीसाठी 800 रु., वखरणीसाठी 700 रु. प्रतितास खर्च‎

परिसरात खरीप हंगामाची चाहूल लागताच शेतीच्या मशागतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. परंतु, डिझेल दरवाढ, सुट्या भागांचे दर तसेच मजुरीतील वाढ यामुळे ट्रॅक्टरद्वारे शेतीच्या तयारीचा खर्च ग्रामीण भागात प्रचंड वाढलेला दिसत आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. ग्रामीण भागातील बहुसंख्य शेतकरी नांगरणी, वखरणी, रोटाव्हेटर आणि इतर मशागत कामांसाठी ट्रॅक्टरवर…

Read More

वाळू माफियांनी विष्णुपद बंधाऱ्याचे दरवाजे काढून थेट पाणी सोडले:महर्षी वाल्मीक संघाने आंदोलनाचा दिला इशारा‎

पंढरपूरमध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफिया मुजोर झाले असून, त्यांनी चक्क चंद्रभागा नदीचे पाणी वाहून जावे आणि उघड्या पडलेल्या पात्रातून वाळू चोरी करता यावी यासाठी विष्णुपद बंधाऱ्याचे दरवाजे काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, महर्षी वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी विष्णुपद बंधाऱ्याचे दरवाजे काढून टाकल्या प्रकरणी वाळू माफियांवर कारवाई करावी, अन्यथा…

Read More

दत्तात्रयांच्या जयघोषाने देवगडनगरी दुमदुमली:जगात कसे जगावे हे भगवद्गीता, तर कसे मरावे हे भागवत शिकवते, भास्करगिरीजी महाराज यांचे प्रतिपादन‎

भागवत कथा ही पूर्वपुण्याईशिवाय ऐकायला मिळत नाही. जगात कसे जगावे हे आपल्याला ‘भगवद्गीता’ शिकवते, तर कसे मरावे हे ‘भागवत’ शिकवते. या कथेमुळे जन्म-मरणाचे साकडे सुटते. त्यामुळे सर्व भाविकांनी या पर्वकाळात कथेचे श्रवण करून आंतरिक आनंद मिळवावा, असे श्रीक्षेत्र देवगड दत्त पीठाचे प्रमुख महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी भाविकांना मार्गदर्शन करताना सांगितले. त्रैवार्षिक पुरुषोत्तम मासाच्या पवित्र…

Read More

‘सिबिल’ची अट न लावता शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप:‘एल निनो’च्या संकटात बळीराजाला सरकारचा दिलासा

यंदा महाराष्ट्रातील १५२ लाख हेक्टर खरीप हंगामावर ‘एल निनो’चे मोठे संकट घोंगावत आहे. हवामान खात्याने यंदा सरासरीच्या अवघा ८८% पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरज असताना, पीक कर्ज देण्यात बँकांकडून होणाऱ्या दिरंगाईवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यस्तरीय बँकिंग समितीच्या (एसएलबीसी) बैठकीत तीव्र…

Read More

पूर्ण बहुमत मिळविण्यासाठी शिवसैनिकांनी तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचावे:खासदार शिंदे यांच्या नांदगाव, येवला येथील पदाधिकाऱ्यांना सूचना‎

आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांत शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळवून देण्यासाठी प्रत्येक बूथनिहाय कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन उभे करावे, पक्षाचा विस्तार करण्यासाठी मतदारसंघातील प्रत्येक गावात मतदार संपर्क अभियान राबवा. अशा सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसंवाद दौऱ्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांना केल्या. शिवसंवाद दौऱ्यात खासदार शिंदे यांनी नांदगाव व येवला विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्र संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले…

Read More

अजिंठा-बुलढाणा राज्य मार्गावरील शिवना येथील वाहतूक कोंडी सुटेना:बाजारपेठेत वारंवार खोळंबा; शेगाव, नागपूरकडे जाणारे पर्यटक हैराण‎

अजिंठा लेणी आणि लोणार सरोवराला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग म्हणून अजिंठा-बुलढाणा राज्य मार्गाकडे पाहिले जाते. मात्र, सद्यस्थितीत हा मार्ग शिवना गाव परिसरात वाहतूक कोंडीचा मुख्य केंद्र बनले आहे. बसस्थानक आणि मुख्य बाजारपेठ परिसरात वाहनधारक अस्ताव्यस्त पार्किंग करीत असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी, दररोज या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, बुधवारी बाजाराच्या दिवशी…

Read More

सिल्लोड शहरामध्ये 2 दुकानांना आग; 7 लाख रुपयांचे नुकसान:कारण अस्पष्ट, दोन्ही दुकानदारांचे 6 लाखांचे नुकसान‎

सिल्लोड शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील दोन वेगवेगळ्या दुकानांना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या दोन्ही घटनांमध्ये ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पहिली घटना अण्णा भाऊ साठे चौकात रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. येथील सत्यम चौबे यांच्या मालकीच्या श्री मेडिकल दुकानाला अचानक आग लागली. या आगीत…

Read More

ज्येष्ठ समाजसेवक जनार्दनपंत बोथे यांना पद्मश्री पुरस्कार:राष्ट्रपतींच्या हस्ते ‌नवी दिल्लीत सोमवारी सन्मान

श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ जनार्दनपंत बापूराव बोथे यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला असून सोमवार, २५ मे रोजी नवी दिल्लीत एका विशेष सन्मान सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान शिक्षण संस्थेची स्थापना : १९७२ मध्ये ‘राष्ट्रसंत श्री…

Read More

दिव्य मराठी एक्स्पोज:प्रा. लोंढेंच्या मारेकऱ्यांना संरक्षण देणाऱ्या पीआय ताटेंच्या निलंबनाची शिफारस, डीसीपींचा चौकशी अहवाल ‘दिव्य मराठी’च्या हाती

सेवानिवृत्त प्रा. राजाभाऊ लोंढे यांचा फेब्रुवारीमध्ये दृश्यम स्टाइलने खून झाला होता. यातील आरोपींना पाठीशी घालत उस्मानपुरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे, हे आरोपी असल्याचे माहिती होऊनही गुन्हा दाखल केला नाही. आरोपी विशाल राठोड व त्याचे साथीदार ६ फेब्रुवारी ते १२ मार्चपर्यंत तब्बल ३६ दिवस पोलिस ठाण्यात येऊन…

Read More