मुंबईच्या समुद्राची 'हायटेक' स्वच्छता:कचरा हटवण्यासाठी BMC कडून मानवरहित बोटी; दररोज 80-90 किलो कचरा होतो गोळा
मुंबईकरांचा अभिमान आणि पर्यटकांचे मुख्य आकर्षण असणाऱ्या समुद्रात वाढलेला कचरा हटवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत गेटवे ऑफ इंडिया आणि बढवार पार्क येथील सागरी किनारे स्वच्छ करण्यासाठी दोन मानवरहित इलेक्ट्रिक बोटी तैनात करण्यात आल्या असून, या अत्याधुनिक बोटींच्या मदतीने समुद्रातील अंदाजे 80 ते 90 किलोग्रॅम तरंगता कचरा…