Headlines

दिव्य मराठी ब्रेकिग:दहावीच्या परीक्षेच्या 2 तास आधी ऑनलाइन प्रश्नपत्रिका मिळणार, पुरवणी परीक्षेत पथदर्शी प्रकल्प

नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता दहावीच्या प्रश्नपत्रिका थेट परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने पाठवल्या जातील. पेपर सुरू होण्यापूर्वी केवळ दोन तास आधी या प्रश्नपत्रिका अत्यंत सुरक्षित प्रणालीद्वारे केंद्रांना मिळतील व तिथेच त्यांची छपाई करून त्या विद्यार्थ्यांना वितरित केल्या जातील. आगामी जून महिन्यात होणाऱ्या दहावीच्या…

Read More

दिव्य मराठी एक्स्पोज:सोलापूर मनपात भंगार चोरीनंतर मंडई कर्मचाऱ्यांची हातसफाई उघड, बंद 2 गाळ्यातून 15 मे रोजी जप्त केलेले 1 लाखाचे साहित्य कोंडवाड्यात लपवले

महापालिका गोदामातील अतिक्रमणविरोधी पथकाचे भंगार साहित्य चोरीचे प्रकरण चर्चेत असतानाच मंडई विभागातील कर्मचाऱ्यांनीही असेच कारनामे केल्याचे उघडकीसआले. मुरारजी पेठेतील महात्मा फुले मार्केटमधील (सुपर बझार) दोन बंद गाळेधारकांनी भाडे न भरल्याने त्यांचे साहित्य 15 मे रोजी जप्त करण्यात आले. ते नियमानुसार रेकॉर्डला नोंद करुन मनपाच्या गोदामात ठेवणे अपेक्षित होते. मात्र मंडई विभाग कर्मचाऱ्यांनी ते पोटफाडी चौकातील…

Read More

मराठवाड्यात शिवसेनेची कोंडी:विधान परिषदेच्या 4 पैकी 3 जागांवर भाजपचा, एकावर ‘राष्ट्रवादी’चा दावा, मंत्री शिरसाट म्हणतात, समन्वय समिती निर्णय घेईल

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेची पारंपरिक ताकद असलेल्या छत्रपती संभाजीनगर-जालना आणि परभणी-हिंगोली या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांत सध्या शिवसेनेची (शिंदे गट) मोठी कोंडी होत असल्याचे चित्र आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने संख्याबळाच्या जोरावर या जागांवर आपला दावा ठोकल्यामुळे शिंदेसेनेची अडचण झाली आहे. मनपा आणि जिल्हा परिषदेतील सत्ता…

Read More

नुकसान:आष्टी सिंचन योजनेच्या कालव्याला गळती, तेलंगवाडी शेतशिवारात लाखो लिटर पाणी, सात किमी निकृष्ट दर्जाच्या कामाचा फटका

उजनी धरणाचे पाणी माळरानावरील शेतकऱ्यांना देण्याच्या उद्देशाने आष्टी उपसा सिंचन योजना राबवण्यात आली. या योजनेला २०- ३० वर्षे पूर्ण झालेली आहेत. मात्र, मोहोळ तालुक्यातील तेलंगवाडी येथील आष्टी उपसा सिंचन योजना डावा कालवा १ ते ७ येथे कॅनलला मोठी गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मागील अनेक वर्षांपासून सदर गळतीकडे पाटबंधारे विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष…

Read More

परळी वैजनाथच्या 301.54 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी:पंकजा मुंडेंनी मानले फडणवीसांचे आभार; तीर्थक्षेत्राच्या विकासाला गती

बीड जिल्ह्यातील पवित्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. परळी वैजनाथ परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी 301.54 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे परळी परिसराचा मोठ्या प्रमाणात कायापालट होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली…

Read More

उन्हाळ्यात 220 आगीच्या घटना; शहरात केवळ 4 अग्निशमन केंद्र:इमारती 16 माळ्यांच्या, शिडी चार ते पाच माळ्यांपर्यंत पोहोचेल इतकीच‎

शहराची लोकसंख्या, इमारती, घरे, दुकाने, बाजारांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून आगीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. सध्या तर सूर्य आग ओकत असल्याने शहर जणू आगीच्या उंबरठ्यावरच उभे आहे की, काय असे वाटत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात २०० हून अधिक लहान, मोठ्या आगीच्या घटना घडल्या आहेत. तसेच शहरात बहुमजली इमारतींचीही संख्या वाढत आहे. अशात महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाकडे…

Read More

पाण्याच्या शोधामध्ये व्याकुळलेल्या हरणाच्या पिल्लावर कुत्र्यांचा हल्ला:वन विभागाचे अधिकारी आलेच नाही, प्राणीमित्रांनीच नेले वन कार्यालयात‎

तिवसा तालुक्यातील गुरुदेव नगर परिसरात शुक्रवारी २२ रोजी पहाटे ६ वाजताच्या सुमारास वाढत्या उष्णतेमुळे व पाण्याच्या शोधात जंगल परिसरातून बाहेर पडलेल्या एका हरणाच्या पिल्लावर भटक्या कुत्र्यांच्या कळपाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना गुरुदेव नगर येथील पाण्याच्या टाकीमागील भागात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे भटकंती करत असलेल्या हरणाच्या पिल्लाला कुत्र्यांच्या कळपाने घेरले…

Read More

जमीन संरक्षण, लँड जिहाद प्रतिबंधक कायदा लागू करा:शिवसेनेच्या शिंदे गटाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन करण्यात आले सादर‎

जमीन संरक्षण, लँड जिहाद प्रतिबंधक कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाने शुक्रवारी केली. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर जमिनीचे व्यवहार, अतिक्रमण, धार्मिक व लोकसंख्यात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने काही ठिकाणी संघटित पद्धतीने जमीन खरेदी-विक्री होत असल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे, असे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे….

Read More

राजकीय संघर्ष:महाडिकांवर समाज माध्यमात टीका, सुस्तेत तरुणांच्या दोन गटात हाणामारी, लावणी कार्यक्रमातील धुसफूस; लाठ्या-काठ्यांनी थेट हल्ला

तालुक्यातील सुस्ते येथे दि.२२ मे रोजी सकाळच्या सुमारास तरुणांच्या दोन गटांमध्ये पूर्ववैमनस्य आणि समाज माध्यमावरील वादातून अत्यंत थरारक आणि गंभीर अशी फ्री-स्टाईल हाणामारी झाली. नृत्यांगना राधा पाटील हिच्या लावणी कार्यक्रमात आधीच सुरू असलेल्या धुसफुशीत, खासदार धनंजय महाडिक यांच्यावर समाज माध्यमावर करण्यात आलेल्या एका टीकात्मक टिप्पणीची भर पडली. यावरून दोन्ही बाजूंच्या युवकांमध्ये जोरदार वाद पेटला आणि…

Read More

संगमनेरला अखेर नवी एमआयडीसी मंजूर; लवकरच निघेल नोटिफिकेशन:आ.खताळ यांची घोषणा, 600 तरुणांच्या मुलाखती; 125 जणांची निवड‎

संगमनेर तालुक्यातील तरुण-तरुणींच्या हाताला काम आणि हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी आपण संगमनेरला नवीन एमआयडीसी सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. संगमनेरच्या एमआयडीसीला मंजुरी मिळाली आहे. लवकरच याबाबतचे अधिकृत नोटिफिकेशन निघणार आहे. तालुक्यातील तरुणांना रोजगार…

Read More