महात्मा फुलेंना 'भारतरत्न'साठी खासदार वाघमारे यांचा विशेष आग्रह:द्विशताब्दी जयंती वर्षात सन्मान मिळावा, केंद्र सरकारकडे करणार मागणी
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ मरणोत्तर प्रदान करण्यात यावा, यासाठी केंद्र सरकारकडे विशेष आग्रह धरला जाईल, अशी ग्वाही खासदार ज्योती वाघमारे यांनी दिली. महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित अभिवादन सभेत त्या बोलत होत्या. या प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि कार्यकर्ते…