Headlines

"मांगी''च्या पाण्यासाठी रोखला रस्ता‎:पावसाळी अधिवेशनानंतर बैठक घेऊन तोडगा काढू

करमाळा तालुक्यातील मांगी तलावातील पाणी हळगाव (ता. जामखेड) येथील कृषी विद्यापीठाला देण्याच्या शासन निर्णयाविरोधात सोमवारी मांगी येथे ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त केला. शासनाने काढलेला जीआर तत्काळ रद्द न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा…

Read More

बापाने बिबट्याच्या जबड्यातून 4 वर्षीय लेकीला खेचून काढले:डोंगरगाव येथील काळजाचा ठोका चुकवणारी घटना‎

आढळा खोऱ्यातील डोंगरगाव येथे शनिवारी सायंकाळच्या सुमारास काळीज हेलावून टाकणारी एक थरारक घटना घडली. घराबाहेर अंगणात आईच्या पाठीवर बसलेल्या ४ वर्षांच्या अवणीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने भक्ष्य समजून झडप घातली. बिबट्या अवणीला जबड्यात पकडून ओढत नेत असताना, तिच्या वडिलांनी जीवाची पर्वा न करता बिबट्याशी थेट दोन हात केले. बापाच्या या अद्भूत धाडसापुढे बिबट्याला माघार घ्यावी…

Read More

कळवण आगारातून सप्तश्रृंगगडासह नाशिकसाठी धावणार आधुनिक बस:5 ‘राजमाता जिजाऊ'' बस दाखल; आणखी 10 बस मिळणार‎

येथील एसटी महामंडळाच्या आगारात प्रवाशांच्या सेवेसाठी पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल झाल्या असून, या बसेसद्वारे कळवण-नाशिक आणि कळवण-सप्तश्रृंगगड मार्गावर सेवा दिली जाणार आहे. या बसेसचे लोकार्पण नगराध्यक्ष कौतिक पगार यांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्यातील दुर्गम भागातील प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या बसेस आगारात दाखल करण्यात आल्या आहेत….

Read More

पैठणला 35 मिनिटे वाऱ्यासह पाऊस; 12 झाडे उन्मळली:तीन जण जखमी, काही घरांवरील पत्रे उडाले, धान्य मार्केट परिसरामध्ये पाणी तुंबले‎

गेल्या काही दिवसांपासून उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या पैठणकरांना अखेर सोमवारी दिलासा दिला. दुपारी चारच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन आलेल्या या पहिल्याच पावसाने वादळी वाऱ्यासह शहराला झोडपून काढले. अवघ्या ३५ मिनिटांत झालेल्या या वादळी पावसामुळे शहरात १२ झाडे कोसळली असून, काही घरांवरील पत्रे उडाल्याने पडझड झाली आहे. या दुर्घटनेत ३ जण जखमी झाले…

Read More

पावसाळी अधिवेशनात पहिल्या दिवशी तरतूद:शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी 20,552 कोटींची तरतूद

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने दोन्ही सभागृहांत ९७,७०६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत. आगामी काळातील राजकीय गणिते लक्षात घेता यातून शेतकरी, कष्टकरी महिला आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर निधीची मोठी तरतूद करण्यात आली आहे. विशेषतः ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी आणि शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६…

Read More

औंढा नागनाथ परिसराचा होणार कायापालट:182 कोटींच्या आराखड्याला उच्चाधिकार समितीची मान्यता, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा पुढाकार

देशातील आठवे ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या औंढा नागनाथ येथील मंदिराचा लवकरच कायापालट होणार आहे. सोमवारी २२ जून रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंदिर परिसराच्या विकासासाठी १८२ कोटी रुपयांच्या सुधारित प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ेय मंदिर परिसरासाठी १०६ कोटी तर पुरातत्व विभागाच्या ७६ कोटींच्या कामांचाही समावेश आहे. देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ…

Read More

चांदूर रेल्वे तालुक्यात 'फार्मर कप' स्पर्धा:40 गावांतून 48 शेतकरी गट सहभागी, उत्पादन वाढीचे नियोजन

चांदूर रेल्वे तालुक्यात पाणी फाउंडेशन, कृषी विभाग आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर कप’ स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेत तालुक्यातील ४० गावांतून एकूण ४८ शेतकरी गट सहभागी झाले आहेत. या गटांच्या माध्यमातून शेतकरी एकात्मिक पीक व्यवस्थापनाच्या विविध बाबी आपल्या शेतात राबवत आहेत. स्पर्धेतील शेतकरी गट सामूहिक स्वरूपात बियाणे, खते, तसेच बीज प्रक्रियेसाठी आवश्यक…

Read More

राज्यात पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे:हवामान विभागाचा जोरदार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात होणार पाऊस? वाचा सविस्तर

जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होऊन राज्याच्या काही भागांत पाऊस पडला असला तरी, त्यानंतर पावसाने मोठी ओढ दिली होती. जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने चिंता वाढली होती. मात्र आता मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून सोमवारी अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. या सकारात्मक वातावरणातच…

Read More

सांगली-सातारा विधान परिषद:भाजपच्या धैर्यशील कदमांचा 301 मतांनी दणदणीत विजय; महायुतीची शंभर मते फुटली

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी ३०१ मतांनी विजय मिळवला. कदम यांना ५९३ मते मिळाली. महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी देखील २९२ मते मिळवत चुरशीची लढत दिली. त्यांनी महायुतीची सुमारे १०० मतं फोडून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम हे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष होते. त्यांना निवडून आणण्यासाठी…

Read More

पैठणमध्ये मान्सूनची दमदार 'एन्ट्री':वादळी वाऱ्यासह पहिल्याच पावसाने शहराला झोडपले!

पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पैठणकरांना अखेर सोमवारी मान्सूनने दिलासा दिला. दुपारी चारच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन काळ्या ढगांनी आकाश व्यापले आणि काही क्षणांतच वादळी वाऱ्यासह मान्सूनच्या पहिल्या दमदार सरींनी शहराला झोडपून काढले. यंदाच्या हंगामातील हा पहिलाच मान्सून पाऊस असल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले, या वादळी वार्यासह झालेल्या पावसाने पंचायत समितीच्या समोर एक झाड,व…

Read More