Headlines

बावनकुळेंना समज द्यावी, सरकारही पाडायला कमी करणार नाही- जरांगे:मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा‎

मराठा आरक्षण आंदोलक संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या निर्णायक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माढा शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य इशारा बैठकीला सकल मराठा समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सभेसाठी सहा तासांहून अधिक उशीर होऊनही हजारोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. मराठा आरक्षणासह समाजहिताच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी माढा शहरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळेच्या…

Read More

सलग तिसऱ्या दिवशी विधिमंडळ अंदाज समितीच्या रडारवर मनपा:सीना नदी, कचरा संकलनासह मनपा प्रशासनाच्या कामकजावर नाराजी‎

महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीच्या रडावर सलग तिसऱ्या दिवशीही महापालिका प्रशासन राहिले. शनिवारी झालेल्या समितीच्या शेवटच्या बैठकीत सीना नदीचे खोलीकरण, कचरा डेपो व सीना नदीवरील उद्यान विकासाचा प्रकल्पावर या समितीने लक्ष केंद्रीत करुन मनपा प्रशासनाची . ६ ते ८ ऑगस्टदरम्यान जिल्हा दौऱ्यावर आलेल्या या समितीने शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यात विविध विषयांवर सविस्तर चर्चा…

Read More

धरणाच्या पाण्याचे नियोजन गरजेचे‎:पैठण येथील जायकवाडी धरण 94.45% पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते जलपूजन‎

जायकवाडी धरणातील जलसाठा ९४.४५ टक्क्यांवर पोहोचला असून, शनिवारी पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. या सोहळ्यास विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा, माजी महापौर नंदकुमार घोडेले, अधीक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर, कार्यकारी अभियंता गणेश हासे, तहसीलदार ज्योती पवार, मनोरमा गायकवाड, भुषण कावसानकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यंदाच्या मुबलक जलसाठ्यामुळे…

Read More

‘सिद्धिविनायक’च्या दानात 18 कोटींची चोरी:‘ऑडिट’चे फडणवीसांचे आदेश, राज ठाकरे यांनी 8 दिवसांपूर्वी केलेल्या आरोपांची दखल

श्री सिद्धिविनायक मंदिराच्या दानात १८ कोटींची चोरी होत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी १ ऑगस्ट रोजी केला होता. त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२१ ते २०२६ कालावधीतील मंदिराच्या आर्थिक व्यवहाराचे विशेष लेखापरीक्षण व सखोल चौकशीचे आदेश दिले. यासाठी नगरविकास विभाग आणि विधी व न्याय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन…

Read More

माण तालुक्यात वयस्कर दाम्पत्याच्या घरावर दरोडा:सात आरोपींसह विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात, 3 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त

माण तालुक्यातील लोधवडे येथील नाळावावस्तीवर मध्यरात्री वयस्कर दाम्पत्याच्या घरात घुसून शस्त्राचा धाक दाखवत सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा दहिवडी पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी सात आरोपींसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, चार मोटारसायकली आणि रोख रक्कम असा सुमारे 3 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…

Read More

जुहूमध्ये लुटमारीच्या उद्देशाने सुरक्षा रक्षकाचा खून:स्वयंपाक्याच्या कटाचा पर्दाफाश, 5 आरोपी अटकेत; व्यापाऱ्याचे कुटुंब संपवण्याचा होता प्लॅन

मुंबईतील जुहू परिसरात एका रहिवासी इमारतीमधील व्यावसायिकाला लुटण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांनी इमारतीच्या सुरक्षा रक्षकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मनोजकुमार अयोध्या यादव (वय 38) असे या मृत सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. आरोपींनी मनोजकुमारला मारहाण करून त्याचा गळा आवळला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह इमारतीच्या पाण्याच्या टाकीत फेकून दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे….

Read More

डॉक्टर मारहाण प्रकरण:नगरसेवक रमेश म्हात्रेंना जामीन, पण महाराष्ट्रात प्रवेशबंदी; थेट गोव्याला रवाना!

डोंबिवली येथील शास्त्री नगर रुग्णालयातील महिला डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या तीन साथीदारांची अखेर आधारवाडी कारागृहातून जामिनावर सुटका झाली आहे. न्यायालयाने काही कडक अटी आणि शर्तींवर हा जामीन मंजूर केला आहे. या अटींनुसार रमेश म्हात्रे यांना डोंबिवलीत किंवा महाराष्ट्रात थांबता येणार नसल्याने, कारागृहातून बाहेर येताच ते थेट…

Read More

अमरावतीत अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा:रस्त्यांचा श्वास मोकळा, कारवाई टाळण्यासाठी नागरिकांना अल्टिमेटम

अमरावती शहरात अतिक्रमणांची गंभीर समस्या लक्षात घेता, महानगरपालिका प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन दिवसांत शहराच्या विविध भागांतून अतिक्रमणे हटवून रस्त्यांवरील अडथळे दूर करण्यात आले आहेत. यामुळे रस्त्यांसह सार्वजनिक जागा मोकळ्या झाल्या आहेत. रस्त्याच्या कडेला, नाल्यांवर आणि सरकारी कार्यालयांच्या भिंतींजवळ मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आली होती, ज्यात काही ठिकाणी पक्के शेडही उभारले होते….

Read More

Mahatma Phule Vichar Sahitya Sammelan 2026 in Pune

राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने राष्ट्रीय पातळीवरील महात्मा फुले विचार साहित्य संमेलन पुण्यात दि. 27, 28, 29 नोव्हेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात आले आहे. हा तीन दिवसीय महोत्सव विचार, साहित्य आणि संस्कृतीचा संगम असेल. . या संमेलनात देशभरातील विचारक, भाष्यकार, अभ्यासक, संशोधक, लेखक, कवी, संपादक, पत्रकार, प्राध्यापक, कलाकार, कृतीवंत, तसेच ‘जेन झी’ आंदोलनातील विविध विद्यापीठांचे विद्यार्थी…

Read More

साखर उद्योग 'मल्टीप्रॉडक्ट बायोमास रिसोर्स' म्हणून विकसित व्हावा:जयंत पाटील यांचे 'डीएसटीए' अधिवेशनात आवाहन

साखर उद्योगाकडे केवळ साखर उत्पादन करणारा उद्योग म्हणून न पाहता, तो ‘मल्टीप्रॉडक्ट बायोमास रिसोर्स’ म्हणून विकसित करण्याची गरज आहे. इथेनॉल, बायोगॅस, बायो-सीएनजी यांसारख्या मूल्यवर्धित उत्पादनांद्वारे उद्योगाची आर्थिक व्यवहार्यता वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कार्यक्षमता वाढवण्यावर भर द्यावा लागेल, असे प्रतिपादन राज्याचे माजी गृह व अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केले. ‘डीएसटीए’चे तंत्रज्ञान, संशोधन आणि…

Read More