Headlines

गिरीष महाजनांना सुनावणाऱ्या महिलेची प्रतिक्रिया समोर:25 मिनिटे ट्रॅफिकमध्ये, मुलीची काळजी ठरली कारण; टीना चौधरींनी सांगितले त्या दिवशी काय घडले?

दक्षिण मुंबईत भाजपच्या महिला मोर्चादरम्यान ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर आक्रमक पवित्रा घेणाऱ्या महिलेची ओळख अखेर पटली आहे. टीना चौधरी असे या महिलेचे नाव आहे २१ एप्रिल रोजी वरळीत झालेल्या या मोर्चात त्यांनी भाजप पदाधिकारी, पोलिस आणि थेट मंत्री गिरीश महाजन यांनाही धारेवर धरले होते. सोशल मीडियावर विविध तर्कवितर्क लढवले जात असतानाच, टीना चौधरी यांनी एका व्हिडिओद्वारे आपली…

Read More

पुणे बाल पुस्तक जत्रा महाराष्ट्रासाठी रोल मॉडेल:वाचन संस्कृती जपण्यासाठी असे उपक्रम गरजेचे – भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

पुणे बाल पुस्तक जत्रेसारखे उपक्रम मुला-मुलींमध्ये वाचनाची आवड रुजवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. यातून वाचन संस्कार जपण्याचे मोलाचे कार्य होत आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका, समर्थ युवा फाऊंडेशन आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित पुणे बाल पुस्तक जत्रेला रवींद्र चव्हाण यांनी…

Read More

नाशिक टीसीएस प्रकरण:निदा खानच्या अडचणीत वाढ, जिल्हा कोर्टाने अंतरिम जामीन फेटाळला; गर्भावस्थेचे कारण ठरवले अमान्य

बहुचर्चित टीसीएस (TCS) बीपीओ कार्यालयातील लैंगिक छळ आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणातील आरोपी निदा खान हिचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यापूर्वी न्यायालयाने तिला कोणताही अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता. आता या निर्णयाविरोधात निदा खानचे वकील मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या…

Read More

युवक काँग्रेसतर्फे लोकशाही संवादमध्ये पाच अभियानांचे उद्घाटन:सत्ताधाऱ्यांविरोधात एकजुटीने संघर्ष करण्याची गरज, ज्येष्ठ विचारवंतांचे मत

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने ‘लोकशाही संवाद’ कार्यक्रमांतर्गत पाच वैचारिक अभियानांचे उद्घाटन केले. यावेळी विचारवंतांनी हुकूमशाही वृत्तीच्या सत्ताधाऱ्यांविरोधात एकजुटीने आणि सातत्यपूर्ण संघर्ष करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. लोकशाहीची पुनर्स्थापना, संविधानाचे पावित्र्य राखणे आणि तळागाळातील जनतेशी नव्याने नाते जोडण्याचा संकल्प युवक काँग्रेसने करावा, असे आवाहनही त्यांनी केले. ही पाच वैचारिक अभियाने डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे,…

Read More

No Bond in Politics, BJP-Shiv Sena Can Fight 2029 Alone

प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो. राजकारणात बाँड किंवा ॲग्रीमेंट काहीही नसते. त्यामुळे भाजप व शिवसेना 2029 ला स्वतंत्रपणे लढू शकते का? तर लढू शकते, असे विधान राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. त्यांच्या या व . संजय शिरसाट यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा…

Read More

नसरापूरमध्ये 4 वर्षीय बालिकेवर अत्याचार, निर्घृण हत्या:15 दिवसांत दोषारोपपत्र दाखल करणार- पोलिस अधीक्षक संदीप गिल

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका चार वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला असून, संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला कठोर शिक्षेची मागणी करत आंदोलन केले. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगत, पुढील 15 दिवसांत न्यायालयात…

Read More

हिंगोली जिल्हा परिषदेच्या पाठीवर पालकमंत्र्यांची कौतूकाची थाप:सेवाकर्मी पुरस्काराबद्दल सीईओंचा सत्कार, साधना सप्ताहातही प्रथम

केंद्र सरकारच्या मिशन कर्मयोगी उपक्रमांतर्गत साधना सप्ताहामध्ये हिंगोली जिल्हा परिषदे अंतर्गत ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी विविध प्रशिक्षणे पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांना राज्याचा सेवाकर्मी पुरस्कार मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या यशाबद्दल पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी ता. १ अधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतूकाची थाप दिली आहे. केंद्र सरकारच्या सुचने नुसार मिशन…

Read More

भोर येथील निर्घृण कृत्याने महाराष्ट्र हादरला:सुप्रिया सुळे यांची कडक भूमिका, सुषमा अंधारेही संतापल्या; दोषींना कठोर शिक्षेची मागणी

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडलेल्या एका अत्यंत संतापजनक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. नसरापूर परिसरात चार वर्षांच्या चिमुरडीवर एका वृद्ध व्यक्तीकडून अमानुष अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला आहे. माहितीनुसार, ही लहान मुलगी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तिच्या…

Read More

टरबूज खाल्ल्यामुळे दोकाडिया कुटुंबाचा मृत्यू नाही:FDA चा कलिंगडात भेसळ आढळली नसल्याचा दावा; मग 4 जणांचा मृत्यू कशाने झाला?

मुंबईतील बिर्याणीनंतर कलिंगड खाऊन मृ्त्यू झालेल्या एका कुटुंबाच्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासन अर्थात एफडीएने आपल्या अहवालात या कुटुंबाने खाल्लेल्या टरबुजात कोणताही कृत्रिम रंग किंवा रसायनांचा वापर झाला नसल्याचा दावा केला आहे. परिणामी, टरबूज खाल्ल्यामुळे या कुटुंबाचा मृत्यू झाल्याची शक्यता मावळली आहे. मुंबईमधील पायधुनी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील 4…

Read More

Raja Shivaji Box Office: 11.70 Crore Day 1; Breaks Sairat Record

अभिनेता रितेश देशमुख याचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा ‘राजा शिवाजी’ चित्रपट शुक्रवारी महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झाला. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बंपर कमाई करत तब्बल 11.70 कोटींचा गल्ला खिशात टाकला आहे. . महाराष्ट्रातील दमदार कामगिरीमुळे आकडेवारीला बळ ट्रेड वेबसाइट Sacnilk च्या वृत्तानुसार, राजा शिवाजी चित्रपटाला मराठी प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने मराठीत तब्बल 8.75 कोटी…

Read More