Headlines

नीट पेपरफुटीविरोधात ग्राहक कल्याण परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे:स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांवर कठोर कारवाईची मागणी

सध्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये होत असलेले गैरप्रकार आणि विशेषतः नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या घटनांमुळे देशभरातील विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेच्या जिल्हा शाखेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली….

Read More

मणीबाई हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी 'विकसित भारत बिल्डथॉन'मध्ये प्रथम क्रमांक पटकावला:अटल टिंकरिंग लॅब ठरली उपयुक्त, शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा

अमरावती येथील मणीबाई गुजराती हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींनी ‘केंद्र शासन पुरस्कृत विकसित भारत बिल्डथॉन २०२५’ स्पर्धेत जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या जीविका नलगे आणि रिया कांबे या विद्यार्थिनींनी हे यश संपादन केले. त्यांनी कठोर मेहनत, नावीन्यपूर्ण विचार आणि जिद्दीच्या जोरावर तंत्रज्ञान…

Read More

युवक काँग्रेसची 'आवाज महाराष्ट्राचा' मोहीम:अमरावतीतील प्रलंबित समस्यांवर आक्रमक भूमिका

अमरावती शहरातील नागरी समस्या, रखडलेले प्रकल्प आणि वाढत्या गुन्हेगारीविरोधात प्रदेश युवक काँग्रेसने ‘आवाज महाराष्ट्राचा, अमरावतीच्या परिवर्तनाचा’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. युवक काँग्रेसचे अमरावती शहर (विधानसभा) अध्यक्ष वैभव देशमुख यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना या आंदोलनात्मक मोहिमेची घोषणा केली. शहरात स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जुनी प्रभाग पद्धतीची स्वच्छतेची कंत्राटे रद्द करून नियम व…

Read More

नागपूर पोलिसांची झारखंडमध्ये मोठी कारवाई:हॉटेल मालक अंमली पदार्थांचा किंगपिन, 2.25 कोटींचा मुद्देमाल जप्त

नागपूर ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. उमरेड येथे दाखल अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्याचा सखोल तपास करत पोलिसांनी थेट झारखंड राज्यात धाड टाकली. या कारवाईत टोळीचा म्होरक्या असलेल्या हॉटेल व्यावसायिकाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ३३ किलो ७६७ ग्रॅम अफू आणि २३ लाख ३५ हजार रुपयांच्या रोख रकमेसह…

Read More

पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई: 104 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू:1.73 लाख नागरिकांना दिलासा; 5.5 कोटींहून अधिक निधी मंजूर

पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला असून, नागरिकांना दिलासा देण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील १११ गावे आणि ४२६ वाड्यांना एकूण १०४ टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा केला…

Read More

मी कोणताही चुकीचा शब्द वापरला नाही:हर्षवर्धन सपकाळांचे स्पष्टीकरण; PM नरेंद्र मोदींविषयी अपशब्द वापारल्याचा आरोप

सध्या जी देशात आणि राज्यात परिस्थिती पाहायला मिळत आहे, यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महाविकास आघाडीने काल कांदाच्या प्रश्नी तीन तास रस्ता जाम केला होता. तसेच महागाईवरून देखील विरोधकांनी हल्लाबोल सुरू केला आहे. कालच्या आंदोलनावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान तसेच मुख्यमंत्र्यांविषयी अपशब्दांचा वापर केला होता. यावर आज पत्रकार परिषदे…

Read More

मंत्री नीतेश राणे म्हणजे करमणुकीचे साधन:सत्ताधारी NCP च्या आमदाराचा घणाघात; बकरी ईदच्या कुर्बाणीवरून साधला निशाणा

मंत्री नीतेश राणे हे केवळ करमणुकीचे साधन असल्याची टीका सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रीस नायकवडी यांनी केली आहे. मंत्री नीतेश राणे यांना यांना सध्या कुणीही सीरियस घेत नाही. त्यांच्याकडे केवळ करमणुकीचे साधन म्हणून पाहिले जाते, असे ते म्हणालेत. त्यांच्या या टीकेमुळे सत्ताधारी महायुतीतील घटकपक्षांत वादाची ठिणकी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नीतेश राणे यांनी…

Read More

पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR नको:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना पत्र

महाराष्ट्रातील मतदार यादी विशेष सखोल पुनर्रिक्षण (SIR) मोहिमेचा दुसरा टप्पा ३० जून ते २९ जुलै दरम्यान सुरु होणार आहे. या कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातील लाखो वारकरी वारीत सहभागी होत असल्याने ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावे वगळली जाण्याची भीती आहे, याचा विचार करुन पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर कार्यक्रम आयोजित करू नये, तो…

Read More

महायुतीचे जागावाटप ९९% पूर्ण:एक-दोन दिवसांत अधिकृत घोषणा होईल – बावनकुळे

विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप जवळपास ९९ टक्के पूर्ण झाले असून, पुढील एक-दोन दिवसांत त्याची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच जागावाटपाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीला जाण्याची गरज नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राज्यातच अंतिम…

Read More

विद्यार्थिनीने कुलर मागितले तर मिळाली नोटीस:नागपूरच्या सावित्रीबाई फुले वसतिगृहातील प्रकार; हा प्रकार लोकशाहीला काळीमा फासणारा – काँग्रेस

उन्हाळ्यामुळे प्रचंड उकडत असल्यामुळे एका विद्यार्थिनीने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कुलरची मागणी केली. त्यानंतर वसतिगृह प्रशासनाने सदर विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस बजावल्याची संतापजनक घटना नागपुरात घडली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हा प्रकार लोकशाही व्यवस्थेला काळीमा फासणारा असल्याची टीका करत सरकारवर आगपाखड केली आहे. आकांक्षा उके असे पीडित विद्यार्थिनीचे नाव आहे. ती नागपुरातील सावित्रीबाई…

Read More