आर्थिक संयम गरिबांनीच का बाळगावा?:आर्थिक संयम कामगार अन् ग्राहकांसाठी ओझे का बनतो? प्रकाश आंबेडकरांचा सरकारला सवाल
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी रुपयाच्या घसरणीचा थेट लाभ परदेशात डॉलर्सच्या रुपात गुंतवणूक करणाऱ्या देशातील धनदांडग्यांना होत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आर्थिक संयमाची परीक्षा गरिबांकडूनच का? तथा आर्थिक संयम कामगार व ग्राहकांसाठी ओझे का बनतो? अशा विविध प्रश्नांच्या फैरी झाडल्या आहेत. जागतिक बाजारात सध्या रुपयांची…