Headlines

तीव्र उन्हाळ्यात ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण भटकंती:दहीहंडा परिसरात तीव्र टंचाई; जलवाहिनीच्या निकृष्ट कामामुळे पाणी गावात न येता जाते वाहून‎

तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या दहीहंडा गावात पाणीपुरवठा योजना फसली असून नागरिकांवर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. भर उन्हाळ्यात ४५ अंश सेल्सिअस तापमानात महिला, लहान मुले, वृद्ध आणि सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, असे . यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले असून प्रशासन नेमकी काय भूमिका घेतली याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. एकीकडे लाखो…

Read More

चुकीच्या पद्धतीने वगळल्याचा आरोप:लाडकी बहीण योजनेतील घोळावरून महिला काँग्रेसचे हल्लाबोल आंदाेलन‎

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून चुकीच्या पद्धतीने महिलांना वगळण्यात आले असून त्यांना पुन्हा योजनेत समाविष्ट करण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महिला काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. अन्याय अजिबात त्रास सहन करणार नाही, असा इशाराही महिला काँग्रेसतर्फे देण्यात आला. आ. साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कशीश खान यांनी आंदोलन पुकारले. या आंदोलनात…

Read More

तात्पुरता दिलासा:जीवघेण्या उकाड्यानंतर पावसाच्या सरी, दहा ते पंधरा मिनीटाच्या पावसाने अनेक भागात वीज खंडित‎

तब्बल महिनाभराच्या जीवघेण्या उकाड्यानंतर आज अमरावतीकरांना पावसाने तात्पुरता दिलासा दिला खरा, पण त्याचसोबत महावितरणच्या ‘ढिसाळ’ कारभाराचे वाभाडेही काढले आहेत. मंगळवारी (दि. २६) दुपारी तीन वाजताच्या सुमारास शहरात जवळपास सर्वच भागांत मध्यम स्वरूपाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, केवळ १० ते १५ मिनिटे पडलेल्या या पहिल्याच पावसाने महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांची पोलखोल केली असून शहरातल्या अनेक भागांतील…

Read More

सांगोल्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या:आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मंत्रालयात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची घेतली भेट‎

सांगोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आज मुंबई येथे कृषीमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांची भेट घेत तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून प्रभावित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. यावर कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी…

Read More

भीमा नदीवर नवीन बॅरेज बंधारे मंजूर करावेत- काळे:पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मागणी‎

भीमा नदीवरील सध्याचे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे गळतीमुळे कुचकामी ठरत असून, उन्हाळ्यात शेतकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून भीमा नदीवर नवीन बॅरेज बंधारे मंजूर करावेत, अशी मागणी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी राज्याचे ग्रामविकास व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पालकमंत्री…

Read More

कोपरगाव तालुक्याला अवकाळीचा फटका:फळबागांचे मोठे नुकसान, आ. आशुतोष काळेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, पीके उद्ध्वस्त

कोपरगाव तालुक्यात अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाने ग्रामीण भागाला झोडपून काढले. या अवकाळी संकटामुळे अनेक गावांतील नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वादळामुळे शेकडो झाडे उन्मळून पडली असून, अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत. वीजवाहिन्यांवर झाडांच्या फांद्या कोसळल्याने अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. या पार्श्वभूमीवर, स्थानिक आमदार आशुतोष काळे…

Read More

भडका:पेट्रोल 23, डिझेलची खरेदी 52 टक्के वाढली, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

महाराष्ट्रात मार्चच्या तुलनेत मे महिन्यात पेट्रोल खरेदीत २३ तर डिझेलच्या खरेदीत ५२% वाढ झाली. यामागे साठेबाजीचा संशय व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले. इंधन बेकायदेशीरपणे व्यावसायिक वापरासाठी वळवले जात आहे का, याचा गृह, पुरवठा विभाग तपास करणार असल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले, पंपांवर अतिरिक्त पुरवठा होत आहे. तरीही नियमित किरकोळ वापराचे इंधन…

Read More

संत भीमा भोई महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रबोधन:आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गुणगौरव‎

येथील भोई समाजातर्फे समाजसुधारक संत शिरोमणी श्री भीमा भोई महाराज यांच्या १७६ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व प्रबोधनपर कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तालुक्याचे आमदार ॲड. अमोल पाटील यांच्या हस्ते संत भीमा भोई महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात संत शिरोमणी भीमा भोई महाराज यांच्या विचारांवर…

Read More

आई-वडिलांना विसरू नका, ते परत मिळत नाहीत- भुसारे:कन्नड तालुक्यातील शेलगाव पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन‎

जगात सर्व काही मिळेल, पण आई-वडील परत मिळणार नाहीत. ज्या आई-वडिलांनी हाताचा पाळणा केला, त्या आई-वडिलांना कधीच विसरू नका, असे प्रतिपादन ह.भ.प. रेणुका भुसारे यांनी केले. कन्नड तालुक्यातील शेलगाव येथील सोसायटीचे माजी संचालक दौलत सांडू शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त मंगळवारी (२६ मे) कार्यक्रम झाला. कीर्तनरूपी सेवेतून रेणुका भुसारे बोलत होत्या. शेलगावचे सरपंच विलास मनगटे,…

Read More

पैठणमध्ये 16,972 घरकुल लाभार्थींना 5 ब्रास मोफत वाळू‎:पहिल्या टप्प्यामध्ये 10 हजार 129 जणांना मोफत वाळूचे वाटप तहसील प्रशासनाकडून सुरू

सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी शासन स्तरावर विविध आवास योजना राबविल्या जातात. मात्र, महागाईच्या काळात घरकुल बांधणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले होते. विशेषतः वाळूचे गगनाला भिडलेले दर पाहता घरकुलाचे काम पूर्ण करताना . तालुक्यात एकूण १६ हजार ९७२ घरकुले मंजूर असून, पहिल्या टप्प्यात १० हजार १२९ लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप सुरू करण्यात आले असल्याची…

Read More