Headlines

विरोधकांनी प्रश्न विचारले की ती बदनामी?:मग जनतेने काय मरायचे का? ड्रग्जच्या मुद्द्यावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महाराष्ट्रातील वाढत्या ड्रग्जच्या मुद्द्यावरून राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच धारेवर धरले आहे. “छत्रपती शिवराय, शाहू-फुले-आंबेडकर आणि संतांच्या संस्कारांचा थोर वारसा असलेला महाराष्ट्र कोणाच्या एका वक्तव्याने बदनाम होऊच शकत नाही. पण जेव्हा आम्ही ‘बदनामी’ शब्द वापरतो, तेव्हा ती राज्याच्या गौरवाबद्दल नसते, तर गल्लीबोळात पसरलेल्या ड्रग्जच्या भीषण…

Read More

पालघरमध्ये वऱ्हाडींचा ट्रक अन् कंटेनरची धडक:12 जणांचा मृत्यू, 20 ते 25 गंभीर जखमी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रविवारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक अपघाताची घटना घडली आहे. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी वऱ्हाडी घेऊन जाणाऱ्या एका आयशर ट्रकची आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात १२ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर २० ते २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची भीषणता पाहता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त…

Read More

NCP चे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी:आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच आमदार पक्षाध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मागे ठामपणे उभे असल्याचा दावा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. काही लोक पक्षाविषयी मुद्दाम षडयंत्र रचत आहेत. पण आम्ही सर्वजण सुनेत्रा वहिनींच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत, असे ते म्हणालेत. दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याकडे…

Read More

सोलापूरमध्ये आढळला अत्यंत दुर्मिळ 'ल्युसिस्टिक' नाग:डोक्यावर आहेत पांढरे ठिपके; वन्यजीव संस्थेकडून सुरक्षित रेस्क्यू

बाळे (तोडकर वस्ती) भागात एका निवासी घराच्या आवारात दुर्मिळ प्रजातीचा ‘ल्युसिस्टिक’ नाग आढळून आला आहे. शनिवारी, १६ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास स्थानिक रहिवाशांना आपल्या वॉल कंपाऊंडजवळ एक साप दिसला. त्यांनी तात्काळ वन्यजीव संस्थेला याची माहिती दिली. ​संस्थेच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, सुमारे पावणेपाच फूट लांबीचा हा विषारी नाग असल्याचे स्पष्ट झाले. मात्र,…

Read More

बंगल्यातून 27 लाखांचे दागिने लंपास:घर कामगार दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल, कात्रज-कोंढवा परिसरातील घटना

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील एका बंगल्यातून २७ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याप्रकरणी घरकाम करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आनंदतीर्थ सोसायटीत घडली असून, येवलेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी कृष्णकुमार चंद (वय २५) आणि त्याची पत्नी सीता (वय २३) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दाम्पत्य…

Read More

गाडीत डिझेल नाही, मुलीला कसे शोधणार?:बेपत्ता मुलीला शोधण्याची मागणी करणाऱ्या कुटुंबाला नागपूर पोलिसांचे उत्तर; काँग्रेसचा घणाघात

एक मुलगी बेपत्ता झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी गाडीत डिझेल नसल्यामुळे तिला शोधण्याची जबाबदारी झटकल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. देशाला अमृतकालची स्वप्ने दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या राजवटीत आज पोलिस स्टेशनची गाडी डिझेल अभावी बंद पडतेय. हा अमृतकाल नाही, तर व्यवस्थेच्या अपयशाचा काळ आहे, अशी टीका काँग्रेसने या प्रकरणी केली आहे. नागपूर शहरातील पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक मुलगी…

Read More

अमिगो ॲकॅडमीकडून विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक:राज्य सरकारने कारवाई करावी; सुनील माने यांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी पुण्यातील ‘अमिगो ॲकॅडमी’वर विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. विमान कर्मचारी, आतिथ्य व्यवस्थापन आणि पर्यटन क्षेत्रातील प्रशिक्षणाच्या नावाखाली ही फसवणूक झाल्याचे त्यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. माने यांनी राज्य सरकारने या संस्थेवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. सुनील…

Read More

नीट घोटाळ्यामुळे ४ विद्यार्थ्यांची आत्महत्या:पालकांचे संसार उद्ध्वस्त, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – राजू शेट्टी

नीट परीक्षा घोटाळ्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घोटाळ्यामुळे निर्माण झालेल्या नैराश्यातून आतापर्यंत चारहून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, खासदार राजू शेट्टी यांनी या घोटाळ्याला जबाबदार असलेल्या अधिकारी, दलाल आणि संस्थाचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. शेट्टी यांनी म्हटले आहे की, या आत्महत्या नसून सरकारी अनास्थेने केलेल्या हत्या आहेत….

Read More

मुंबई महापालिकेतील 79 नगरसेवकांच्या निवडीला आव्हान!:न्यायालयात याचिका दाखल, BMC वर मोठा परिणाम होण्याची शक्यता; काय आहे प्रकरण?

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 संदर्भात एक मोठी माहिती समोर आली असून, थेट 79 नगरसेवकांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या निवडणूक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. यातील अनेक याचिका सध्या न्यायप्रविष्ट असून काही प्रकरणांवर सुनावणी देखील सुरू आहे. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधींच्या निवडीविरोधात आक्षेप घेतले गेल्यामुळे संपूर्ण मुंबई महापालिका निवडणूक प्रक्रियेवरच आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

Read More

अजितदादांविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा दावा:रोहित पवारांच्या विधानानंतर राजकीय खळबळ; अमोल मिटकरींचा थेट इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत नाराजीच्या चर्चांना आता नवे वळण मिळाले आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांविषयी पक्षातीलच दोन वरिष्ठ नेते अत्यंत खालच्या भाषेत बोलत असल्याची एक ऑडिओ क्लिप समोर आल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. या…

Read More