विरोधकांनी प्रश्न विचारले की ती बदनामी?:मग जनतेने काय मरायचे का? ड्रग्जच्या मुद्द्यावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल
स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महाराष्ट्रातील वाढत्या ड्रग्जच्या मुद्द्यावरून राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच धारेवर धरले आहे. “छत्रपती शिवराय, शाहू-फुले-आंबेडकर आणि संतांच्या संस्कारांचा थोर वारसा असलेला महाराष्ट्र कोणाच्या एका वक्तव्याने बदनाम होऊच शकत नाही. पण जेव्हा आम्ही ‘बदनामी’ शब्द वापरतो, तेव्हा ती राज्याच्या गौरवाबद्दल नसते, तर गल्लीबोळात पसरलेल्या ड्रग्जच्या भीषण…