Headlines

नागपूर पोलिसांनी दरवाजा तोडून वाचवले महिलेचे प्राण:रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेसाठी तयार केला 'ग्रीन कॉरिडोअर

नागपूर शहर पोलिस आयुक्तालयाच्या बेलतरोडी पोलिसांनी तत्पर आणि धाडसी कारवाई करत एका महिलेचा जीव वाचवला. त्यांच्या वेगवान हालचालींमुळे एका कुटुंबात घडणारी संभाव्य हत्या टळली. 21 मे 2026 रोजी रात्री 12:05 वाजता बेलतरोडी पोलिसांचे नाईट पॅट्रोलिंग सुरू असताना, गोटाळपांजरी परिसरात आरोपीच्या वडिलांनी पोलिस वाहन थांबवले. त्यांच्या मुलाने पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. वरिष्ठ…

Read More

नाशिकमध्ये आंतरजातीय विवाहानंतर विवाहितेचा छळ:8 वेळा गर्भपात घडवला, पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रेमविवाह करून सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या एका विवाहितेचा जात वेगळी असल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. तू आमच्या जातीची नाहीस, असे टोमणे मारत विवाहितेची इच्छा नसताना तिचा तब्बल 8 वेळा गर्भपात घडवून आणल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिकच्या म्हसरूळ पोलिस ठाण्यात पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा…

Read More

ठाण्यात मध्यरात्री अग्नितांडव:भाजी मार्केटला आग; जीव वाचवताना अग्निशमन जवानासह दोघांचा दुर्दैवी मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी

ठाण्यातील नौपाडा परिसरातील गावदेवी भाजी मार्केटमध्ये बुधवारी पहाटे भीषण आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली. गोखले रोडवरील गावदेवी प्रभाग समिती कार्यालयाजवळ असलेल्या या मार्केटमध्ये पहाटे साडेतीनच्या सुमारास अचानक आग भडकली आणि काही क्षणांतच संपूर्ण परिसर धुराने वेढला गेला. आग इतकी भीषण होती की, घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या, जम्बो वॉटर टँकर, रेस्क्यू वाहने आणि आपत्ती…

Read More

नव्या आयकर कायद्यामुळे करप्रणाली अधिक सुलभ:अहिल्यानगरमध्ये ‘नवीन इनकम टॅक्स ॲक्ट 2025’ वर कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद‎

आयकर भवन, अहिल्यानगरच्या वतीने बुरुडगाव रोडवरील सीए भवन येथे “नवीन इनकम टॅक्स ॲक्ट २०२५’ या विषयावर विशेष जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चार्टर्ड अकाउंटंट, करसल्लागार, व्यापारी, बँक अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे रेंज-१ चे कमिश्नर ऑफ इन्कम टॅक्स डॉ. उमेश फडे उपस्थित होते. त्यांनी सांगितले की,…

Read More

पाणी, वीज पुरवठा सुरळीत,पण डीपीच जळत असल्याने पिकेही वाळू लागली:वटवटे येथे शेती पंपाचे वर्षभरात 10 ते 12 डीपी जळाले, शेतकऱ्यांचा टाहो

वटवटे (ता.मोहोळ) गावाजवळील महावितरणचा पाणी पुरवठा शेती डिपी वारंवार जळत असल्याने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. वर्षभरात १० ते १२ डीपी जळाले आहेत. तक्रार करून ही अधिकाऱ्याकडून लक्ष दिले जात नाही. मागील ३ ते ४ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी अतिरिक्त डिपीची म . महावितरणच्या कामती (बू.) शाखा कार्यालयांतर्गत असलेल्या या गावाच्या शेतीला वीजपुरवठा करणारा पाणीपुरवठा या नावे…

Read More

औषध विक्रेत्यांचा बंद; लोकांची उन्हात पायपीट:अत्यावश्यक सेवेसाठी असलेल्या दुकानांवर गर्दी‎

बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून होणाऱ्या स्पर्धेच्याविरोधात औषध विक्रेता संघटनेने बुधवारी पुकारलेल्या बंदला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे गरजूंची औषधींसाठी चांगलीच धावपळ झाली. विक्रेत्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदमुळे ४५.२ अंश उन्हातही रूग्णांच्या नातेवाईकांवर गोळ्या-औषधींसाठी इकडे-तिकडे फिरण्याची डाबकी रोडवरील व्यक्तिला औषधीसाठी गांधी चौक, वाशीम स्टँडपर्यंत जावे लागले. ही मेडिकल स्टोअर्स अत्यावश्यक सेवेसाठी सुरू होती. ९ दुकाने…

Read More

अकोल्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या घरापासून जनगणनेला केला प्रारंभ:अचूक नियोजन, पारदर्शकतेसाठी करण्यात येताेय डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर‎

देशाच्या आगामी काळातील विकासाचा आणि विविध लोककल्याणकारी योजनांचा मुख्य पाया ठरणाऱ्या ‘भारत जनगणना-२०२७’ च्या मोहिमेला अकोला शहरात प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील या देशव्यापी मोहिमेचा अधिकृत प्रारंभ बुधवारी (दि. २०) अकोला महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व झोन अंतर्गत करण्यात आला. विशेष म्हणजे, शहरातील पहिल्या कुटुंबाची नोंदणी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या शासकीय निवासस्थानापासून (अनुक्रमांक १) करून या…

Read More

अमरावती विभागाची ऐतिहासिक कामगिरी:महाआवास अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक, अमरावती विभागाने विविध स्तरावरील आठ पुरस्कार पटकावले‎

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या ‘महाआवास अभियान २०२३-२४’ मध्ये अमरावती विभागाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करत अमरावती विभागाने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सातारा येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

‘तुमचं बरोबर आहे’ या मंत्राने कटू प्रसंग टळतात:मन करा रे प्रसन्न’ विषयावर डॉ. संजय उपाध्ये यांचे व्याख्यान‎

मनाचा थांग भल्याभल्यांना लागत नाही. संत तुकाराम, समर्थ रामदास, संत ज्ञानेश्वर अशा अनेक संतांनी मनाचे महत्त्व सांगितले आहे. आयुष्याच्या प्रवासात चढ-उतार येणारच. पण प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा मनाची प्रसन्नता ठेवता येते हे संतांनी दाखवून दिले आहे. स्वतःबद्दलचे अवास्तव भ्रम, अहंकार, द्वेष, मत्सर या गोष्टी मनाच्या आरोग्याला बाधक आहेत. ‘तुमचे बरोबर आहे’ हा महामंत्र लक्षात ठेवला तर…

Read More

गावही कूस बदलतेय:काळाच्या ओघात गावरान आंबे नष्ट; आडी अन् सुवासही झाला दुर्मीळ

शेतातील बांधावरची जुनी मोठाली गावरान आंब्याची झाडे काळाच्या ओघात नष्ट झाल्याने गावरान आंबा, त्याच्या ‘आडी’ आणि सुगंधही दुर्मिळ झाला आहे. पूर्वी सर्रास शेतकऱ्यांच्या बांधावर अथवा शेतात नैसर्गिक रित्या उगवण झालेली मोठी आंब्याची झाडे असायची. गावोगावी ठराविक भाग आमराई म्हणून ओळखला जायचा. मात्र काळाच्या ओघात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शेतीचेही विभाजन होऊ लागले, परिणामी विभागून आलेल्या जमिनीत…

Read More