Headlines

केडीएमसीतील डॉक्टरांवरील हल्ल्याप्रकरणी सरकारची कडक भूमिका:'मारहाण अयोग्य, चौकशी करून कारवाई होणार', आबिटकर-कदम यांचा इशारा

केडीएमसी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांवरील मारहाणीच्या घटनेनंतर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी डॉक्टरांना मारहाण करणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी तक्रारींसाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन केले. तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर…

Read More

पावसाळी अधिवेशनाचा बारावा दिवस:डॉक्टरांचा निष्काळजीपणा, गावांमध्ये स्मशानभूमीच नसल्याचा मुद्द्यावरुन विधानसभेत खडाजंगी

पावसाळी अधिवेशनात आज सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या आणि तितक्याच गंभीर प्रश्नांवरून विधानसभेत मोठी चर्चा पाहायला मिळाली. एकीकडे राज्यातील डॉक्टरांच्या वाढत्या निष्काळजीपणामुळे रुग्णांच्या जिवाशी होत असलेल्या खेळाचा मुद्दा सभागृहात आक्रमकपणे उपस्थित करण्यात आला; तर दुसरीकडे, प्रगत महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये अंत्यविधीसाठी साधी ‘स्मशानभूमी’ उपलब्ध नसल्याचे विदारक वास्तव सभागृहात मांडण्यात आले. दरम्यान, अनधिकृत वाहतूक आणि RTO मधील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काल…

Read More

धरणातून 27 हजार क्युसेक पाणी सोडले:पुण्यात मुठा नदीपात्रातील रस्ते वाहतुकीसाठी बंद

पुण्यातील मुठा नदीपात्रातील पाणी पातळी वाढल्याने नदीकाठावरील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. खडकवासला धरण साखळीतून 27 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीपात्रातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. सुरक्षेसाठी नदीपात्राकडे जाणाऱ्या रस्त्यांवर लोखंडी कठडे लावण्यात आले आहेत. बुधवारी रात्री खडकवासला धरण साखळीत मुसळधार पाऊस झाला. यामुळे धरणातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली. परिणामी, धरणातून टप्प्याटप्प्याने…

Read More

फडणवीसांनी गृहमंत्रीपद झेपत नसेल तर तसे सांगावे, दिल्लीतून कारभार चालतोय?:ते दिल्लीला मुख्यमंत्रीपदाची 50 टक्के किंमत मोजून ते मोकळे झालेत; राऊतांचा शिंदेंवर नाव न घेता गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्रीपद झेपत नसेल तर त्यांनी तसे सांगावे की मला हे पद झेपत नाही, किंवा माझे गृहमंत्रीपद मी चालवत नसून दिल्लीतील कोणीतरी चालवत आहे ते गुंडगिरीला समर्थन देत आहे हे त्यांनी समोर येत सांगितले पाहिजे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील इतर काही भाग…

Read More

सरसकट कर्जमाफी अन् स्मार्ट मीटर हटावसाठी पारनेरात भाकपचा मोर्चा:मनरेगा व शाळा वाचवण्यासाठी आंदोलन; तहसीलदार सौंदाणे यांना दिले निवेदन

सरसकट कर्जमाफी, स्मार्ट मीटरला तीव्र विरोध, ‘मनरेगा’ कायद्याचे संरक्षण आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा वाचवण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने मंगळवारी (७ जुलै) पारनेर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. पारनेरच्या खालच्या वेशीतील ऐतिहासिक लाल चौकातून घोषणाबाजीत सुरू झालेला हा मोर्चा मुख्य बाजारपेठेतून मार्गस्थ होत तहसील कचेरीवर धडकला. तेथे मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत…

Read More

गुंज शिवारात जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा:2 दुचाकी, तीन मोबाईल जप्त, चौघांवर वसमत ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

वसमत तालुक्यातील गुंज शिवारात झन्नामन्ना जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून दोन दुचाकी , तीन मोबाईलसह 1.21 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चौघांवर वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 7 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात अवैध व्यवसायाची माहिती घेऊन कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी विशेष पथक स्थापन केले…

Read More

साताऱ्यात मन सुन्न करणारी दुर्घटना:एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात अख्खं कुटुंब संपलं; विजेच्या धक्क्याने 4 जणांचा जागीच मृत्यू

सातारा जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक अत्यंत वेदनादायी घटना फलटण तालुक्यातून समोर आली आहे. तालुक्यातील खामगाव येथे बुधवारी पहाटे विजेचा जोरदार धक्का लागल्याने एकाच कुटुंबातील तब्बल चार सदस्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. डोळ्यांदेखत आपल्या माणसाला तडफडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या इतर तिघांनाही या जीवघेण्या विजेच्या प्रवाहाने आपल्या कवेत घेतले. एका क्षणात संपूर्ण कुटुंबच काळाच्या पडद्याआड गेल्याने…

Read More

मोहोळमध्ये 50 वाहन चालकांवर कारवाई:वाहतूक नियमभंग करणाऱ्यांकडून 39,500 रुपयांचा दंड वसूल, पार्किंगबाबत सूचना‎

मोहोळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार हे सेवानिवृत्त झाल्याने सदर ठिकाणी पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांची नियुक्ती झाली आहे. मोहोळ पोलिस स्टेशनचा पोलिस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मोहोळ शहरातील वाहतुकीसह रस्त्यावर होणारा अतिक्रमणाचा अडथळा दूर करण्यास सुरुवात केली आहे. सोमवार, दि. ६ जुलै रोजी केलेल्या कारवाईमध्ये ५० वाहनांवर दंडात्मक कारवाई करून ३९,५०० रुपयांचा दंड…

Read More

ग्रामपंचायतींकडून पालखी स्वागताची तयारी:हिरकणी कक्षांची उभारणी सुरू, यात्रा अनुदान मिळाल्याने कामांना वेग; 22 जुलै रोजी दिंड्यांचा तालुक्यात प्रवेश

. आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचे प्रस्थान झाले असून, येत्या २२ जुलै रोजी या पालख्यांचे पंढरपूर तालुक्यात आगमन होणार आहे. यंदा शासनाकडून पालखी प्रस्थानापूर्वीच भरघोस यात्रा अनुदान मिळाल्याने, स्वागतासाठी पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पंढरपूर तालुक्यतील पिराची कुरोली, भांडीशेगाव, वाखरी, गोपाळपूर आणि करकंब यांसारख्या महत्त्वाच्या…

Read More

श्री संत गुलाबराव महाराज यांना अभिवादन‎:महाराजांचे जीवनचरित्र, समाजप्रबोधनपर कार्यास विद्यार्थ्यांनी दिला भाषणातून उजाळा

प्रतिनिधी । मोर्शी भारतीय महाविद्यालय, मोर्शी येथे राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी संत गुलाबराव महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष आगरकर हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून वाणिज्य विभागप्रमुख डॉ….

Read More