Headlines

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय:पालघरला 'रेड' तर मुंबईसह कोकणाला 'ऑरेंज' अलर्ट; कोणत्या जिल्ह्यात कसा असणार पाऊस? जाणून घ्या

राज्यात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढला असून, येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या विविध भागांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील पाच दिवसांचा सविस्तर अंदाज जाहीर केला असून, विशेषतः कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह अनेक जिल्ह्यांसाठी प्रशासनाकडून विविध स्तरांचे अलर्ट जारी करण्यात आले आहेत. कोकणात पावसाचा जोर…

Read More

हिंगोली जिल्हा परिषदेचा गतीमान कारभार:अवघ्या 20 मिनिटांत 23 शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती

हिंगोली जिल्हा परिषदेच्या गतीमान प्रशासनाचा पुन्हा एकदा शिक्षकांना अनुभव आला असून बुधवारी ता. ८ मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या उपस्थितीत अवघ्या २० मिनीटात २३ शिक्षकांना उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यावेळी सेनगाव तालुक्यातील सर्वच रिक्तजागा भरण्यात आल्या असून समुपदेशनामुळे शिक्षकांनीही समाधान व्यक्त केले आहे. हिंगोली जिल्हा परिषदेत मागील अनेकवर्षापासून प्रलंबित असलेली कर्मचाऱ्यांची प्रकरणे…

Read More

जुन्नर-आंबेगावमध्ये अतिवृष्टी; पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू:धबधबे, गडकिल्ले, घाटमाथ्यावर जाण्यास मनाई; 13 रस्तेही बंद

जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रांताधिकारी अर्चना तांबे यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धबधबे, घाटमाथा, गडकिल्ले आणि इतर पर्यटनस्थळांवर दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन हे उपाय योजण्यात आले आहेत. या अधिसूचनेनुसार, जुन्नर तालुक्यातील आंबोली धबधबा (दऱ्याघाट), माळशेज घाट, कांचन धबधबा (हातवीज), रिव्हर्स…

Read More

पुणे मनपातर्फे खडकवासला जलाशयात जलपूजन:शहराला वर्षभर पाणीपुरवठ्यासाठी चांगल्या पावसाची प्रार्थना

खडकवासला धरण भरल्यानंतर सालाबादप्रमाणे पुणे महानगरपालिकेतर्फे खडकवासला जलाशय येथे जलपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा व्हावा, तसेच नागरिकांना वर्षभर मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने विधिवत जलपूजन करण्यात आले.यावेळी आमदार भीमराव तापकीर आणि पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. या प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम…

Read More

नागपूर विमानतळ विकास वेळेपूर्वीच पूर्ण होणार:जीएमआर समूह आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ विकसित करणार

जीएमआर समूहाने नागपूर विमानतळाचा विकास निर्धारित वेळेपूर्वीच पूर्ण करण्याची हमी दिली आहे. २५ जून २०२६ रोजी विमानतळाचे कामकाज अधिकृतपणे हाती घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत जीएमआर समूहाचे कार्यकारी संचालक एस.जी.के. किशोर यांनी ही माहिती दिली. यापुढे नागपूर विमानतळ विकासात कोणताही विलंब होणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी जीएमआर नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत…

Read More

30 वर्षांनंतर अधिवेशन काळात विधानभवनात शरद पवारांची उपस्थिती:महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरील उच्चाधिकार समितीची बैठक

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी विधानभवनात उच्चाधिकार समितीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडत आहे. आगामी काळात सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी अधिवेशन काळात…

Read More

गोठ्याच्या कामाची मोजमाप पुस्तिकेत नोंद घेण्यासाठी 5 हजारांची लाच:कंत्राटी अभियंत्यास अटक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

वसमत तालुक्यातील किन्होळा येथे गोठ्याच्या कामाची मोजमाप पुस्तिकेत नोंद घेऊन दुसरा व तिसरा हप्ता मिळवून देण्यासाठी 5 हजाराची लाच मागणाऱ्या वसमत पंचायत समितीच्या कंत्राटी अभियंत्या विरुद्ध वसमत शहर पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. 8) गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. लाचलुचपत विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील किन्होळा येथील एका तक्रारदारास गाय गोठा…

Read More

कैद्यांच्या अन्नात शेकडो कोटींचा घोटाळा:शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव, जेलमध्ये मात्र तिप्पट दराने खरेदी, याची चौकशी व्हावी- संदीप देशपांडे

राज्यातील जेल प्रशासनाकडून कैद्यांच्या अन्न खरेदीमध्ये शेकडो कोटी रुपयांचा प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. एकीकडे सरकार पारदर्शक कारभाराचा दावा करते, मग या महाघोटाळ्याकडे सरकारचे लक्ष का नाही? हा घोटाळा करणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करणार का? असा संतप्त सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. या घोटाळ्याप्रकरणी मेसर्स एमपी भुतडा (लातूर) या कंपनीला वर्क ऑर्डर…

Read More

विधानसभेत मुख्यमंत्र्यांचे सविस्तर उत्तर:पूरमुक्तीसाठी 13 हजार कोटींचा आराखडा, कनेक्टिंग लिंकवरून टीकेवर म्हणाले- एखाद कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर ते पैदा झाले!

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) मुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नावर विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी त्यांनी यंदाच्या पावसाची तीव्रता, पूरनियंत्रणासाठीचा 13 हजार कोटी रुपयांचा आराखडा, धोकादायक इमारती, झाडे कोसळण्याच्या घटना तसेच विविध विकासकामांबाबत सविस्तर भूमिका मांडली. नियम 293 अंतर्गत झालेल्या या चर्चेत…

Read More

राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार:धुळ्यात परप्रांतीयांकडून नियमबाह्य जमीन खरेदी, शेतकरी नसताना जमीन घेणाऱ्यांचा शोध सुरू- बावनकुळे

राज्यातील सर्व ख्रिश्चन मिशनरींच्या नावावर असलेल्या जमिनींची महसूल विभागाकडून कसून तपासणी केली जाणार आहे. येत्या तीन महिन्यांत जमाबंदी आयुक्तांमार्फत ही चौकशी पूर्ण केली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रश्नावर बोलाताना त्यांनी ही माहिती दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, प्रामुख्याने नाशिकमधील ख्रिश्चन मिशनरींच्या ताब्यातील जमिनींचे सर्व…

Read More