Headlines

महायुतीचा फॉर्म्युला फिक्स! रणसंग्रामाआधी मास्टरप्लॅन तयार:विधानपरिषदेत भाजपचा दबदबा, शिवसेना-राष्ट्रवादीला किती जागा?

राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्या असून जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीमध्ये भाजप सर्वाधिक म्हणजे 12 जागांवर उमेदवार देणार असून शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर…

Read More

राज्यात 20% विक्री वाढल्याने पेट्रोल-डिझेलचा कृत्रिम तुटवडा:भुजबळांनी केला खुलासा; इंधन संकटाच्या चर्चा, पण सरकार म्हणतंय पुरेसा साठा

आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात इंधनटंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवा वेगाने पसरू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन खरेदी करण्यास सुरुवात केल्याने काही पेट्रोल पंपांवर गर्दीही वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणतीही…

Read More

एपिस्टन फाईलमध्ये नाव आल्याने पंतप्रधानांच्या भूमिका बदलल्या:ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप; इंधन दरवाढीला मोदी जबाबदार

एपिस्टन फाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आल्यानंतर त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताच्या भूमिका सातत्याने बदलत आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. देशातील इंधन आणि गॅस टंचाई तसेच दरवाढीसाठी पंतप्रधान मोदीच एकमेव जबाबदार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आंबेडकर म्हणाले की, भारतात गॅस आणि इंधनाची टंचाई आहे. युद्ध…

Read More

अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक:संदीप कोतकरांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा, संख्याबळात भाजप नंबर वन, तरीही जागा राखण्यासाठी राष्ट्रवादीचा प्रबळ दावा

अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद जागेसाठी महायुतीमध्ये तीव्र रस्सीखेच सुरू झाली आहे. मागील दोन निवडणुकांमध्ये दिवंगत अरुण जगताप यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवर वर्चस्व राखले होते, त्यामुळे राष्ट्रवादी या जागेवर आपला मूळ दावा सांगत आहे. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे सध्या अस्तित्वात असलेल्या एकूण 461 मतदारांपैकी सर्वाधिक 199 नगरसेवक भाजपचे आहेत. या संख्याबळाच्या…

Read More

आंतरवाली सराटीत प्रसाद लाड – जरांगेंत चर्चा:जरांगेंनी 30 तारखेचे उपोषण मागे घ्यावे – लाड; सरसकट कुणबी प्रमाणपत्र का दिले नाही – जरांगे

मराठा आंदोलनाचा केंद्रबिंदू असणाऱ्या आंतरवाली सराटीत सध्या मराठा आंदोलक मनोज जरांगे व भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात चर्चा सुरू आहे. त्यात लाड यांनी जरांगे यांना त्यांचे संभाव्य आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. त्यावर जरांगे कोणती भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. प्रसाद लाड म्हणाले, सध्या कडाक्याचे उन पडले आहे. त्यामुळे माझे मनोज जरांगे यांना…

Read More

एक धमकी आली तर घाम फुटला,तुम्ही स्वतःला भगतसिंग समजता का?:प्रसाद लाड यांच्या धमकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात!

भारतीय जनता पक्षाचे गुंड आम्हाला रोज धमक्या देतात आम्ही तक्रारी करतो का? आम्ही लढतो आहोत. तुम्हाला एक धमकी आली तर तुम्हाला घाम फुटला असे उबाठाचे नेते संजय राऊत यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना आलेल्या धमकीवर बोलताना म्हटले आहे. देशामध्ये आता झुरळ बंड करायला लागले तर विषय धमकीच्या पुढे काही होऊ शकते. संजय राऊत म्हणाले…

Read More

वाघिणीच्या हल्ल्यात 4 महिला ठार:चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील भयंकर घटना, जंगलात तेंदूपत्ता तोडत असताना वाघाचा हल्ला

जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघिणीने केलेल्या हल्ल्यात तब्बल 4 महिलांचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यात घडली आहे. या घटनेत इतर काही महिला जखमी झाल्याची माहिती आहे. गतवर्षी 10 मे रोजी सिंदेवाही तालुक्यातील मेंढा (माल) जंगलात वाघाने 3 महिलांचा बळी गेला होता. त्यानंतरही ही दुसरी मोठी घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही…

Read More

भाजप नेते प्रसाद लाड मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या भेटीला:मात्र, भेटीआधी धमकीचा फोन, दोन जण पोलिसांच्या ताब्यात

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले असताना भाजप नेते प्रसाद लाड आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नियोजित भेटीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा गोंधळ उडाला. प्रसाद लाड आज अंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. मात्र त्याआधीच त्यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली असून, ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या…

Read More

पेरणीपूर्वीच बळीराजा संकटात, डिझेल महागल्याने मशागत खर्चात 20% वाढ:मजूर टंचाई-उसाची एफआरपी न मिळाल्याने शेतकरी दुहेरी आर्थिक कात्रीत‎

. खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेल आणि पेट्रोलच्या दरात झालेल्या वाढीमुळे ट्रॅक्टरच्या साहाय्याने केल्या जाणाऱ्या मशागतीचे दर २० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. जिल्ह्यात आधीच काही कारखानदारांनी उसाची एफआरपीप्रमाणे बिले अदा केलेली नाहीत. त्यातच आता शेतीचा उत्पादन खर्च वाढल्याने आणि उत्पादनाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर खरीप पेरणी कशी करावी, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मोहोळ तालुक्यात…

Read More

मार्गदर्शन:नोकरीच्या संधींवर अवलंबून न राहता, स्वतः उद्योजक बनून इतरांना रोजगार उपलब्ध करा

बदलत्या काळात केवळ नोकरीच्या संधींवर अवलंबून न राहता, स्वतः उद्योजक बनून इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देणे ही काळाची गरज बनली आहे. हाच मुख्य उद्देश केंद्रस्थानी ठेवून बार्शी तालुक्यातील शेळगांव (आर) येथे ‘छावा प्रतिष्ठान’च्या वतीने या विशेष उद्योग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील तरुण-तरुणी, महिला आणि विविध बचत गटांच्या सदस्यांमध्ये या मेळाव्याच्या माध्यमातून उद्योजकतेची…

Read More