गणपती मिरवणुकीत अंडी फेकण्याचा प्रकार यापूर्वी कधीच नाही:आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल, नाशिक कुंभमेळ्याच्या कामांवरूनही भ्रष्टाचाराचा आरोप
नाशिक येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची निकृष्ट दर्जाची कामे, मुंबईत गणपती आगमन मिरवणुकीवर अंडी फेकल्याची घटना आणि राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न या मुद्द्यांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर आणि विशेषतः मुख्यमंत्री व भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण…