Headlines

न्याहारी माता डोंगराला आग; दोन हजार झाडांचे नुकसान:वनविभाग व नागरिकांनी तासभर प्रयत्नांनी विझवली आग

प्रतिनिधी | दिंडोरी दिंडोरी वनपरिक्षेत्रातील कोराटे येथील न्याहारी माता डोंगराला शनिवारी (दि. ९) सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत सुमारे २५ एकर परिसर भस्मसात झाला असून जवळपास दोन हजार झाडांचे नुकसान झाले आहे. या आगीत डोंगरावरील जैवविविधतेलाही मोठा फटका बसला. वनविभाग आणि स्थानिक निसर्गप्रेमी नागरिकांनी जीवाची बाजी लावत तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर वणवा आटोक्यात आणला. या उन्हाळ्यात न्याहारी…

Read More

अजिंठा घाटात ट्रॅव्हल्स-ॲपेचा ‎अपघात; १ तास वाहतूक कोंडी‎:दोन जण गंभीर जखमी, ३ दिवसांत तिसऱ्यांदा घडला अपघात‎

प्रतिनिधी | फर्दापूर अजिंठा घाटातील अपघाताची मालिका सुरूच असून, शुक्रवार आणि शनिवारनंतर पुन्हा रविवारी घाटात ट्रॅव्हल्स आणि मालवाहतूक ॲपेचा समोरासमोर अपघात झाला. यात दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जळगावला दाखल केले आहे. दरम्यान, या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक एक तास खोळंबली होती. अजिंठा घाटात रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरकडुन ट्रॅव्हल्स…

Read More

पोलिस दलात कार्यरत राहून दोघे बनले पीएसआय‎:उत्कर्ष मोहरे लेफ्टनंटपदी पाचपीरवाडीतील ग्रामस्थांच्या वतीने तीन जणांचा सत्कार‎

प्रतिनिधी | लासूर स्टेशन मनाशी जिद्द असेल तर‌ नशीब बदलायला वेळ लागत नाही. याचा प्रत्यय पाचपीरवाडीतील तीन तरुणांनी दाखवला आहे. पाचपीरवाडीतील शेतकरी पुत्र अनिल गिरजाराम नायमने आणि सुनील विठ्ठल जंघाळे या दोघांची पोलिस कर्मचारी ते पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. दोघेही पोलीस दलात कार्यरत असताना कर्तव्य सांभाळून त्यांनी एमपीएससी परिक्षेत यश मिळवले. तर गावातील उत्कर्ष…

Read More

सरस्वती विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात:२००७ च्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी २० वर्षांनंतर एकत्र येत आनंद लुटला

आमठाणा| सिल्लोड तालुक्यातील तळणी येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सण २००६ से २००७ च्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी २० वर्षांनंतर एकत्र येत कासोद येथील गजानन लॉन्स येथे गेट-टुगेदरचा आनंद लुटला. अनेक वर्षानंतर जुन्या मित्र मैत्रिणींची भेट झाल्याने शालेय जीवनातील आठवणींना उजाळा मिळाला. यावेळी शाळेचे प्राचार्य श्री अशोक गरुड उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून…

Read More

अनाथ लेकीही अभिमानाने म्हणणार, "मी माहेरी चालले’:पुणे-मुंबई महामार्गावर "माहेरवाशी’ प्रकल्प

ज्या मुलीच्या डोक्यावर आईची माया नाही आणि पाठीशी वडिलांचा आशीर्वाद नाही, तिची व्यथा शब्दांत मांडणे कठीण असते. सासरी गेल्यावर जेव्हा ही मुलगी आपल्या नणंद किंवा जाऊबाईंना माहेरी येता-जाताना पाहते, तेव्हा तिच्या मनात एकच ठसठसणारी कळ उठते, “काहीही असो, माझंही एक माहेर असतं तर…’ अनाथ विवाहित लेकींच्या मनातील हीच आर्त हाक आता प्रत्यक्षात उतरणार आहे. तर्पण…

Read More

अमरावतीजवळ डबा पार्टीस गेलेल्या भावंडांसह चार जणांचा तलावात बुडून मृत्यू:घातखेडा तलावातील गाळात एकामागाेमाग चाैघेही अडकले

अमरावतीमधील खोलापुरी गेट परिसरातील दहा मुले-मुली रविवारी शहरापासून १० किमी अंतरावरील घातखेडा तलावाजवळ डबा पार्टीसाठी गेले होते. जेवणानंतर पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या १२ वर्षीय मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात एकामागोमाग चौघेजण तलावातील गाळात अडकले. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. सोनाली नरेंद्र जोशी (१६), आदित्य ऊर्फ मानव नरेंद्र जोशी (१३), पायल बबलू पंडित (२१), यश गजानन काकणे (१३, सर्व…

Read More

'ते पन्नास दिवस' कादंबरीची प्रेरणा स्थलांतरित मजुरांचा संघर्ष:प्रगतिशील लेखक संघाच्या 'गाठभेट लेखकाशी' कार्यक्रमात पवन भगत यांचे मत

अमरावती: ‘ते पन्नास दिवस’ या कादंबरीचे लेखक पवन भगत यांनी सांगितले की, कोरोना काळातील लॉकडाउनमध्ये स्थलांतरित मजुरांच्या वाट्याला आलेला जीवघेणा संघर्षच त्यांच्या कादंबरीची प्रेरणा ठरला. प्रगतिशील लेखक संघाच्या चांदूर रेल्वे शाखेतर्फे आयोजित ‘गाठभेट लेखकाशी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. करोना महामारीच्या काळात भारताच्या विविध महानगरांत स्थलांतरित मजुरांचे झालेले हाल अत्यंत वेदनादायी होते. बंद पडलेली उद्योग…

Read More

42,680 जागांसाठी 11 वी प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून सुरू:पहिली यादी 14 मे रोजी, 19 पासून इनहाऊस कोटा, अल्पसंख्यकांनाही संधी

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता अकरावी प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यात एकूण ३३९ महाविद्यालयांमध्ये सुमारे ४२,६८० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. सोमवार, ११ मे पासून अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू होत आहे, ज्याला ‘टप्पा दोन’ असे नाव देण्यात आले आहे. या टप्प्यात विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या निवडीचा पसंतीक्रम नोंदवता येणार आहे. दहावीचा निकाल दोन दिवसांपूर्वी घोषित…

Read More

आदर्श हायस्कूलचा दहावीत 100 टक्के निकाल:130 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत; भूमिका साखरे 97% गुणांसह प्रथम, जानवी येवले द्वितीय

दर्यापूर येथील आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत १०० टक्के निकाल लावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील तब्बल १३० विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण होऊन शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. या निकालात एकूण १०२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. भूमिका साखरेने ९७ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. जानवी येवलेने ९५ टक्के…

Read More

तुम्ही पालिका सभागृहात गप्प का बसलात?:महापौर बंगल्याच्या नूतनीकरणावरून उद्धव ठाकरे नगरसेवकांवर संतापले

मुंबई महापालिकेच्या महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. मात्र, याच मुद्यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याच नगरसेवकांवर आगपाखड केली आहे. “जनतेच्या पैशांचा अपव्यय होत असताना तुम्ही सभागृहात गप्प कसे बसलात?” असा संतप्त जाब विचारत ठाकरेंनी नगरसेवकांची चांगलीच कानउघाडणी केल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईचे महापौर निवासस्थान…

Read More