विहीर खचल्याने वडिलांसह 2 मुले गाडली गेली:संभाजीनगरच्या धानोऱ्यातील मन सुन्न करणारी घटना; मोटार पंप बसवताना दुर्घटना
शेतातील विहिरीतून मोटारपंप बसवताना अचानक विहीर खचून झालेल्या दुर्घटनेत वडिलांसह 2 मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात घडली आहे. एका क्षणात कुटुंबातील 3 कर्ते पुरुष गेल्यामुळे पीडित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, सिल्लोडच्या धानोरा गावात शनिवारी रात्री ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. बाजीराव सर्जेराव काकडे, आजिनाथ बाजीराव काकडे…