Headlines

शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबावी, राजू शेट्टींची कृषी आयुक्तांना मागणी:खतांचा सुरळीत पुरवठा; आंबा बागायतदारांना नुकसानभरपाई देण्याची मागणी

आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खतांचा सुरळीत पुरवठा व्हावा आणि त्यांची आर्थिक लूट थांबावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी राज्याचे कृषी आयुक्त सुरज मांढरे यांची पुण्यात भेट घेतली. औषध कंपन्यांकडून आंबा बागायतदार शेतकऱ्यांची झालेली फसवणूक आणि त्यांना नुकसानभरपाई मिळावी, यावरही त्यांनी भर दिला. राज्यात सध्या शेतकरी अनेक संकटांचा सामना करत आहेत….

Read More

शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातच:उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची पुणे बाल पुस्तक जत्रेत घोषणा

पुण्यात शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पुणे बाल पुस्तक जत्रेच्या उद्घाटनप्रसंगी गुरुवारी त्यांनी ही माहिती दिली. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी हे संमेलन उपयुक्त ठरेल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. या संमेलनाबाबत कोणतीही शंका बाळगू नये, असे आवाहन पाटील यांनी केले. लहान मुलांना आणि…

Read More

पाषाण तलावातील प्रदूषण रोखण्यासाठी महापौरांचे निर्देश:तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्याचे प्रशासनाला आदेश

पुणे शहरातील महत्त्वपूर्ण जलस्रोत असलेल्या पाषाण तलावातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महापौर यांनी गुरुवारी तलाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासनाला तातडीने ठोस व परिणामकारक उपाययोजना राबविण्याचे कडक निर्देश दिले. या पाहणीदरम्यान तलावातील पाण्याची गुणवत्ता, वाढता दूषितपणा तसेच सीओडी (केमिकल ऑक्सिजन डिमांड) व बीओडी (बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड) यांच्या पातळीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तलावात येणाऱ्या…

Read More

पुण्यात बॅडमिंटन स्मारक आणि स्टेडियम उभारणार:महापौर मंजुषा नागपुरेंची घोषणा; पीडीएमबीएकडून खेळाडूंवर कौतुकाची थाप

पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन स्टेडियम आणि ‘दू पूना गेम मेमोरियल’ स्मारक उभारण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी ही घोषणा केली. बॅडमिंटन खेळाचा जन्म पुण्यात झाला हे जगाला दाखवण्यासाठी हे स्मारक उभारले जाईल, असे महापौर म्हणाल्या. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन पुण्यात करता यावे, यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले….

Read More

उन्हाळ्यात लहान मुलांना डिहायड्रेशनचा मोठा धोका:'सबक्लिनिकल' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; वैद्यकीय तज्ञांचा सल्ला

राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली असून, वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसत आहे. उन्हाळ्यात मुलांमध्ये ‘डिहायड्रेशन’ (निर्जलीकरण) ही एक सामान्य पण गंभीर आरोग्य समस्या म्हणून समोर येत आहे. अनेकदा पालक याकडे किरकोळ त्रास म्हणून दुर्लक्ष करतात, मात्र हे मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असा इशारा पुण्यातील वरिष्ठ नवजात शिशु तज्ञ आणि विभाग प्रमुख डॉ….

Read More

एसीबीच्या 73 सापळ्यात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना बेड्या:नागपूरमध्ये भ्रष्टाचारविरोधात 'झिरो टॉलरन्स'ची प्रभावी अंमलबजावणी

नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करत एसीबीने सन २०२५ आणि २०२६ या कालावधीत विविध विभागांमध्ये तब्बल ७३ सापळा कारवाया केल्या आहेत. या कारवाईत अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनाही जेरबंद करण्यात आले आहे. एसीबीने महसूल, पोलीस, ग्रामविकास, वन, शालेय शिक्षण, कृषी, ऊर्जा, सार्वजनिक आरोग्य, जिल्हा परिषद,…

Read More

बसस्थानकावर 'नाथजल' महाग विकल्यास परवाना रद्द:परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा विक्रेत्यांना इशारा, 40 रुपयांत चहा-नाश्ता देण्याची योजना

लोणावळा बसस्थानकावर प्रवाशांना ‘नाथजल’चे थंडगार पाणी केवळ १५ रुपयांनाच मिळाले पाहिजे. किंमत वाढवून विक्री करताना आढळल्यास संबंधित विक्रेत्याचा परवाना रद्द केला जाईल, असा इशारा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला. मंत्री सरनाईक यांनी गुरुवारी सकाळी पुणे विभागातील लोणावळा बसस्थानकास भेट देऊन प्रवासी सेवा-सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला असता,…

Read More

वृक्षारोपण अभियानामधून‎राहात्याचा होणार कायापालट‎:"साईयोग''च्या पुढाकारातून खटकळी येथे वृक्षारोपण‎

प्रतिनिधी | राहाता येथील डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणारे साईयोग फाउंडेशनद्वारे राहाता व परिसरात गेल्या १७ वर्षांपासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. पर्यावरण रक्षणार्थ गेल्या ९ वर्षांपासून वृक्षारोपण अभियान अंतर्गत हजारो वृक्षांची लागवड करून संवर्धनही केले आहे. नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांच्या हस्ते खटकळी परिसर येथे १२ फुटी वटवृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी…

Read More

विद्यार्थ्यांनी अपयशातून धडे‎ घेत ‎यशाकडे वाटचाल करावी‎:अमित रत्नपारखी यांचे प्रतिपादन, गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सन्मान‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर यश मिळवण्यासाठी सातत्य, कष्ट आणि सतत शिकण्याची वृत्ती अत्यंत महत्त्वाची आहे. अभियांत्रिकी शिक्षण हे केवळ पदवीपुरते मर्यादित न ठेवता, प्रत्यक्ष जीवनात त्याचा उपयोग करून नवकल्पना करण्यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांनी अपयशाला घाबरू नये त्यातून शिकून पुढे वाटचाल करावी, असे प्रतिपादन अमित रत्नपारखी यांनी केले. विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ…

Read More

शक्तीपीठ महामार्गाविरोधात रांजाळा शिवारात आंदोलन:जमाबंदी आदेशाचे उल्लंघन प्रकरणी औंढा नागनाथ पोलिसांत 22 जणांवर गुन्हा दाखल

औंढा नागनाथ तालुक्यातील रांजाळा शिवारात पत्रादेवी ते पवनार या सुमारे ८०० किलो मिटर अंतराच्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन करत जमाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात २२ जणांवर बुधवारी ता. २९ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लागू असलेल्या जमाबंदीचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पत्रादेवी ते पवनार हा…

Read More