42,680 जागांसाठी 11 वी प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून सुरू:पहिली यादी 14 मे रोजी, 19 पासून इनहाऊस कोटा, अल्पसंख्यकांनाही संधी
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता अकरावी प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यात एकूण ३३९ महाविद्यालयांमध्ये सुमारे ४२,६८० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. सोमवार, ११ मे पासून अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू होत आहे, ज्याला ‘टप्पा दोन’ असे नाव देण्यात आले आहे. या टप्प्यात विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या निवडीचा पसंतीक्रम नोंदवता येणार आहे. दहावीचा निकाल दोन दिवसांपूर्वी घोषित…