Headlines

टाकेद-वासळी रस्त्याचे काम ठप्प; विद्यार्थ्यांची गुडघाभर पाण्यातून वाट:तीन महिन्यांपासून खोदकाम जैसेथेच; आमदारांच्या सूचनांना केराची टोपली‎

टाकेद-वासळी रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण सुरू असले तरी तीन महिन्यांपूर्वी खोदकाम करून ठेवलेल्या रस्त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. पहिल्याच पावसात रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) मार्फत कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात…

Read More

15 महिन्यांनंतर महिला रुग्णालयाचे काम सुरू‎:राज्य शासनाकडून 174कोटी रुपयांच्या निधीला देण्यात आली मंजुरी‎

गेल्या १५ महिन्यांपासून निधीअभावी आणि सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या कचाट्यात अडकलेल्या ४०० बेडच्या भव्य महिला व बाल रुग्णालयाच्या बांधकामाला अखेर सुरुवात झाली आहे. सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम मार्चपासून रखडले होते. राज्य शासनाकडून १७४ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळताच रुग्णालयाच्या इमारतीचे काम सुरु करण्यात आले आहे, तर महिला रुग्णालयासाठी ३६० पदनिर्मितीलाही बुधवारी मंजुरी मिळाली…

Read More

पैठणला 40 हजार भाविकांनी घेतले दर्शन‎:संत एकनाथ महाराज मंदिरात अर्धा किमी रांगा असल्याने दर्शनासाठी 20 मिनिटे‎

आषाढी वारीला अवघा एक महिना बाकी असताना, त्यापूर्वी येणाऱ्या पवित्र निर्जला एकादशीच्या पावन पर्वावर पैठण येथील संतश्रेष्ठ एकनाथ महाराज मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गुरुवारी मोठी गर्दी केली होती. गुरुवार पहाटेपासूनच मराठवाड्याच्या विविध भागांतून आलेल्या जवळपास ४० हजार वारकरी आणि भक्तांनी नाथ महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. विठ्ठल-नामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दिवसभर भक्तिमय वातावरणाने…

Read More

भाजपमध्ये शीतयुद्ध, शिंदेंना‎ केंद्राचा पूर्ण पाठिंबा- पवार‎:फुटीर खासदारांना प्रत्येकी 60 ते 90 कोटी मिळाल्याचा दावा‎

ठाकरे गटाच्या फुटलेल्या खासदारांपैकी ‎‎प्रत्येकाला ६० कोटी रुपये देण्यात आले आहेत. ‎‎‎दरवर्षी २५० कोटींचा विकास ‎‎‎निधी देण्याचेही कबूल केले ‎‎‎आहे. हे सर्वजण केवळ ‎‎‎पैशासाठीच गेले आहेत. ‎‎‎उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‎‎‎यांना केंद्रीय भाजपचा‎‎पाठिंबा आहे. महाराष्ट्रातून ‎‎‎मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‎हे शिंदेंची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करत ‎‎आहेत. केंद्रातील भाजप आणि राज्यातील‎भाजप यांच्यात शीतयुद्ध आहे, असा आरोप‎आमदार रोहित पवार…

Read More

आता ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना लग्नकार्यासाठी एसटी स्वस्तात मिळणार:परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली विधान परिषदेमध्ये माहिती

ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना लग्नकार्यासारख्या शुभप्रसंगी खासगी वाहनांचा महागडा खर्च परवडत नाही. म्हणूनच अशा प्रसंगी अत्यंत माफक आणि सवलतीच्या दरात एसटी बस उपलब्ध करून देण्याची एक अभिनव योजना राबवण्याचा विचार शासन करत असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. सुनील शिंदे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेत डॉ. नीलम गोऱ्हे…

Read More

अमरावतीत शासकीय इमारत असतानाही आदिवासी अभ्यासिकेसाठी भाड्याने जागा:आमदार खोडके यांच्या लक्षवेधीनंतर गृहपाल निलंबित, भाडे वसुलीचे आदेश

अमरावती येथे आदिवासी विकास विभागाच्या अभ्यासिकेसाठी सुसज्ज शासकीय इमारत उपलब्ध असतानाही, राजकमल चौकातील एका खाजगी मॉलमध्ये दरमहा ८ लाख ६८३ रुपये भाड्याने जागा घेण्यात आली. २०२८ पर्यंतच्या या भाडेकरारामुळे गेल्या १४ महिन्यांत शासनाच्या तिजोरीतून १ कोटी १२ लाख रुपये भाड्यापोटी अदा करण्यात आले आहेत. आमदार सुलभाताई खोडके यांनी बुधवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे हा प्रकार उघड…

Read More

अनुकंपा नियुक्तांना जुनी पेन्शन लागू करा:जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेची ग्रामविकास विभागाकडे मागणी

केंद्र शासनाने अनुकंपा नियुक्तीच्या प्रकरणांमध्ये अर्ज सादर केल्याची तारीख निर्णायक मानून जुन्या पेन्शन योजनेचा (ओपीएस) लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातील अनुकंपाधारकांनाही न्याय मिळावा, अशी मागणी जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेने केली आहे. या मागणीसाठी संघटनेने राज्याच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या प्रधान सचिवांना निवेदन सादर केले आहे. भारत सरकारच्या निवृत्ती वेतन व…

Read More

देवस्थान इनाम समितीवर अमरावतीचे अनुप जयस्वाल यांची निवड:राज्यातील जमिनींबाबत अधिनियम तयार करण्यासाठी 13 सदस्यीय समिती स्थापन

राज्यातील देवस्थान इनाम जमिनींबाबत अधिनियम तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या १३ सदस्यीय समितीवर अमरावतीचे अनुप जयस्वाल यांची निवड झाली आहे. महसूल खात्याने ही घोषणा केली. या समितीत विदर्भातून नागपूरचे अनिल सांबरे यांचाही समावेश आहे. अनुप जयस्वाल हे मूळचे रिद्धपूर (ता. मोर्शी) येथील रहिवासी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते देवस्थानच्या बळकावलेल्या जमिनी मुक्त करून त्या संबंधित…

Read More

अमरावती जिल्ह्यात 6 मंडळांत अतिवृष्टी:अमरावती, दर्यापूर, अंजनगाव सुर्जीमध्ये जोरदार पाऊस, 4 घरांची अंशतः पडझड

अमरावती जिल्ह्यात बुधवारी मान्सूनने दमदार हजेरी लावली. जिल्ह्याच्या तीन तालुक्यांतील सहा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे चार घरांची अंशतः पडझड झाली, तर मोर्शी तालुक्यात वीज पडून तीन बकऱ्या दगावल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती निवारण विभागाने गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, अमरावती तालुक्यातील अमरावती महसूल मंडळात ९१.५ मिमी, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कोकर्डा महसूल मंडळात…

Read More

'नीट' पेपरफुटी: कन्हैया कुमार यांचा केंद्र सरकारवर निशाणा:शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, पंतप्रधानांवर टाळाटाळचा आरोप

‘नीट’ पेपरफुटी प्रकरणी काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पेपरफुटीमुळे आतापर्यंत २१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यांनी केला. कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला. “पंतप्रधानांची अशी कोणती फाईल धर्मेंद्र…

Read More