Headlines

अजिंठा घाटात ट्रक-कंटेनरची धडक; दोन तास वाहतूक ठप्प:दीड महिन्यातील अकरावा अपघात, लेणीकडे जाणारे पर्यटक खोळंबले‎

अजिंठा अजिंठा घाटात शनिवारी सकाळी ११.३० वाजता कार आणि कंटेनरची धडक झाल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली. संभाजीनगर येथील एक डॉक्टर कामानिमित्त कार (एम.एच २० एफ.वाय.९२३९) ने जळगावला जात असताना एक बंद पडलेला कंटेनर (एम.पी. ४१ जी.ए.०७२१) ला ओव्हरटेक करून य . शुक्रवारच्या अपघाताने ३ ला घाट मोकळा शुक्रवारी दुपारी ट्रक आणि बसच्या अपघातात अजिंठा…

Read More

राजूर येथील प्रस्तावित अपर तहसील कार्यालयाचा सुधारित अहवाल दाखल:4 महसूल मंडळ, 22 सज्जा, 63 गावे राहतील अपर तहसील अंतर्गत‎

‘अ’ दर्जा प्राप्त राजुरेश्वराला तालुक्याचा दर्जा मिळावा, यासाठी शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य नागरिक व तालुका कृती समितीकडून १३ वर्षांपासून संघर्ष केला जात आहे. शासनाने नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालय व अपर तहसील कार्यालय निर्मिती व विभाजनासाठी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीच्या निकषांप्रमाणे भोकरदन तालुका विभाजन होऊन राजूरला अपर तहसील कार्यालय होण्यासाठी…

Read More

काॅर्पोरेट जिहाद:निदाचा आश्रयदाता एमआयएमच्या मतीन पटेलच्या 3 मालमत्तांवर फिरणार बुलडोझर

नाशिकच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणात फरार निदा खानला एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलने स्वत:च्या नारेगाव येथील कौसर पार्क भागातील घरात आश्रय दिला होता. त्याने अतिक्रमण करून हे घर बांधले होते. याशिवाय त्याचे बिस्मिल्ला कॉलनीतील दुसरे घर, मुख्य रस्त्यावरील कार्यालयही अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याच्या या मालमत्तांना मनपाने कारणे दाखवा नोटीस चिटकवली आहे. तीन दिवसात समाधानकारक खुलासा…

Read More

निर्णायक पाऊल:“डिजिटल गुंडागर्दी’ रोखण्यासाठी राज्य सरकारचा नवा कायदा येणार, 3 महिन्यांत तयार होणार नव्या कायद्याचा मसुदा

सोशल मीडियावरील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अमर्याद गैरवापर आणि त्यातून जाणीवपूर्वक केले जाणारे डिजिटल चारित्र्यहनन रोखण्यासाठी राज्य सरकारने आता निर्णायक पाऊल उचलले आहे. फेसबुक, एक्स (ट्विटर) आणि व्हॉट्सॲप यांसारख्या व्यासपीठांवर पुराव्याशिवाय अफवा पसरवून कुणाचीही बदनामी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी नव्या कठोर कायद्याचा मसुदा तयार करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेचे गांभीर्य ओळखून राज्याचे पोलिस…

Read More

जलवाहिनी दुरुस्ती पूर्ण, अमरावतीकरांना आज दुपारनंतर पाणी:सिमेंटऐवजी लोखंडी पाईप बसवला, रात्रभर सेटिंग, सकाळी टेस्टिंग

अमरावती आणि बडनेरा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. डवरगाव एमआयडीसी गेटजवळ फुटलेला पाईप बदलण्यात आल्याने रविवार दुपारनंतर शहराला पाणी मिळणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) ने दिली आहे. सिमेंटच्या पाईपऐवजी लोखंडी पाईप बसवण्यात आला आहे. दुरुस्तीनंतर पाईपच्या सेटिंगसाठी रात्रभर वेळ देण्यात आला. रविवार सकाळपासून त्याची चाचणी (टेस्टिंग) घेतली जाईल. चाचणी…

Read More

भावेश भाटिया देणार उद्योगाचे धडे:नेत्रहीन उद्योजक अमरावतीत, उद्या सांस्कृतिक भवनात कार्यक्रम

नेत्रहीन उद्योजक भावेश भाटिया ११ मे रोजी अमरावतीकरांना उद्योग, व्यक्तित्व विकास आणि स्वप्नपूर्तीसाठी बहुमोल टिप्स देणार आहेत. शाश्वत कन्सेप्ट स्कूलतर्फे आयोजित हा कार्यक्रम श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक नाट्यगृहात सायंकाळी ६.३० वाजता सुरू होईल. प्रयास सेवांकुर संस्थेचे प्रमुख डॉ. अविनाश सावजी यांनी सांगितले की, भाटिया यांनी आपल्या आईच्या प्रेरणेने ‘तुम्ही जग पाहू शकत नसाल तर काय…

Read More

डॉ. अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान:नितीन गडकरी म्हणाले, जगाला वाचवण्यासाठी शाश्वत मूल्यांची गरज

पुणे: वाहन उद्योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ उद्योगपती आणि फोर्स मोटर्सचे चेअरमन डॉ. अभय फिरोदिया यांना २०२६ चा पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार बालगंधर्व रंगमंदिरात प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना गडकरी यांनी, विचार भिन्नता ही समस्या नसून विचारशून्यता ही खरी समस्या असल्याचे मत व्यक्त…

Read More

अकोल्यात 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार:पाच दिवसानंतर गुन्हा दाखल; आरोपी नात्यातील अल्पवयीन मुलगा

अकोला शहरात सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप पीडित मुलीच्या आईने प्रसारमाध्यमांसमोर करताच पोलिसांनी अखेर पाच दिवसांनी शनिवारी रात्री नऊच्या सुमारास संबंधित आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. अकोला शहरातील चिमुकलीवर तिच्याच जवळच्या नात्यातील १४ वर्षीय मुलाने घरात कुणी नसताना…

Read More

निदा खान प्रकरणी आश्रय देणाऱ्यांवर कारवाईची शिवसेनेची मागणी:नाशिक लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीला मदत केल्याचा आरोप

नाशिक येथील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतरण प्रकरणी मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने (शिंदे गट) पोलीस आयुक्तांकडे केली आहे. शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यासह नगरसेवकांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिले. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान सुमारे ४० दिवस फरार होती….

Read More

युवकांनी 'विकसित भारत 2047' चे शिल्पकार बनावे- केंद्रीय मंत्री सिंधिया:डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात 18,720 स्नातकांना पदवी

केंद्रीय दळणवळण आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी युवकांना ‘विकसित भारत २०४७’ चे शिल्पकार बनण्याचे आवाहन केले. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या (डीपीयू) १७ व्या पदवीप्रदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या सोहळ्यात ९ विद्याशाखांमधील एकूण १८,७२० स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. सिंधिया म्हणाले की, ‘विकसित भारत २०४७’ च्या…

Read More