पावसाळी अधिवेशनाचा चौथा दिवस:शेतकरी कर्जमाफी, कायदा-सुव्यवस्था आणि महत्त्वाच्या घोषणांवर आजही सभागृह तापण्याची शक्यता
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. कालचा तिसरा दिवस विधानसभा आणि विधान परिषदेत चांगलाच वादळी ठरला. वीजदरवाढ, धर्मांतर, कायदा-सुव्यवस्था आणि विविध जनहिताच्या प्रश्नांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली, तर सत्ताधाऱ्यांनी आकडेवारीसह प्रत्युत्तर देत सरकारची भूमिका स्पष्ट केली. वीजदरांवर मुख्यमंत्र्यांची मोठी ग्वाही विरोधकांच्या वीजदरासंदर्भातील प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र…