Headlines

शुभेंदू अधिकारींच्या शपथविधीवेळी मोदी-शिंदे यांची 'केमिस्ट्री':देवेंद्र फडणवीस म्हणाले – भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंगाल महत्त्वाचे राज्य

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होऊन सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या ऐतिहासिक सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष उपस्थिती लावली. या सोहळ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यातील ‘केमिस्ट्री’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, राजकीय वर्तुळात या भेटीची जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

कुठे पाऊस, कुठे उकाडा!:विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचे सावट, पश्चिम महाराष्ट्र-मराठवाड्यात 'यलो अलर्ट, यवतमाळ- गडचिरोलीत मुसळधार पावसाचे संकेत

महाराष्ट्रात सध्या हवामानाचे विचित्र स्वरूप पाहायला मिळत असून, राज्याचा एक भाग पावसाने ओलाचिंब होत असताना दुसरा भाग मात्र उष्णतेने होरपळून निघत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, विदर्भातील यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी आज पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वादळी वारे वाहण्यासह विजांच्या कडकडाटात…

Read More

'विवेकयात्री' ग्रंथाचे प्रकाशन:डॉ. गणेश देवी यांनी विवेकवादाची मशाल तेवत ठेवण्याचे केले आवाहन

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी विवेकवादाची मशाल तेवत ठेवण्याचे आवाहन केले. राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘विवेकयात्री’ या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. विवेकवादाची शिळा शिखरावर नेणाऱ्या विवेकवादी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत, नव्या उमेदीने काम करत राहण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. प्रसिद्ध लेखक डॉ. अभिजित वैद्य यांनी लिहिलेल्या या ग्रंथाचे प्रकाशन राज्य मराठी विश्वकोश…

Read More

संग्रामबापूंनी केलेली शाईफेक अगदी योग्यच:ही शाईफेक नसून दुखावलेल्या भावनांचा उद्रेक, धर्माविरोधात बोलायला यांना कोण प्रवृत्त करते?-संग्राम जगताप

ज्या लोकांनी धर्मांकरता पूर्ण जीवन समर्पित केले. भगव्या ध्वजा करता ज्यांनी स्वत:चे जीवन समर्पित केले आहे त्याच्यावर कुठेच नसणाऱ्या पक्षाचे लोकं उठतात आणि टीका करतात, आणि घुसखोर ‘हभप’ म्हणत एक यादी वाचून दाखवतात यामुळे हभप संग्रामबापू भंडारे यांनी त्यांच्यावर जी शाईफेक केली ती अगदी योग्य आहे, आम्ही त्यांचे समर्थन करतो, त्यांनी योग्य भूमिका घेतली आहे,…

Read More

खेडमध्ये वारस नोंदीसाठी महिला तलाठी, कोतवाल लाच घेताना जेरबंद:5,500 रुपयांची लाच घेताना एसीबीची कारवाई

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात वारसनोंदीसाठी 5,500 रुपयांची लाच घेताना एका महिला तलाठी आणि कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. निमगाव खंडोबा येथील तलाठी मनीषा साहेबराव माने (वय 45) आणि कोतवाल दत्तात्रय छबू चव्हाण (वय 58) अशी अटक करण्यात आलेल्या लोकसेवकांची नावे आहेत. याप्रकरणी एका 34 वर्षीय…

Read More

महायुती सरकार बिल्डर धार्जिणे:मीरा भाईंदरमधील ६००० कोटींची २५४ एकर जमीन बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव – वडेट्टीवार

मीरा भाईंदर येथील मौजे भाईंदर येथील सुमारे २५४.८८ एकर शासकीय जमिनीच्या मालकी हक्काबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि त्यावर राज्य सरकारने घेतलेली भूमिका, ही जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारी आहे. मूळची सरकारी असलेली कोट्यवधी रुपयांची जमीन खासगी विकासकांच्या घशात घालण्यासाठी प्रशासकीय स्तरावर जाणीवपूर्वक दिरंगाई केली असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथे…

Read More

विकास गोगावलेंचा शिवसैनिकांना थेट दम:श्रीवर्धन, म्हसळा आणि दिवेआगारनंतर महाडमध्ये राष्ट्रवादीला धक्का, गद्दारांविरोधात एल्गार

रायगड जिल्ह्यात शिवसेना अधिक आक्रमक होताना दिसत आहे. बिरवाडी येथील सभेत शिवसेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांनी संघटनेशी बेईमानी करणाऱ्यांना थेट इशारा दिला. गद्दारी करायची असेल तर तुमचा मार्ग मोकळा आहे, असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी शिवसैनिकांचे कान टोचले. याचवेळी महाड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का देत खरवली-काळीज ग्रामपंचायतीवरील सत्ता शिवसेनेकडे आल्याने रायगडच्या राजकारणात…

Read More

अकोट पालिकेत कचऱ्याचे राजकारण; सत्ताधारी अन् विरोधकांमध्येच जुंपली:कचरा उचलण्यावरून नगरसेविकेचा संताप; विरोधक म्हणतात स्टंट‎

शहरातील प्रभाग क्र १ च्या नगर सेविका रेशमा परवीन अजीम इनामदार यांनी प्रभागात नाले सफाई आणि कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने स्वतः हातात घमेले आणि फावडे घेऊन वॉर्डात साफसफाई करावी लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घंटागाडी प्रभागात येत न . ७ मे रोजी सोशल मीडियावर प्रभाग क्र १ च्या नगर सेविका यांना स्वतः…

Read More

आत्मविश्वास:सोशल मीडियाला ‘नो'', पण युट्युबचा केला ‘स्मार्ट'' वापर‎, अंजनगावच्या रिद्धीने गाठलं दहावीच्या परीक्षेत 100 टक्क्यांचे शिखर

“मी कधीही रात्र रात्रभर जागून किंवा पहाटे उठून तासनतास अभ्यासही केला नाही. मात्र, जेव्हा अभ्यास करायची, तेव्हा फक्त आणि फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायची. तसेच आज इतक्यावेळात इतका अभ्यास पुर्ण करायचाच, असे स्वतःलाच चॅलेंज द्यायची आणि ते पूर्णही करायची. विशेष म्हणजे, अभ्यासासाठी आई-वडिलांनी कधीही ताण दिला नाही. इतकेच टक्के गुण मिळव, असेही त्यांनी कधी सांगितले…

Read More

यंदा मुलींचीच सरशी; निकालात 2.80 टक्क्यांची घट:जिल्हा विभागात तिसरा, बहुतेक शाळांनी राखली उत्कृष्ट निकालाची परंपरा‎

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी ८ रोजी घोषित करण्यात आला. या निकालात पुन्हा मुलांच्या तुलनेत मुलींनीच सरस कामगिरी केल्याचे दिसून आले. अंजनगाव सुर्जी येथील रायसाहेब मोती संगई इंग्लिश स्कूलच्या रिद्धी शर्माने १०० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे होलिक्रॉस हायस्कूलच्या…

Read More