Headlines

यंदा मुलींचीच सरशी; निकालात 2.80 टक्क्यांची घट:जिल्हा विभागात तिसरा, बहुतेक शाळांनी राखली उत्कृष्ट निकालाची परंपरा‎

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी ८ रोजी घोषित करण्यात आला. या निकालात पुन्हा मुलांच्या तुलनेत मुलींनीच सरस कामगिरी केल्याचे दिसून आले. अंजनगाव सुर्जी येथील रायसाहेब मोती संगई इंग्लिश स्कूलच्या रिद्धी शर्माने १०० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे होलिक्रॉस हायस्कूलच्या…

Read More

खा.लंके पुणे येथील रुग्णालयात दाखल:अन्नातून विषबाधा ‎झाल्याचा संशय‎

निर्जलीकरण आणि अन्नातून विषबाधा झाल्यामुळे खासदार नीलेश लंके यांना पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत असतानाही लंके यांनी कामाचा धडाका सुरूच ठेवला होता, मात्र थकवा वाढल्याने त्यांना उपचार घ्यावे लागले. तमिळनाडूतील जिंजी किल्ला मोहिमेनंतर कोल्हापूर येथे एका विवाह सोहळ्यासाठी गेलेल्या खा. लंके यांना…

Read More

"राजकमल उड्डाणपुलाचा खोळंबा; संथ कामावरून काँग्रेस आक्रमक:शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचा ठपका‎

रेल्वे स्टेशन ते राजकमल चौक उड्डाणपुल बंद असल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील ट्रॅफिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, अनेक ठिकाणी अपघात होत आहेत. मात्र जनप्रतिनिधी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे एकूणच चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ८ रोजी अमरावती शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम…

Read More

महिला संघटनांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल बहिणींना सहकार्य करावे- ज्योती राठी:विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी महिला संगठनचा पदग्रहण साेहळा उत्साहात साजरा‎

सामाजिक संस्था समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करतात. महिला संघटनांचे योगदान मोठे आहे. विशेषत: आर्थिकदृष्ट्या कमकुवत बहिणींना महिला संघटनांनी सहकार्य करून, समाजातील एका वर्गाला प्रगतीकडे घेऊन जावे, असे मार्गदर्शन अखिल भारतीय माहेश्वरी महिला संगठनच्या अध्यक्षा ज्योती राठी यांनी केले. विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी महिला संगठनच्या एकादश सत्राचा शानदार शुभारंभ नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दशम सत्राची समाप्ती आणि…

Read More

उशीरा जाग:मोहोळ येथे महामार्गावर ट्रक पलटी, वाहतूक ठप्प‎, मोहोळमध्ये महामार्ग प्राधिकरणाचा गलथान कारभार

प्रतिनिधी | मोहोळ मोहोळ-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बडीशेपची वाहतूक करणारा ट्रक (क्र. टीएन ८८ ए ९३५८) शुक्रवारी (दि. ८ मे) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बॅरिकेट्सवरून पलटी झाला. या अपघातामुळे मोहोळ सर्विस रोडवर एसटी बससह मालवाहतूक गाड्यांची मोठी कोंडी झाली होती. मात्र, एनएचएआय कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने न पाहिल्याने हा ट्रक दिवसभर रस्त्यावरच पडून होता. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी…

Read More

विचार बदला, तरच वर्तन बदलेल- आदर्शऋषीजी महाराज:700 चिमुकल्यांनी गिरवले संस्कारांचे धडे, धर्म आणि विज्ञानाची अनोखी सांगड‎

मुलांनी केवळ ज्ञानी होण्यापेक्षा, प्राप्त केलेले ज्ञान आचरणात आणणे अधिक महत्त्वाचे आहे. जेव्हा तुमचे विचार बदलतात, तेव्हा तुमचे वर्तन आपोआप सकारात्मक होते, असे प्रतिपादन पूज्य आदर्श ऋषीजी महाराज यांनी केले. श्री तिलोक रत्न धार्मिक परीक्षा बोर्डाच्या वतीने आयोजित ‘आनंद बालसंस्कार शिबिरा’च्या सांगता प्रसंगी ते बोलत होते. १ ते ६ मे दरम्यान रंगलेल्या या शिबिरात नगरसह…

Read More

विकासाचा खरा जीडीपी हा कृषी, गावांमध्येच:कृषी विकास संस्थेचे अमितकुमार नाफडे यांचे मत‎

कोविड काळात बळीराजाने जगाला तारले. आपल्या विकासाचा खरा जीडीपी हा कृषी आणि गावांमध्येच आहे. म्हणूनच ग्रामीण भारत थांबला तर देश थांबेल. म्हणून शहरांप्रमाणेच गावांच्या विकासाकडेही लक्ष देण्याची गरज आहे. पाण्याचे दुर्भिक्ष, स्थलांतर आणि त्यामुळे निर्माण होणारी मजूरटंचाई या समस्यांनी ग्रामीण भारत होरपळत आहे. त्यातुन बळीराजाला बाहेर काढण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची गरज आहे. असे मत बुलढाणा…

Read More

संबळाच्या ठेक्यात देवी-म्हसोबाची सोंगे काढून आखाडी उत्सवाची सांगता:चांदवडच्या आखाडी उत्सवात घडले लोकसंस्कृतीचे जिवंत दर्शन

येथील गाडगेबाबा चौक (बहादूरपुरा) येथे श्री संत गाडगेबाबा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित आखाडी (देवी उत्सव) उत्सवात उत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेली देवीमाता व म्हसोबा महाराज ही मानाची सोंगे काढून शुक्रवारी (दि. ८) पहाटे आखाडी उत्सवाची उत्साहात सांगता झाली . ऐतिहासीक ओळख असलेल्या चांदवड शहराने धार्मिक उत्सवांची परंपरा कायम ठेवत लोकसंस्कृती जोपासली आहे. शहरातील गाडगेबाबा चौक येथे…

Read More

मावेजा घोटाळा:154 पैकी 6 फाइल्स गहाळ; पाठक यांना 7 दिवसांची कोठडी, अधिकारांचा गैरवापर केल्याने पाठक यांना 50 हजार दंड

241 कोटींचा मावेजा घोटाळ्यात विशेष पथकाने अटक केलेले बीडचे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना शुक्रवारी बीड न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. बचाव पक्षाने त्याला विरोध केला. न्यायालयाने 15 मे पर्यंत 7 दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली. दरम्यान, या प्रकरणातील 154 पैकी 6 फाइल्स मिसिंग असल्याचे पोलिसांनी न्यायालयात वेगळी आहेत. हे…

Read More

भाेंदूगिरीचा कॅप्टन:खरात साक्षीदारांवर संतापला; म्हणाला, ‘तुमच्यामुळे अडचण’

शिर्डी येथील गाजत असलेल्या जमीन खरेदी-विक्री व्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरातची पोलिसांनी सलग पाच दिवसांपासून कसून चौकशी केली आहे. तपास यंत्रणांनी या व्यवहारातील आर्थिक व्यवहार आणि दस्तऐवजांची बारकाईने छाननी केली आहे. तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी जमीन व्यवहाराशी संबंधित साक्षीदार, मूळ जमीन मालक आणि अशोक खरात यांची समोरासमोर बसवून चौकशी केली. तेव्हा भोंदू खरात या…

Read More