Headlines

राज्यामध्ये सध्या कोणतीही वीजटंचाई नसल्याचा केला दावा:वर्षअखेर 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार- मुख्यमंत्री

“राज्यात सध्या कोणतीही वीजटंचाई नाही. कृषी पंपांना नियमानुसार दिवसा आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. आजमितीला राज्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे. उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांनाही या वर्षअखेरीस दिवसा वीजपुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा राज्य शासनाचा प्रामाणिक प्रयत्न आहे,” अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. विधान परिषदेत…

Read More

सिगारेट न दिल्याने वृद्धाचा खून:अमरावतीत एकाला अटक, दोन आरोपी फरार

सिगारेट न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ६५ वर्षीय वृद्धाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही घटना बुधवार, २४ जून रोजी सकाळी राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी-गोपालनगर मार्गावरील सूतगिरणीजवळ उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी काही तासांतच एका आरोपीला अटक केली असून, दोन आरोपी अद्याप फरार आहेत. मृत व्यक्तीचे नाव माणिकराव बळीरामजी बोरकर (६५, रा. गोदावरी कॉलनी,…

Read More

अकरावी तिसऱ्या फेरी प्रवेशाचा आज शेवटचा दिवस:जिल्ह्यात 31,367 जागा अजूनही रिक्त

अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी आज, २५ जून हा शेवटचा दिवस आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येणार आहे. जिल्ह्यात अद्यापही ३१,३६७ जागा रिक्त असून, एकूण ४३,११० प्रवेश क्षमतेपैकी २० जूनपर्यंत केवळ ११,७४३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. तिसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांनी २० जूनपर्यंत ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी…

Read More

पु. ल. स्मृती महोत्सवाला पुण्यात सुरुवात:पंडित सुरेश तळवलकर म्हणाले, पुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा

पुण्यात ‘आशय सांस्कृतिक’ आणि ‘पु. ल. परिवार’ यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय पु. ल. स्मृती महोत्सवाला बुधवार, २४ मे रोजी सुरुवात झाली. या महोत्सवाचे उद्‌घाटन तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना पंडित तळवलकर यांनी पु. ल. देशपांडे यांना ‘अतिशय आनंददायी ऊर्जा’ असे संबोधले आणि कला क्षेत्रातील त्यांचे योगदान युवा पिढीला समजणे महत्त्वाचे…

Read More

विज्युक्टा’चे शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन:मोफत शिक्षण संपवण्याच्या धोरणाविरोधात शिक्षकांचा आक्रमक पवित्रा

विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन (विज्युक्टा) ने बुधवारी अमरावती येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. शासनाच्या मोफत शिक्षण संपवण्याच्या आणि शिक्षकांची संख्या घटवण्याच्या धोरणाविरोधात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी दुपारपर्यंत कार्यालयाला घेराव घातला, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिक्षकांच्या मते, शासनाने सामान्यांचे मोफत शिक्षण संपुष्टात आणण्याचा डाव आखला आहे. याचाच एक भाग…

Read More

गोळीबार, हल्ला प्रकरणात दहा आरोपी अटकेत:दोन देशी कट्टे, काडतुसे, तलवारी, फरशे जप्त

असोरिया पेट्रोल पंपासमोर जुन्या वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करून गोळीबार केल्याप्रकरणी आतापर्यंत दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एका विधिसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. नागपुरी गेट पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात दोन देशी कट्टे, दोन काडतुसे, चार तलवारी आणि तीन फरशे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे….

Read More

1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन:नागपूर खंडपीठाचा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाजूने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. या निर्णयामुळे दीर्घकाळापासून जुन्या पेन्शनसाठी लढा देणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायमूर्ती अनिल पानसरे आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास…

Read More

हिंगोली पालिकेत राष्ट्रवादीला झटका:तिसरे अपत्य असल्यामुळे नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

तिसरे अपत्य असल्याच्या कारणावरून हिंगोली नगर परिषदेच्या राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नगरसेविका रुबीना मोहम्मद वाजीद यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सदस्य पदासाठी अपात्र घोषित केले आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बुधवारी ता २४ रोजी निर्णय दिला असून, यामुळे रुबीना वाजीद यांचे नगर परिषदेतील सदस्य पद तात्काळ प्रभावाने रिक्त झाले आहे. हिंगोली येथील प्रभाग क्र. १३ मधील रहिवासी सय्यद…

Read More

हॉटेल्समध्ये ग्राहकांना मोफत शुद्ध पाणी देणे बंधनकारक:नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही- तुकाराम मुंढे

राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित अन्न मिळावे, या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सध्या ‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व अन्न व्यावसायिकांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, धाबे, खानावळी आणि ज्या-ज्या ठिकाणी अन्नप्रक्रिया केली…

Read More

बालगंधर्व रंगमंदिर सांस्कृतिक राजधानीचे वैभव: उल्हास पवार:58 व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व महोत्सवाचे आयोजन, मान्यवरांचा गौरव

बालगंधर्व रंगमंदिर हे पुणे शहराचे सांस्कृतिक वैभव आहे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेले हे रंगमंदिर आता केवळ शहराचे किंवा महाराष्ट्राचे नव्हे, तर भारताच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाचे स्थान आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार यांनी काढले. बालगंधर्व परिवार ट्रस्ट आणि पुणे महापालिकेच्या वतीने, अलविरा मोशन एंटरटेन्मेंट प्रस्तुत, बालगंधर्व रंगमंदिराच्या ५८ व्या…

Read More