Headlines

मोरगाव, थेऊर, सिद्धटेक मंदिरे महिनाभरासाठी बंद:10 मे ते 9 जून 2026 या कालावधीत होणार काम

अष्टविनायक विकास आराखड्यांतर्गत आणि पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिरांच्या जतन व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी महाराष्ट्र शासनाने भरीव निधी उपलब्ध करून दिला असून कामाचा वेग आणि भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता श्रीक्षेत्र मोरगाव, श्रीक्षेत्र थेऊर आणि श्रीक्षेत्र सिद्धटेक ही तीन मंदिरे १० मे २०२६ ते ९ जून २०२६ या कालावधीत भाविकांसाठी दर्शनासाठी पूर्णपणे…

Read More

भूमिपुत्रांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय:जिल्हा सहकारी बँकांमधील 70 टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव; शासन निर्णय जारी

राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील (DCCB) नोकरभरतीबाबत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यापुढे जिल्हा बँकांमधील रिक्त पदांच्या भरतीमध्ये ७० टक्के जागा संबंधित जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. सहकार विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील शासन निर्णय (GR) प्रसिद्ध केला असून, यामुळे ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांना त्यांच्याच जिल्ह्यात…

Read More

'मिशन कर्मयोगी'मध्ये हिंगोली जिल्हा परिषदेचा डंका:हिंगोलीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा मुंबईत 'टेक वारी' कार्यक्रमात गौरव

केंद्र सरकारच्या मिशन कर्मयोगी उपक्रमांतर्गत साधना सप्ताहामध्ये हिंगोली जिल्हा परिषदे अंतर्गत ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी विविध प्रशिक्षणे पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. यासप्ताहातील उत्कृष्ठ कामगिरी बद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचा शुक्रवारी ता. ८ मुंबई येथे टेक वारी या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. या पुरस्कारामुळे हिंगोली जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा…

Read More

डी.वाय. पाटील विद्यापीठ, डसॉल्ट सिस्टिम्समध्ये सामंजस्य करार:पुण्यात अत्याधुनिक 'डिजिटल इंजिनिअरिंग अनुभव केंद्र' उभारणार

पुण्यातील आकुर्डी येथील डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘डसॉल्ट सिस्टिम्स’ यांच्यात एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार विद्यापीठ कॅम्पसमध्ये अत्याधुनिक ‘डिजिटल इंजिनिअरिंग आणि डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग अनुभव केंद्र’ स्थापन केले जाणार आहे. उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील दरी कमी करून विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश…

Read More

Chandrakant Kaire Demand to Ban MIM Party Over Nida Khan Case

नाशिकच्या बहुचर्चित धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमध्ये अटक करण्यात आल्यानंतर जिल्ह्यासह राज्याचे राजकारण तापले आहे. निदा खानला लपवण्यामागे एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप राज्याचे मंत्री संजय शि . नाशिकमधील टीसीएस कंपनीतील धर्मांतरण प्रकरणात आरोपी असलेली निदा खान ही गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होती. नाशिक जिल्हा सत्र…

Read More

महालक्ष्मी सरस 2026 ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:71 लाख महिलांचा सहभाग, सात दिवसांत 15 कोटींची उलाढाल

२ मे २०२६ पासून सुरू झालेल्या महालक्ष्मी सरस २०२६ प्रदर्शनाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, अवघ्या सात दिवसांत प्रदर्शनातून सुमारे १५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे सीओओ निलेश सागर आणि सीईओ निखिल ओसवाल यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. सीओओ निलेश सागर यांनी सांगितले की, महिलांना व्यवसायासाठी आवश्यक भांडवल कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट…

Read More

एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे, संकल्प सप्ताहाची सांगता:राज्य थॅलेसेमियामुक्त करूया – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे, अभियानाच्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यभर १ ते ८ मेदरम्यान “संकल्प सप्ताह” उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त आयएमए हॉल, समर्थनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी महाराष्ट्र थॅलेसेमियामुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला. जनजागृती, समाजाचा सहभाग आणि आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून हा लढा सातत्याने सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान…

Read More

समाजकल्याण खात्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी काम करा:मंत्री संजय शिरसाट यांचे अधिकाऱ्यांना आवाहन

सामाजिक न्याय विभागाने समाजकल्याण खात्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी काम करावे, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केले. ‘सामाजिक न्याय’ संकल्पना डोळ्यासमोर ठेवून समाजातील शेवटच्या घटकांना न्याय देण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्यावतीने लोणावळा येथे आयोजित सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी…

Read More

गॅस टँकरच्या धडकेत दाम्पत्याचा जागीच मृत्यू:खेड शिवापूर टोलजवळ अपघात, संतप्त नागरिकांकडून टँकरची तोडफोड

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्याजवळ शुक्रवारी दुपारी झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. एका गॅस टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वारजे माळवाडी येथील राजेंद्र बबन मोरे (वय ५५) आणि सविता राजेंद्र मोरे (वय ४२) हे दाम्पत्य त्यांच्या…

Read More

कॉर्पोरेट जिहाद प्रकरण:आरोपी निदा खानला 11 मे पर्यंत पोलिस कोठडी; 'मलेशिया कनेक्शन' आणि 'मनीट्रेल'चा तपास सुरू

नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असताना, यातील मुख्य आरोपी निदा खान हिच्या अटकेनंतर अनेक खळबळजनक खुलासे झाले आहेत. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने २ मे रोजी तिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर ती फरार होती. अखेर गुरुवारी रात्री छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातून तिला ताब्यात घेण्यात आले. आज तिला नाशिक न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिची…

Read More