Headlines

अमरावतीत मुख्य जलवाहिनी फुटली, दोन दिवस पाणीपुरवठा बंद:कंत्राटदारांच्या संपामुळे दुरुस्तीत अडचण, मजीप्रासमोर आव्हान

अमरावती आणि बडनेरा शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी मोर्शी तालुक्यातील डवरगाव एमआयडीसी गेटजवळ फुटली आहे. यामुळे गुरुवार सायंकाळपासून दोन्ही शहरांचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. कंत्राटदारांच्या संपामुळे दुरुस्ती कार्यात अडचणी येत असल्याने पुढील दोन दिवस, म्हणजेच शुक्रवार आणि शनिवार, पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मोर्शी येथील सिंभोरा अप्पर…

Read More

सुसंस्कार शिबीर ही आजच्या काळाची खरी गरज:सुसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. रघुनाथ वाडेकर यांचे प्रतिपादन

आजच्या वेगवान आणि तंत्रज्ञानप्रधान युगात मुलांमध्ये असंवेदनशीलता वाढीस लागली असून मोबाईलचे व्यसन आणि नैतिक मूल्यांचा होत असलेला ऱ्हास ही गंभीर चिंतेची बाब बनली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यात चांगले संस्कार, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेल्या ग्रामगीता तत्वज्ञान प्रणालीनुसार सुसंस्कार शिबिरांची गरज असल्याचे प्रतिपादन वाडेकर नॅशनल स्कूल चे संचालक डॉ….

Read More

ट्रम्प यांनी मोदींना शुभेच्छा दिल्याचे वृत्त खोटे:संजय राऊत यांचा दावा; म्हणाले – तामिळनाडूत 1 जागा आलेल्या भाजपला सत्ता स्थापन करू द्या

भारतामध्ये लोकशाहीच्या नावाने काय सुरू आहे हे संपूर्ण जगाला माहिती आहे. भाजपने विधानसभा निवडणूक जिंकल्याने त्यांना शुभेच्छा दिल्या हे वृत्त खोटे आहे नाहीतर ट्रम्प यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे शुभेच्छा दिल्या. उद्या ग्रामपंचायत निवडणूक जिंकले तर ट्रम्प मोदींना शुभेच्छा देतील का? हे भाजपच्या आयटी सेलला समजले पाहिजे. ट्रम्प यांना खरी माहिती देणं माझे कर्तव्य आहे. ट्रम्प…

Read More

पाणीटंचाई,‘पाथरी’ योजना पूर्ववतची मागणी:बार्शीत विरोधी पक्षनेते आक्रमक, नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन‎

ऐन उन्हाळ्यात बार्शीकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे शहर तहानेले राहिले आहे. शहरात ७ ते ८ दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप आहे. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन पाणीपुरवठा तातडीने सुधारण्याची मागणी केली आहे. यावेळी विरोधी गटाचे अनेक नगरसेवक व पदाधिकारी…

Read More

गौरव:कंबोडियात सोहम बुरकुलच्या "ब्रेक एक्स’ प्रकल्पाला सुवर्णपदक, 15 देशांच्या स्पर्धेत भारताचा डंका

संतांची भूमी असलेल्या मंगळवेढ्याच्या सुपुत्राने आता विज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली आहे. कंबोडिया येथे पार पडलेल्या “इंटरनॅशनल क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन अवॉर्ड’ या प्रतिष्ठेच्या बाल वैज्ञानिक स्पर्धेत मूळचा मंगळवेढ्याचा असलेल्या सोहम सतीश बुरकुल याने सुवर्णपदक पटकावले आहे. १५ देशांतील स्पर्धकांना मागे टाकत सोहमने मिळवलेल्या या देदीप्यमान यशामुळे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण देशाचे नाव जागतिक नकाशावर…

Read More

अंजनगाव बारीत घरांचे नुकसान; वीज वाहिन्या तुटून पुरवठा खंडीत:अचानक बदललेल्या वातावरणामुळे उभ्या कांदा पिकांचे मोठे नुकसान

अंजनगाव बारी परिसरात दुपारी २ वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात काळे ढग दाटून आले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस व गारपीट झाली. अचानक झालेल्या या अवकाळी बदलामुळे परिसरातील शेतकऱ्यांची धावपळ उडाली. विशेषतः शेतात उभ्या असलेल्या कांदा पिकांना मोठा फटका बसला असून गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी…

Read More

काम पूर्ण होण्यापूर्वी कंत्राटदारांना बिल दिल्यास कारवाईचा इशारा:लोहाऱ्यात जलजीवन योजनेच्या बिलांवर अध्यक्षा अर्चना पाटील यांचा इशारा‎

जलजीवन योजनेचे काम पूर्ण होण्यापूर्वी कंत्राटदाराला बिल अदा केले तर मी संबंधितांवर कारवाई करेन, अशी ताकीद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिली. लोहारा येथे आयोजित आढावा बैठकीत त्यांनी विविध विभागांचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. ७) आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पाणीपुरवठा योजना, घरकुल,…

Read More

रासायनिक खतांच्या महागाईने शेतकरी पोळला:शेणखताच्या किंमतीमध्ये वाढ, खतांच्या किमतीत 500 रुपयांची वाढ, बळीराजा पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळला‎

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता मोहोळच्या शिवारापर्यंत उमटू लागले आहेत. इंधन दरवाढीपाठोपाठ रासायनिक खतांचा तुटवडा आणि गगनला भिडलेल्या किमतींमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या महागाईने जगाच्या पोशिंद्याला जेर . जागतिक युद्धाच्या सावटाने कच्च्या मालाचा पुरवठा खंडित झाला आहे. युरिया, १०:२६ आणि १८:४६ सारख्या प्रमुख खतांच्या किमतीत पोत्यामागे ४०० ते ५००…

Read More

भारत अन् बांगलादेशाला जोडणारा सांस्कृतिक धागा धर्मापेक्षाही बळकट:बांगलादेशातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राह नवकुमार यांचे मत‎

भारत आणि बांगलादेश हे दोन स्वतंत्र देश असले तरी हजारो वर्षांपासूनची भारतीय संस्कृती हा दोन्ही देशांना जोडणारा सर्वात मोठा दुवा आहे. हा धागा धर्मापेक्षाही जास्त बळकट आहे. मात्र, सध्या दोन्ही देशात धर्मावर आधारित द्वेष आणि हिंसा वाढू लागल्याने उपखंडातील संस्कृतीचे विघटन होत आहे, असे परखड मत बांगलादेशातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राह नवकुमार यांनी व्यक्त केले….

Read More

कशाला कोकण, गोवा? ‘प्री-वेडिंग शूट’साठी नगरचा तोरा नवा:जिल्ह्यातील मंदिरे व ऐतिहासिक ठिकाणांना पसंती; स्थानिक पर्यटनाला लाभले ‘ग्लॅमर’‎

लग्न म्हटलं की केवळ अक्षता आणि मंगलाष्टके उरली नसून, त्यापूर्वीचा ‘प्री-वेडिंग शूट’ हा सोहळा आता तरुण जोडप्यांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनला आहे. एकेकाळी यासाठी कोकण, गोवा, महाबळेश्वरची वाट धरणारी पावले आता स्वतःच्या अहिल्यानगर जिल्ह्याकडेच वळू ला . सध्या लग्नसराईचा हंगाम जोमात असून ऐतिहासिक चांदबीबी महाल येथे दररोज ४ ते ५ जोडपी प्री-वेडिंग शूटसाठी हजेरी लावत…

Read More