Headlines

जंक फूडच्या काळात नगरच्या महिलांनी दाखवली कल्पकता:‘जय आनंद महावीर’तर्फे आयोजन, प्राची थिगळे यांच्या ‘ज्वारीच्या पौष्टिक धिरड्याला’ प्रथम क्रमांक‎

प्रत्येक महिलेमध्ये उपजतच पाककलेचे गुण असतात. कुटुंबाला सकस, ताजे आणि पौष्टिक अन्न देण्यासाठी त्या स्वयंपाकघरात अतिशय आपुलकीने राबत असतात. सध्याच्या जंक फूडच्या काळात मुलांना शुद्ध शाकाहारी पौष्टिक टिफीन देण्यासाठी महिला मोठी कल्पकता दाखवत आहेत. त्या . नवी पेठ येथील ‘जय आनंद महावीर युवक मंडळा’च्या वतीने महिलांसाठी आयोजित ऑनलाईन पौष्टिक शाकाहारी टिफीन स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी त्या…

Read More

शेतकरी हिताच्या मागण्या मान्य न झाल्यास गुरेढोरे:बकऱ्या घेऊन मंत्रालयात घुसणार, खा.नीलेश लंके यांचा सरकारला इशारा,पावसातही आंदोलक ठाण मांडून‎

सरसकट कृषी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आणि अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ नुकसानभरपाईसह सर्व प्रलंबित मागण्या सरकारने मान्य कराव्यात. अन्यथा, आगामी काळात गुरे, ढोरे आणि बकऱ्यांसह थेट मंत्रालयात घुसणार, असा इशारा खासदार नीलेश लंके यांनी दिला आहे. आज आम्ही . शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उबाठा), काँग्रेस, भूमिपुत्र शेतकरी संघटना, मनसे, शिवबा संघटना, संभाजी ब्रिगेड…

Read More

9 वर्षांपासून रखडला पालखी मार्ग; 24 मीटरवरून आला 18 मीटरवर:पैठण ते पंढरपूर मार्गाची दयनीय अवस्था; वारकऱ्यांना खडतर प्रवासाची शिक्षा‎

मराठवाड्याच्या संतपरंपरेचा मानबिंदू असलेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखी मार्गाचे काम तब्बल नऊ वर्षांपासून रखडले आहे. काही ठिकाणी भूसंपादन न झाल्याने आणि शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याने प्रकल्प संथगतीने सुरू असला तरीही या रस्त्याची रुंदी आता २४ मीटरवरून १८ मीटर करण्यात आली आहे. त्यातदेखील रस्ता सोलापूर जिल्हा वगळता सर्व ठिकाणी रखडला असल्याचे नाथवंशज पालखीप्रमुख रघुनाथ महाराज पालखीवाले…

Read More

मोहाळ ते उंडणगाव बससेवा सुरू:चालक-वाहकांचा सत्कारः शिक्षणाचा प्रवास सुलभ, ग्रामस्थांनी मानले मंडळाचे आभार‎

मोहाळ येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास आता अधिक सोयीस्कर झाला असून, विद्यार्थ्यांसाठी मोहाळ ते उंडणगाव अशी एस.टी. बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बस सेवेमुळे सावित्रीबाई फुले कन्या हायस्कूल, उंडणगाव येथे शिक्षण घेणाऱ्या १०० ते ३०० विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोहाळ येथील अनेक विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी उंडणगाव येथे ५ किलोमीटर ये-जा करतात. विद्यार्थ्यांना सुरक्षित व…

Read More

दिंद्रुडला हमालांचे कामबंद आंदोलन आश्वासनानंतर स्थगित:थकीत मजुरी द्यावी, प्रलंबित प्रश्न सोडवण्याची शासकीय गोदामातील हमालांची मागणी‎

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील शासकीय गोदामातील हमाल कामगारांनी कामबंद आंदोलन मंगळवारपासून (२३ जून) सुरू केले आहे. यामुळे गोदामांतर्गत स्वस्तधान्य दुकानांना स्वस्त धान्याचे होणारे वितरण ठप्प झाले होते. प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुर्ते स्थगित करण्यात आले आहे. गोदामात आलेल्या धान्याच्या पोत्यांची उठाठेव करण्याची कष्टप्रत काम हमाल करतात. परंतु गेल्या पाच महिन्यांपासूनची त्यांची मजुरी सबंधित यंत्रणेने दिली नाही….

Read More

पुण्यातील बिल्डरपुत्राच्या हत्या प्रकरणाचा उलगडा:केतनच्या मृत्यूनंतरही सिया शांत दिसल्याने आला संशय

पुण्यातील बिल्डरपुत्र केतन अग्रवालला त्याची भावी पत्नी सिया गोयलने प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीने खून केल्याचे उघडकीस आले. तिने त्याला चेतनच्या मदतीने लोहगड किल्ल्यावरून ४०० फूट खोल दरीत ढकलून दिले होते. त्यांना अटक करण्यात आली. सियाच्या सासरच्या मंडळींनी सांगितले की, १८ जून रोजी लोहगड येथून केतनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तो पाहूनही सिया शांत होती. तिने…

Read More

पुण्यात 28 जूनला समरसता लोककला संमेलन:पद्मश्री रघुवीर खेडेकर अध्यक्ष, मुख्यमंत्री फडणवीस करणार उद्घाटन

पुण्यात २८ जून २०२६ रोजी ‘समरसता लोककला संमेलन २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. लोककलावंत पद्मश्री रघुवीर खेडेकर यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य समरसता साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा जतन व…

Read More

बनावट चलन सादर करून सातारा जिल्हा परिषदेची 28.50 लाखांची फसवणूक:सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल

सातारा जिल्हा परिषदेत मंजूर करण्यात आलेल्या लघुपाटबंधारे विभागाच्या विविध विकासकामांसाठी आवश्यक असलेली सुरक्षा ठेव आणि अतिरिक्त सुरक्षा ठेव भरल्याचे बनावट चलन सादर करून तब्बल २८ लाख ५० हजार ९५० रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महसूल व वन विभागाच्या शासन…

Read More

विश्वास नांगरे पाटील नागपूरचे नवे पोलीस आयुक्त:डॉ. रवींद्र सिंगल यांची बदली; एसीबीची जबाबदारी

नागपूरचे विद्यमान पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी राज्याचे आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. सिंगल यांच्याकडे आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (एसीबी) जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर नांगरे पाटील एसीबीचे अपर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. नवे पोलीस…

Read More

नागपुरात 'ऑपरेशन थंडर 2.0' अंतर्गत 23 कोटींचा मुद्देमाल जप्त:1515 तस्करांना अटक; 50 लाखांपर्यंत पोहोचली जनजागृती मोहीम

नागपूर शहर पोलिसांनी ‘ड्रग्समुक्त नागपूर-सुरक्षित नागपूर’ या ध्येयाने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन थंडर २.०’ मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. या मोहिमेअंतर्गत गेल्या अडीच वर्षांत २३.२१ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, १,५१५ तस्करांना अटक करण्यात आली आहे. कठोर कायदेशीर कारवाई, व्यापक जनजागृती आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे ही मोहीम प्रभावी ठरली आहे….

Read More