Headlines

कॉर्पोरेट जिहाद प्रकरण:आरोपी निदा खानला 11 मे पर्यंत पोलिस कोठडी; 'मलेशिया कनेक्शन' आणि 'मनीट्रेल'चा तपास सुरू

नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असताना, यातील मुख्य आरोपी निदा खान हिच्या अटकेनंतर अनेक खळबळजनक खुलासे झाले आहेत. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने २ मे रोजी तिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर ती फरार होती. अखेर गुरुवारी रात्री छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातून तिला ताब्यात घेण्यात आले. आज तिला नाशिक न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिची…

Read More

पावला पावलांवर लपलेला इथं वासनांध साप आहे:बंदुकीचे लायसन मला बी द्या साहेब मी पोरीचा बाप आहे; राजकुमार नायकांची कवितेद्वारे व्यथा

दबा धरून बसलेली गिधाडे, कुठपर्यंत विश्‍वास ठेवायचा, नुसते मोर्चे काढून कुठपर्यंत दिवा लावायचा, पावला पावलावर लपलेला इथं वासनांध साप आहे, बंदुकीचे लायसन मला बी द्या साहेब मी पोरीचा बाप आहे, या कवितेतून सवना (जि.हिंगोली) येथील कवी राजकुमार नायक यांनी सध्याच्या परिस्थितीची भीषणता मांडली आहे. मुलींच्या सुरक्षेसाठी आता बंदुकीचे लायसन मुलींच्या वडिलांना दिले पाहिजे, अशी मागणीही…

Read More

भाजप 2029 मध्ये एकनाथ शिंदेंना देणार धक्का:अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याने सांगितला प्लॅन

भाजप 2029 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेना व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वबळावर निवडून लढवेल, असा मोठा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. परिणामी, 2029 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या राजकारणात मोठे फेरफार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे….

Read More

हिंगोली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८३ टक्के:मागील वर्षीच्या तुलनेत निकालात घसरण, सीसीटीव्हीची नजर अन कॉपीमुक्त अभियानाचा परिणाम

हिंगोली जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा निकाल ८३.२६ टक्के लागलाअसून मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालात तब्बल ९ टक्के घसरण झाली आहे. दहावी व बारावी परिक्षेमध्ये निकालात झालेली घसरण शैक्षणिक वर्तुळातून चिंता वाढविणारी ठरू लागली आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील सहा ते सात वर्षापासून कॉपीमुक्त अभियान राबविले जात आहे. यावर्षी देखील जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक…

Read More

'एल निनो' च्या पार्श्वभूमीवर ग्रामीण रोजगाराला चालना:शेत, पाणंद रस्त्यांना प्राधान्य देऊन ग्रामीण रोजगाराला गती द्या -मंत्री भरत गोगावले

रोजगार हमी योजना विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या मातोश्री ग्राम समृद्धी शेत/ पाणंद रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देऊन तसेच या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन ग्रामीण रोजगाराला गती देण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी संबंधित यंत्रणांना दिले. ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा आणि ग्रामविकासाला गती देण्याच्या दृष्टीने मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विभागीय…

Read More

लाडकी बहिण योजनेत ६४ हजार महिलांनी KYC दुरुस्त केले:यामुळे त्यांना पुन्हा लाभ मिळण्याची आशा बळावली

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील सुमारे ६४ हजार महिलांनी त्यांच्या केवायसीमध्ये (KYC) झालेल्या चुकांची दुरुस्ती केली आहे. यामुळे त्यांना येत्या काळात दरमहा दीड हजार रुपये पुन्हा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. अमरावती जिल्ह्यातून ही माहिती समोर आली आहे. चुकीचे निकष निवडल्यामुळे जिल्ह्यातील या महिलांचा लाभ जानेवारी २०२६ पासून बंद करण्यात आला होता. या निर्णयामुळे अनेक…

Read More

पुण्यात गुन्हेगारीचा थरार:दारूच्या नशेत मित्राचा डोक्यात दगड घालून खून, पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात, घोरपडीतील घटना

पुण्यात दारू पिताना झालेल्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना घोरपडीतील बी. टी. कवडे रस्ता परिसरातील मोकळ्या जागेत घडली. या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खून झालेल्या तरुणाचे नाव लोकेश मानसिंग ठोंबरे (वय 30, रा. खाडेगाव, जि. नागपूर) असे आहे. पोलिस शिपाई…

Read More

अमरावतीत मुख्य जलवाहिनी फुटली, दोन दिवस पाणीपुरवठा बंद:कंत्राटदारांच्या संपामुळे दुरुस्तीत अडचण, मजीप्रासमोर आव्हान

अमरावती आणि बडनेरा शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी मोर्शी तालुक्यातील डवरगाव एमआयडीसी गेटजवळ फुटली आहे. यामुळे गुरुवार सायंकाळपासून दोन्ही शहरांचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. कंत्राटदारांच्या संपामुळे दुरुस्ती कार्यात अडचणी येत असल्याने पुढील दोन दिवस, म्हणजेच शुक्रवार आणि शनिवार, पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मोर्शी येथील सिंभोरा अप्पर…

Read More

सुसंस्कार शिबीर ही आजच्या काळाची खरी गरज:सुसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. रघुनाथ वाडेकर यांचे प्रतिपादन

आजच्या वेगवान आणि तंत्रज्ञानप्रधान युगात मुलांमध्ये असंवेदनशीलता वाढीस लागली असून मोबाईलचे व्यसन आणि नैतिक मूल्यांचा होत असलेला ऱ्हास ही गंभीर चिंतेची बाब बनली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यात चांगले संस्कार, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेल्या ग्रामगीता तत्वज्ञान प्रणालीनुसार सुसंस्कार शिबिरांची गरज असल्याचे प्रतिपादन वाडेकर नॅशनल स्कूल चे संचालक डॉ….

Read More

ट्रम्प यांनी मोदींना शुभेच्छा दिल्याचे वृत्त खोटे:संजय राऊत यांचा दावा; म्हणाले – तामिळनाडूत 1 जागा आलेल्या भाजपला सत्ता स्थापन करू द्या

भारतामध्ये लोकशाहीच्या नावाने काय सुरू आहे हे संपूर्ण जगाला माहिती आहे. भाजपने विधानसभा निवडणूक जिंकल्याने त्यांना शुभेच्छा दिल्या हे वृत्त खोटे आहे नाहीतर ट्रम्प यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे शुभेच्छा दिल्या. उद्या ग्रामपंचायत निवडणूक जिंकले तर ट्रम्प मोदींना शुभेच्छा देतील का? हे भाजपच्या आयटी सेलला समजले पाहिजे. ट्रम्प यांना खरी माहिती देणं माझे कर्तव्य आहे. ट्रम्प…

Read More