Headlines

पिंप्राळ्यात १५ मिनिटांत ६०० मीटरपर्यंत ओढल्या बारागाड्या:भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्याची परंपरा

पिंप्राळ्यात अक्षय्य तृतीयेला भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्याची परंपरा ७७ वर्षांपासून सुरू आहे. यंदा ३५ वर्षीय तरुण भगत हिरामण भील यांनी १५ मिनिटांत ६०० मीटर बारागाड्या ओढल्या. पिंप्राळा उड्डाण पुलापासून ते तलाठी कार्यालय असा उत्सव होता. गतवर्षी बारागाड्या निघाल्या त्या दिवशी पारा ४० अंशांच्या खाली होता. मात्र, या वर्षी रविवारी तापमान ४१ अंशांवर होते. म्हणून…

Read More

‘भद्रा मारुती’च्या चरणी ८०, तर घृष्णेश्वराच्या दरबारी २० हजार भाविक:गतवर्षी खुलताबादला ६० हजार, वेरूळला १५ हजार भाविक‎

प्रतिनिधी | खुलताबाद/वेरूळ अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर भद्रा मारुती मंदिरात यंदा विशेष सजावटीसोबतच भाविकांची उपस्थितीही विक्रमी ठरली. दिवसभरात अंदाजे ८० हजारांहून अधिक भाविकांनी भद्रा मारुतीचे दर्शन घेतले. मंदिर संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पाटील बारगळ यांनी ही माहिती देताना भाविकांच्या वाढत्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले, तर वेरूळला घृष्णेश्वर महादेव मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पहाटे ४…

Read More

निलजगाव पीएचसीतर्फे हनुमंतगावात टीबीमुक्त मोफत तपासणी अभियान:राज्य सरकारच्या टीबीमुक्त अभियानाचा भाग

ढोरकीन | पैठण तालुक्यातील हनुमंतगाव येथे निलजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत टीबीमुक्त अभियान नुकतेच राबविण्यात आले. राज्य सरकारच्या टीबीमुक्त अभियानाचा भाग म्हणून ग्रुप ग्रामपंचायत येथे मोफत निदान व उपचार अभियान घेण्यात आले. ग्रामस्थांनी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रोगाचे निदान, उपचार याबाबत कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी प्रयोगशाळेचे वरिष्ठ पर्यवेक्षक महेश कोरडे, टीबी हेल्थ व्हिजिटर इर्शाद सय्यद, रेडिओलॉजिस्ट…

Read More

वसंतराव नाईक चौकात तरुणीच्या छेडीच्या संशयावरून तरुणाला जमावाचा बेदम चोप:अबनॉर्मल तरुणासोबत प्रकार; गैरसमजातून झाल्याने दोन्ही पक्षांचा तक्रारीस नकार

बाहेरगावाहून बसस्थानकावर उतरल्यानंतर रिक्षाने घरी जाण्यासाठी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक चौकात आलेल्या तरुणीची छेड काढल्याच्या संशयावरून एका ३८ वर्षांच्या तरुणाला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी (१८ एप्रिल) मध्यरात्री घडली. या मारहाणीत तरुण जखमी झाला असून, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, हा प्रकार केवळ गैरसमजातून झाल्याने दोन्ही पक्षांनी तक्रार देण्यास नकार दिला…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:धुळे-सोलापूर महामार्ग -3 ब्लॅक स्पॉटवर 1 उड्डाणपूल, 2 भुयारी मार्ग; 5 ब्लॅक स्पाॅट, 3 वर्षांत 53 अपघात, 39 मृत्यू

अपघातमुक्त रस्त्यासाठी कामाला सुरुवात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील २०२२ ते २०२४ या तीन वर्षांत या ठिकाणी ५३ अपघात झाले असून त्यात ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर ५ ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित केले आहेत. सध्या ३ ‘स्पाॅट’वर दुरुस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) सुरू केले आहे. त्यासाठी सुमारे ९० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या ३…

Read More

राज्यातील हवामानात मोठा बदल:सोलापूर, इंदापूर आणि परभणीत पावसाचा धुमाकूळ; विविध ठिकाणी विजा कोसळल्या

राज्यात हवामानाचा मोठा विरोधाभास पाहायला मिळत असून, एका बाजूला उन्हाचा चटका वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला सोलापूर, पंढरपूर, परभणी आणि इंदापूरसह अनेक भागांत अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली आहे. वेगवान वादळी वारा आणि विजांच्या लखलखाटासह सुरू असलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, काही ठिकाणी वीज पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. इंदापूर तालुक्यात रात्री पावणे…

Read More

अमरावती लैंगिक शोषण प्रकरण:8 पीडितांपैकी पहिली मुलगी आली समोर, नागपूरहून 250 किमी प्रवास करून नोंदवला 'SIT' समोर जबाब

अमरावती हादरवून सोडणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणात अखेर एक मोठी कायदेशीर अडचण दूर झाली आहे. सामाजिक भीती आणि कलंकाची पर्वा न करता, नागपूरच्या एका १५ वर्षीय धाडसी मुलीने पुढे येत विशेष तपास पथकासमोर (SIT) आपला जबाब नोंदवला आहे. या प्रकरणात ओळख पटलेल्या ८ पीडितांपैकी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन समोर येणारी ही पहिलीच पीडिता ठरली…

Read More

दगडूशेठ गणपती मंदिरात श्री गणेश-देवी शारदा विवाह सोहळा:गाणपत्य सांप्रदायाच्या परंपरेनुसार 'शारदेश मंगलम्' उत्साहात संपन्न

पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात गाणपत्य सांप्रदायाच्या परंपरेनुसार श्री गणेश आणि देवी शारदा यांचा ‘शारदेश मंगलम्’ विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी मंदिर परिसर सनई आणि मंगलाष्टकांच्या स्वरांनी निनादला होता. दुपारी १२ वाजून ४७ मिनिटांनी भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा विवाह सोहळा थाटात पार पडला….

Read More

खासदार वानखडेंनी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदासाठी अर्ज भरला:'मी स्पर्धेत नाही', 28 एप्रिलनंतर नवे नेतृत्व जाहीर होणार

अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे यांनी जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या या अर्जामुळे अध्यक्षपदाच्या निवडीला महत्त्व प्राप्त झाले आहे. मावळते अध्यक्ष बबलू देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. वीरेंद्र जगताप, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुधाकरराव भारसाकळे आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश साबळे हे देखील या शर्यतीत आहेत. जिल्ह्याला २८ एप्रिलनंतर नवे नेतृत्व मिळण्याची…

Read More

नांदगाव खंडेश्वरमध्ये 271 युवकांना मिळाली नोकरी:द ग्रॅज्युएट फाउंडेशनने आयोजित केला रोजगार महोत्सव, 122 जणांना नियुक्तीपत्रे

नांदगाव खंडेश्वर येथे द ग्रॅज्युएट फाउंडेशनने आयोजित केलेल्या नोकरी महोत्सवात २७१ सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार मिळाला. ग्रामीण भागातील युवकांना त्यांच्या गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. यापैकी १२२ उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत, तर उर्वरित उमेदवारांना लवकरच नियुक्तीपत्रे पाठवली जातील. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रथमच अशा प्रकारचा रोजगार मेळावा आयोजित…

Read More