Headlines

फोंडशिरस येथे पेरूची बाग अन् गवारीचे पीक भुईसपाट:सलग दोन दिवस वादळी पावसाचा तडाखा‎

माळशिरस तालुक्यात रविवार आणि सोमवार अशा सलग दोन दिवस या अवकाळी आणि वादळी पावसामुळे तालुक्यातील फोंडशिरस येथील शेतकरी अजय निटवे यांच्या शेतातील पेरूची बाग आणि गवारीचे पीक पूर्णपणे भुईसपाट झाले असून, त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या अस्मानी संकटामुळे निटवे यांच्या डोळ्यात अश्रू आले असून ते पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. चालू वर्षी उन्हाळ्याची…

Read More

पहिल्या टप्प्यात मध्य राजापेठ, पूर्व झोन दस्तूरनगर अव्वल:मुदतीपूर्वीच 100 टक्के घर यादी व गट यादीचे काम पूर्ण, अधिकारी-कर्मचाऱ्यांचा केला गौरव‎

महानगरपालिकेच्या वतीने जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीला वेग आला असून पहिल्या टप्प्यातील घर यादी (एचएलबी) आणि गट यादी तयार करण्याच्या कामात मध्य झोन कार्यालय क्र. २, राजापेठ आणि पूर्व झोन कार्यालय, दस्तूरनगर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दोन्ही कार्यालयांनी शासनाने निर्धारित केलेल्या मुदतीपूर्वीच आपल्या कार्यक्षेत्रातील १०० टक्के काम पूर्ण करून शहरातील इतर चार्ज कार्यालयांसमोर आदर्श निर्माण…

Read More

Rohit Pawar Aggressive on Pandharpur Farmer Protest

पंढरपुरात होणाऱ्या शेतकरी आंदोलनावरून राजकीय वातावरण तापले आहे. आमदार रोहित पवार यांनी प्रशासनावर थेट निशाणा साधत आंदोलन रोखण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. पंढरपुरातील अन्नदात्याग आंदोलन अवघ्या ३६ तासांवर आले असताना प्रशासनाने वाहतुकीचा प् . रोहित पवार म्हणाले की, आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने होणार असून वारकरी आणि भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून नामदेव पायरीऐवजी…

Read More

अकोटमध्ये खतासाठी शेतकऱ्यांच्या रांगा:काळाबाजार, तुटवड्याच्या भितीने नियमित पुरवठा असतानाही रात्रीपासूनच गर्दी‎

खरीप हंगामासाठी युरिया खतासाठी शेतकऱ्यांच्या कृषी केंद्रांबाहेर मध्यरात्रीपासूनच रांगा लागत आहेत. सकाळी खतासाठी कुपन घेतल्यानंतर त्यांना खत खरेदी करावे लागत आहे. सातत्याने खताचा पुरवठा होत असतानाही शेतकऱ्यांची गर्दी का होत आहे, यामागील कारणे शेतकरी व कृषी केंद्रांच्या संचालकांनी सांगितली. पाऊस सुरू झाल्यानंतर आणि खताची मागणी वाढल्यानंतर काळाबाजार झाल्यास जादा पैसे मोजावे लागतील, असे काहींचे म्हणणे…

Read More

भगवंताची भक्ती करण्यासाठी वयाचे बंधन नसते- सुदर्शन शर्मा

संसाररूपी भवसागरातून मुक्ती मिळवण्यासाठी तसेच भगवंताची प्राप्ती करण्यासाठी भक्ती हा सर्वात सोपा आणि श्रेष्ठ मार्ग आहे. भगवंताच्या निस्सीम भक्तीमुळे मानवाच्या जीवनात सुख, शांती, ऐश्वर्य प्राप्त होते. भगवंताची भक्ती करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट वयाची आवश्यकता नसते. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ध्रुवाचे चरित्र होय, असे प्रतिपादन भागवताचार्य तथा ज्योतिषाचार्य पंडित सुदर्शन शर्मा यांनी केले. ते गोरक्षण रोड परिसरातील…

Read More

उपचारासाठी सर्वतोपरी मदत द्या; दोषींवर कारवाई करा:रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची आक्रमक भूमिका‎

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) तथा सर्वोपचार रुग्णालयात पत्नी आजारी पतीला पाठीवर घेऊन उपचारासाठी धावपळ करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बुधवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) प्रणित रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेने आक्रमक पवित्रा घेतला. संबंधित रूग्णावर उपचार करण्यात यावेत व या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या परिषदेतर्फे करण्यात आल्या. मागण्या मान्य न केल्यास रिपाइं…

Read More

ब्राह्मणवाडा, मसोला येथील अवैध हातभट्टीचा 480 लिटर सडवा नष्ट:40 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोन जणांविरोधात गुन्हे दाखल‎

आर्णी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ब्राह्मणवाडा, मसोला येथील शेतशिवारात सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीच्या अड्ड्यांवर आर्णी पोलिसांनी बुधवार दि. १० जून रोजी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत एकूण ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित दोन आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार…

Read More

कॉरिडॉर आरिष्ट निवारणार्थ विष्णुयाग:पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून 7 दिवसीय यज्ञाचे आयोजन; 15 जून रोजी मिरवणूक‎

श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रस्तावित कॉरिडोर रुपी अरिष्ट (संकट) निवारणार्थ आणि श्री पुरुषोत्तम मासाचे (अधिक मास) औचित्य साधून विशेष सात दिवसीय विष्णूयागाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्तदिनात्मक विष्णूयागाच्या (यज्ञ) आज दुसऱ्या दिवसाच्या प्रथम सत्राला उत्साहात सुरुवात झाली आहे. दिलेल्या माहितीनुसार, हा विष्णूयाग दि. ९ ते १५ जून या कालावधीत दररोज सकाळी ७.३० ते ११.३०…

Read More

पालक, मेथी, कोथिंबीर 10 ते 20 रुपयांनी महाग:वादळी पावसाचा तडाखा; आवक मंदावल्याने भाजीपाल्याचे दर कडाडले‎

जून महिना उजाडला मान्सूनच्या पहिल्या पावसाची चाहूल लागली. यंदा पावसाने सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस चांगलाच बरसला. पाऊस काही मिनिटेच झाला असला तरी वादळी पावसाने चांगलेच नुकसान केले. याचा फटका पालेभाज्याच्या पिकांनाही बसला. त्यामुळे शहरातील किरकोळ बाजारात पालेभाज्यांची आवक मंदावली असून बाजारभाव दुपटीने वाढले आहेत. अहिल्यानगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, केडगाव उपनगर, नालेगाव परिसरात…

Read More

पाच वर्षांपासून रखडलेल्या वणी रस्त्यासाठी आंदोलन:खडी-दगडांवरून प्रवास त्रासदायक; ग्रामस्थ आक्रमक‎

दहीवी ते वणी या रस्त्याची गेल्या पाच ते सहा वर्षांपासून झालेली दूरवस्था आणि रखडलेले काम याविरोधात संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. रस्त्यावरील दगड उचलून हातात निषेधाच्या पाट्या घेत नागरिकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. दहीवी-वणी मार्गाचे काम गेल्या वर्षी सुरू करण्यात आले होते….

Read More