Headlines

'गुंगी-गुडिया' टीकेवर सुनील तटकरे संतप्त:म्हणाले- काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली, दिलगिरीने विषय संपत नाही

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने केलेल्या टीकेवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. सुनेत्रा पवार यांच्याबद्दल गुंगी गुडीया असा शब्दप्रयोग करत काँग्रेसने आपली वैचारिक दिवाळखोरीच दाखवून दिली आहे, अशा शब्दांत तटकरे यांनी काँग्रेसचा तीव्र निषेध केला. केवळ दिलगिरीने…

Read More

Eknath Shinde Orders Special Audit Into Siddhivinayak Temple Donation Scam

देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची राज्य सरकारने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाचे ‘विशेष लेखापरीक्षण’ करण्याचे अत्यंत महत्त् . सरवणकर-शिंदे यांच्यात 20 मिनिटे चर्चा; अतिरिक्त मुख्य सचिवांना दिले निर्देश श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आणि आमदार सदा सरवणकर यांनी मंगळवारी (4…

Read More

देशभक्ती, निसर्ग आणि सामाजिक संदेशाच्या चित्रांनी खुलला कॅनव्हास:जिल्हा वाचनालयाच्या चित्रकला स्पर्धेत 1,100 विद्यार्थ्यांचा सहभाग‎

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने आयोजित शालेय चित्रकला स्पर्धेला यंदा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला. कोऱ्या कागदावर कल्पनाशक्तीला रंगांची सुंदर साथ देत चिमुकल्यांनी देशभक्ती, निसर्ग, सामाजिक संदेश आणि विविध विषयांवरील आकर्षक चित्रे साकारली. बाई इचरजबाई फिरोदिया शाळेत झालेल्या या स्पर्धेत तब्बल १,१०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष वैद्य राजा ठाकूर यांच्या…

Read More

मुग-उडदाच्या पेरण्या 50 टक्क्यांवर; मका-सोयाबीनचा दबदबा:जिल्ह्यात 6.87 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या, मक्याची सर्वाधिक 158, सोयाबीन 110% पेरणी‎

. गेल्या आठ दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांचे उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. १ जून ते ४ ऑगस्ट कालावधीत ९५.४० टक्के (ऊसासह) क्षेत्रावर पेरणी झाली असली, तरी मूग आणि उडदाच्या पेरण्या ५० टक्क्यांवरच ठप्प झाल्या आहेत. दुसरीकडे मका आणि सोयाबीन या पिकांनी सरासरी क्षेत्राच्या तुलनेत शंभर टक्क्यांहून अधिक पेरणी नोंदवत आपला दबदबा कायम…

Read More

दूषित पाण्यामुळे उजनी जलाशयाच्या पाणलोटामध्ये जलपर्णीचा विळखा:शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाला अडचणी, पाणीपुरवठा योजना पंपांच्या फूटबॉलवरही थर‎

वाशिंबे पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर झालेल्या पावसामुळे उजनी जलाशय पूर्ण क्षमतेने भरला आहे. मात्र, मुळा-मुठा नदीतून वाहत आलेल्या जलपर्णीने आता उजनी जलाशयाच्या काठाला विळखा घातला आहे. पाणीपातळी स्थिर असल्याने वाऱ्यामुळे जलपर्णी मोठ्या प्रमाणात नदीकाठी . उजनी जलव्यवस्थापनाने दूषित पाण्याबाबत व जलपर्णी निर्मूलनासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाकडून मार्गदर्शन मागवले आहे. गेल्या काही वर्षांत उजनी जलाशयातील प्रदूषण वाढल्याने…

Read More

नियोजनबद्ध, परिणामकारक कामाद्वारे थकीत मालमत्ता कराची वसुली करावी:उद्दिष्टपूर्तीसाठी प्रभावी नियोजन करा, आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांचे निर्देश‎

. ‘महापालिकेच्या महसुली उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या थकित वसुलीला वेग देण्यासाठी नियोजनबद्ध, परिणामकारक काम करणे अनिवार्य असून, यासाठी संपूर्ण समन्वयाने यंत्रणा कामाला लावावी,’ असे निर्देश मंगळवारी ४ ऑगस्टला महापालिकेत झालेल्या बैठकीत आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी दिले. मनपा आयुक्तांनी मालमत्ता कर विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. या बैठकीत चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसुलीची…

Read More

राजेश्वर मंदिरालगत रोडवर 3 वर्षांपासून खड्डा; भाविक त्रस्त:आगामी श्रावण सोमवारी कावडधारकांना मोठा धोका‎

अकोला शहराचे श्रद्धास्थान असलेल्या राजेश्वर मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावर पडलेला मोठा खड्डा गेल्या तीन वर्षांपासून तसाच असल्याने भाविक आणि परिसरातील नागरिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. १७ ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार असून या खड्ड्यामुळे कावड कावडधारक भक्तांची गैरसोय होणार आहे. तसेच मंदिरात दर्शनासाठी दररोज येणाऱ्या हजारो भाविकांसह स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे….

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:जायकवाडी भरल्याने दिलासा; 25 टीएमसी भरल्यानंतरच उघडणार मुळा धरणाचे दरवाजे

यंदा “एल निनो’च्या पार्श्वभूमीवर धरणे भरणार की नाही याची धाकधूक लागली होती. पण जायकवाडी ९१ टक्क्यांवर गेल्याने धरणातून विसर्ग सुरू झाला आणि अहिल्यानगरला दिलासा मिळाला. धरण साठा नियंत्रण निकषानुसार, १५ ऑगस्टपर्यंत मुळा धरणात ८७.७९ टक्के म्हणजेच सुमारे २२ हजार ६८६ दलघफू (२२.६ टीएमसी) पाणी साठवता येणार नाही. सध्याची आवक पाहता धरण पुढील दोन दिवसांत ओलांडणार…

Read More

राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार:पुणे, रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट; सिंधुदुर्गात पूरस्थिती, तर विदर्भासह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट

विश्रांती घेतलेल्या पावसाने राज्यात पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, या भागांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच नाशिक, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरसह पूर्व विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यांत…

Read More

मनमाडमधील रस्त्यांवर मोकाट जनावरांचे ठाण:अपघातांचे संकट, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर मनमाडमध्ये कारवाईची अपेक्षा‎

शहरातून जाणाऱ्या पुणे-इंदूर, नांदगाव-चांदवड महामार्गांसह शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून, संबंधित यंत्रणा व नगरपालिकेने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने अशा अपघातांतील पीडितांना भरपाई देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने कायदेशीर यंत्रणा उभारण्याचे निर्देश दिल्यानंतर हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठा…

Read More