Headlines

नवनीत राणा म्हणजे जातीय विष पेरणारी 'विषवल्ली:राणा अन् बोंडे यांच्यावर गुन्हे दाखल करा, महिलांच्या अत्याचारात जात-धर्म येतोच कुठे?- विजय वडेट्टीवार

माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांच्यासोबतच डॉ.अनिल बोंडे यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्यांनी अमरावती प्रकरणी चुकीची माहिती दिली आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, नवनीत राणा ही जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली एक विषवल्ली आहे, असे…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोटे बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलाय:देशाला फक्त काँग्रेसच नेतृत्व देऊ शकते, हे मोदींनीच सिद्ध केले- खासदार संजय राऊत

नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे देश गांभीर्याने पाहात नाहीत. ते नियमबाह्य आणि निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग होईल असे वर्तन पंतप्रधान करत असतात. कायदा माझे काय वाकडे करणार या भूमिकेत ते असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोटे बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलेला आहे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, महिला विधेयकाची…

Read More

Rohit Pawar Claims Pilots Fear Flying VSR Planes Post Ajit Pawar Accident

अजितदादांच्या बारामती येथील विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच, आता या प्रकरणातील दोषींवर कारवाईसाठी आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. ज्या ‘व्हीएसआर’ (VSR) कंपनीच्या विमानात हा अपघात झाला, त्या कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांच्याविरोध . व्हीएसआर कंपनीची नुकतीच झालेली बैठक वादळी ठरली आहे. कंपनीची विमाने सदोष असल्याचा आरोप कंपनीचे कर्मचारी आणि पायलटने केला आहे….

Read More

म्हैसघाटातील 2 किलोमीटरच्या रस्त्याला वन विभागाकडून मंजुरी:कन्नड-नागदची वाहतूक व्यवस्था सुधारण्यास होईल मदत‎

कन्नड-नागदला गौताळा अभयारण्य मार्गे जोडणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक ३९ वरील म्हैसघाटातील रस्ता अनेक दिवसांपासून धोकादायक झाला होता. अखेर म्हैसघाटातील दोन किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्ती कामाला वन विभागाने मंजुरी दिली. आमदार संजना जाधव यांनी ही माहिती दिली. यामुळे मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली समस्या आता मार्गी लागणार आहे. कन्नड-नागद मार्ग म्हैसघाटातून गौताळा अभयारण्य क्षेत्रात जातो. दुरुस्ती, डांबरीकरणासाठी…

Read More

‘हे रीलस्टार नव्हे, गुंड आहेत’; छत्रपती संभाजीनगर पोलिसांचा गर्दीसमोर दम:‘हवा’ करणाऱ्या गुंडांवर पोलिस भारी; गोळीबार करणाऱ्या पीडी टोळीची धिंड

दोन दिवसांपूर्वी हनुमाननगरात गावठी कट्टा आणि बिअरची बॉटल नाचवत गोळीबार करणाऱ्या पवन दिवेकर व त्याच्या पीडी कंपनीवर अखेर पोलिसांनी कारवाई केली. गुंडांवर पोलिस कसे भारी पडतात, याचा प्रत्यय शनिवारी (१८ एप्रिल) रात्री आला. अवघ्या ४८ तासांपूर्वी ज्या चौका . गुंड जेलमधून सुटल्यावर शस्त्रांसह रील्स बनवून दहशत माजवत असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने दिले होते. यानंतर ॲक्शन…

Read More

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पाणी, शिक्षण, आरोग्यावर भर:मनपाला 5 वर्षांच्या विकास आराखड्याचे निर्देश

अमरावती शहराच्या विकासासाठी पाणी, शिक्षण आणि आरोग्य या त्रिसूत्रीवर भर देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. अमरावतीकरांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. महापालिकेच्या आढावा बैठकीत त्यांनी पुढील पाच वर्षांचा सविस्तर विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. शनिवारी दुपारी झालेल्या या बैठकीत अमरावती शहराचा…

Read More

मोर्शीत ब्रह्मकुमारीज् तर्फे 'खुशियों का पासवर्ड' कार्यक्रम:डॉ. सचिन परब यांनी दिले तणावमुक्तीचे मार्गदर्शन

मोर्शी येथे प्रजापिता ब्रह्मकुमारीज् ईश्वरीय विश्वविद्यालयतर्फे ‘खुशियों का पासवर्ड’ या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. सचिन परब यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्याच्या तणावपूर्ण जागतिक परिस्थितीत ‘परिस्थिती कठीण आहे पण मी स्थिर आहे,’ हे वाक्य मनाला सांगणे हाच ‘खुशियों का पासवर्ड’ आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारीज् च्या स्थानिक केंद्रात…

Read More

गतवर्षीचा पीक विमा मिळाला नाही:खंडाळा खुर्दच्या शेतकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खंडाळा खुर्द, जावरा मोळवण, रोहना आणि मुंडवाडा परिसरातील शेतकऱ्यांना मागील हंगामातील सोयाबीन, तूर आणि कापूस पिकाचा विमा अद्याप मिळालेला नाही. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर धडक दिली आणि आपली कैफियत तहसीलदारांपुढे मांडली. मागील वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाने पंचनामे…

Read More

अक्षय्य तृतीयेला अमरावतीत 60 कुटुंबांचा गृहप्रवेश:शंभरावर चारचाकींची डिलिव्हरी; सोने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचीही मोठी खरेदी

वर्षभरातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर अमरावतीकरांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. घर, फ्लॅट, प्लॉट, शेती, दागिने, वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली. सध्याची भाववाढ आणि इतर बाबींचा खरेदीवर कोणताही परिणाम झाला नसून, उलट गतवर्षीच्या तुलनेत विक्रीत वाढ झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. या शुभमुहूर्तावर शहरातील सुमारे ६० कुटुंबे नव्या घरात प्रवेश करणार आहेत….

Read More

5.98 लाखांच्या बक्षीसांसह राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धा:पुण्यात 24 एप्रिल ते 4 मे दरम्यान; विक्रमी खेळाडूंचा सहभाग

पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना आणि महाराष्ट्र राज्य व्हेटरन्स टेबल टेनिस समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 32व्या राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 24 एप्रिल ते 4 मे 2026 या कालावधीत म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडणार आहे. स्पर्धेत एकूण 5 लाख 98…

Read More