Headlines

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन:मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये मुख्य सोहळा, संभाजीनगरातही उत्साहात कार्यक्रम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चा २७ वा वर्धापन दिन आज राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे मुख्य सोहळा पार पडत असून, छत्रपती संभाजीनगरसह विविध ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनीही कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत पक्षाच्या वैचारिक वारशाला…

Read More

मुंबईतील नोकरीसाठी मराठी उमेदवारांना 'नो एन्ट्री'?:फक्त गुजराती-मारवाडी उमेदवारांना प्राधान्य, वादग्रस्त जाहिरात व्हायरल

इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक याने सोसायटीच्या आवारातील पांढऱ्या पट्टीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर तो वाद शांत झाला खरा, तोच आता मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती-मारवाडी असा नवा भाषिक वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईत असणाऱ्या एका उच्च पदस्थ नोकरीच्या जाहिरातीत ‘फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारच अर्ज करू शकतात’ असा स्पष्ट उल्लेख करण्यात आल्याने सोशल मीडियावर तीव्र संताप…

Read More

युरियासाठी पहाटे 4 वाजल्यापासून रांगा:अकोटमध्ये खतटंचाईमुळे गोंधळ, खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची धावपळ

राज्यात खरीप हंगामाची तयारी सुरू असताना अकोला जिल्ह्यातील अकोट येथे युरिया खताच्या टंचाईमुळे मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. युरियाचा मर्यादित साठा उपलब्ध असल्याने शेकडो शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्राबाहेर पहाटेपासूनच रांगा लावल्या. परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली की गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. पहाटे 4 वाजल्यापासून शेतकऱ्यांची गर्दी मिळालेल्या माहितीनुसार, अकोटमधील एका कृषी सेवा…

Read More

पुणे महापौर कार्यालय उडवून देऊ:ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी, संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा वाढवली, पोलिसांचे गस्त

पुण्याच्या महापौर कार्यालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या धमकीच्या ई-मेलमुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आणि पोलिस दल सतर्क झाले असून, संबंधित परिसरात तातडीने सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाठवण्यात आलेल्या या धमकीच्या ई-मेलमध्ये केवळ पुणे महापौर कार्यालयच नव्हे, तर नागपूरमधील काही संवेदनशील…

Read More

कात्रजमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ!:एकाच रात्री 3 फ्लॅट फोडल्याने खळबळ, लाखो रुपयांचा ऐवज लंपास

पुणे शहरातील कात्रज परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत वेगवेगळ्या सोसायट्यांमधील तीन सदनिकांचे कुलूप तोडले. या घटनांमध्ये सोन्याचे दागिने आणि रोकड असा लाखोंचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे. यापैकी एका घटनेत, एका ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी चार लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केला. अलका उत्तम कवितके (वय 65, रा. मनमंदिर बिल्डींग, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर:आज एनडीएची घटक पक्षांची बैठक, उद्या नीती आयोगाच्या बैठकीलाही राहणार उपस्थित

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या नेतृत्वाची 12 वर्षे पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) घटक पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत दाखल होत आहेत. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या बैठकीत केंद्र सरकारच्या…

Read More

Gokul Gite Meets Eknath Shinde Amidst Offer Claims

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीची डोकेदुखी वाढवली असून आता या निवडणुकीत नवा राजकीय ट्विस्ट आला आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी आपल्याला विविध प्रकारच्या ऑफर येत असल्याचा दावा गीत . उमेदवारी मागे घेण्यास नकार, महायुतीची वाढली चिंता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून विद्यमान आमदार नरेंद्र दराडे यांना उमेदवारी…

Read More

प्राथमिक, सेवानिवृत्त शिक्षकांचे लाक्षणिक आंदोलन:निवृत्तीवेतन देण्याच्या मागणीसाठी चेतना कर्मचारी संघटना आक्रमक

महाराष्ट्र शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षकांचे वेतन दरमहा १ तारखेला होत नसल्याने, या विरोधात मंगळवार, ९ रोजी जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. ‘चेतना कर्मचारी संघटना’ आणि जिल्हा परिषदेचे प्राथमिक व सेवानिवृत्त शिक्षक आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राज्य स्तरावरून जिल्हास्तरावर वेतन निधी वेळेत प्राप्त…

Read More

वेलकम पॉइंटवर खासगी बसेसमुळे होणाऱ्या कोंडीने सर्वसामान्य बेजार:थांब्यासाठी शहराबाहेर स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी‎

नागपूरकडून शहरात येतानाचे शहराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा ‘वेलकम पॉईंट’ परिसर सध्या वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. खासगी ट्रॅव्हल्स बसेसच्या थांब्यांमुळे निर्माण झालेल्या या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अर्जुन नगर परिसरातील शेकडो नागरिकांनी मंगळवारी (दि. ९) जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांना निवेदन सादर केले. तसेच सात दिवसांत…

Read More

मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांवरून वाद पेटला:जैन धर्मगुरूंसाठी रंगवलेल्या रस्त्यांवरुन मनसेचा इशारा, सांस्कृतिक दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही- संदीप देशपांडे

मुंबईतील घाटकोपर-विद्याविहार परिसरात जैन धर्मगुरूंच्या स्वागतासाठी रस्त्यांवर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या रंगवण्यात आल्याच्या प्रकारावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. सोशल मीडियावर हा मुद्दा चर्चेत आल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आक्रमक भूमिका घेत या प्रकारावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. घाटकोपर परिसरातील काही रस्त्यांवर आणि सोसायटी परिसरात जैन धर्मगुरू व साध्वी अनवाणी चालताना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी…

Read More