Headlines

राहुल गांधी एक पाकिस्तानी एजंट:पाकमध्ये बसलेल्या बॉसला खूश करण्यासाठी मोदींविरोधात बोलतात, मंत्री नीतेश राणे यांचा आरोप

भाजप नेते तथा मंत्री नीतेश राणे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. राहुल गांधी हे पाकिस्तानी एजंट आहेत. ते पाकमध्ये बसलेल्या आपल्या बॉसला खूश करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलतात, असे ते म्हणालेत. त्यांच्या या टीकेमुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सध्या महागाई, इंधन…

Read More

पुण्यात गरीब रुग्णांसाठीच्या हजारो खाटा रिकाम्याच:पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह; सक्षम यंत्रणेची मागणी

पुणे शहरात गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवलेल्या हजारो मोफत खाटा रिकाम्याच राहत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अतिरिक्त एफएसआयच्या बदल्यात खासगी रुग्णालयांना गरीब रुग्णांना मोफत उपचार देणे बंधनकारक असतानाही, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या उदासीन कारभारामुळे गरजू रुग्ण या सुविधेपासून वंचित राहत असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. शहरातील अनेक मोठ्या…

Read More

सिद्धिविनायक मंदिराचा होणार कायापालट:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडला नव्या आराखड्याचा मास्टरप्लॅन

मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराचा लवकरच कायापालट होणार असून मंदिर परिसराला अत्याधुनिक आणि भव्य रूप देण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन करण्यात आले. या विकास आराखड्यामुळे मंदिर परिसर अधिक आकर्षक, सुरक्षित आणि भाविकांसाठी सुलभ होणार असल्याची माहिती देण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल…

Read More

ठाण्यात बहुजन विकास आघाडी शिंदेंसोबत?:क्षितिज ठाकूर विधान परिषदेवर जाण्याची चर्चा; पालघर पट्ट्यात शिंदेंची ताकद वाढणार

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून ठाणे-पालघर विधान परिषद मतदारसंघासाठी एक नवे समीकरण आकाराला येण्याची चिन्हे दिसून येत आहेत. विरार, वसई, नालासोपारा आणि पालघर पट्ट्यात मजबूत पकड असलेल्या बहुजन विकास आघाडीचे (बविआ) नेते क्षितीज ठाकूर यांना या जागेवरून संधी…

Read More

स्मशानभूमीत अघोरी पूजा, पशूंचे बळी:नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबाचा काळा कारनामा उघड; कमलेश अधिकारी विरोधात गुन्हा

नाशिकमध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या आणखी एका भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आश्रम आणि मठाच्या माध्यमातून मानसिक त्रासात असलेल्या लोकांना जाळ्यात ओढून त्यांचे आर्थिक व मानसिक शोषण करणाऱ्या कमलेश शिवकुमार अधिकारी आणि त्याच्या पत्नीविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून,…

Read More

मुंढवा जमीन घोटाळा:पुरवणी दोषारोपपत्रात दिग्विजय पाटील दोषी, तरीही पोलिसांची मवाळ भूमिका, बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या जमिनीवर ताब्याचा प्रयत्न

मुंढवा येथील अत्यंत मोक्याची 40 एकर शासकीय जमीन महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेकायदेशीरपणे लाटण्याचा मोठा कट आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात उघडकीस आला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शीतल किशनचंद तेजवाणी आणि “अमेडिया एंटरप्रायजेस’चे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील हे पोलिस तपासात पूर्णपणे दोषी आढळले असून, त्यांच्याविरुद्धचे सबळ पुरावे न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्राद्वारे सादर करण्यात आले आहेत. मात्र,…

Read More

बुलढाण्यात 4 चिमुकल्यांना विहिरीत फेकून पित्याने उडी घेऊन केली आत्महत्या:कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल; चिमुकल्यांमध्ये दोन मुलींचा समावेश

कौटुंबिक वादातून जन्मदात्याने आपल्या चार निष्पाप मुला – मुलींना विहिरीत फेकून दिले आणि त्यानंतर स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. जळगाव जामोद (जि. बुलढाणा) तालुक्यातील आदिवासी भागातील राजुरा शिवारात सोमवारी २५ मे रोजी सकाळी ही हृदयद्रावक घटना उघ . या घटनेत पित्यासह दोन मुले आणि दोन मुली अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात…

Read More

अहिल्यानगरात भाजपच्या ताकदीसमोर राष्ट्रवादी बॅकफूटवर‎,:राष्ट्रवादीला रायगडची जागा जाण्याची शक्यता असल्याने नगरची जागा जाऊ शकते भाजपकडे‎

राज्यातील स्थानिक स्वराज्य ‎संस्थांच्या 17 विधान परिषद‎ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली ‎आहे. राजकीय हालचालींना वेग‎ आला. 18 जून रोजी होणारे मतदान‎ आणि 22 जूनच्या मतमोजणीपूर्वी ‎”महायुती”मध्ये जागा वाटपाचा नवा ‎फॉर्म्युला निश्चित झाल्याचे‎ सूत्रांकडून समजते. महायुतीत ‎भाजप 12, शिवसेना 4 आणि ‎राष्ट्रवादीच्या वाट्याला ‎रायगड-रत्नागिरी- सिंधुदुर्ग ‎मतदारसंघाची एकमेव जागा ‎जाण्याची दाट शक्यता आहे, असे‎ झाले तर अहिल्यानगरची…

Read More

पावसाळ्यापूर्वी नालेसफाईला गती, पथदिव्यांचेही जिओ टॅगिंग करणार:पथदिवे देखभाल, दुरुस्ती पालिकाच करणार‎

मनपा स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षा व नागरी सुविधांशी संबंधित तीन निर्णय घेण्यात आले आहेत. पूर्व आणि उत्तर झोनमधील मोठ्या नाल्यांची सफाई करणे, शहरातील सर्व पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी लागणारे स . मनपा क्षेत्रातील एलईडी पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती व नवीन एलईडी लाइट्स लावणे, सीसीएमएसचा पुरवठा, स्थापना व देखभाल दुरुस्तीचा प्रस्ताव स्थायी समिती सभेत…

Read More

एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘मसुदा समिती’ स्थापन:80 लाख एकल महिलांना होणार लाभ, स्वतंत्र धोरण आणणारे महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य

राज्यातील विधवा, घटस्फोटित, परितक्त्या आणि अविवाहित अशा एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, कायदेशीर, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक प्रश्नांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या महिलांच्या सर्वंकष सक्षमीकरणासाठी सरकारने “एकल महिला धोरण मसुदा समिती” स्थापन केली आहे. असे स्वतंत्र धोरण आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे. “साऊ एकल महिला समिती”चे राज्य…

Read More