Headlines

पुण्यात वकिलाकडून महिला सेक्रेटरीची निर्घृण हत्या:पत्नी अन् अल्पवयीन मुलीसह भाजप विधी शाखा अध्यक्ष अटकेत

पुण्यातील मुंढवा परिसरात एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून ॲड. संजय सावंत याने आपल्या पत्नी आणि अल्पवयीन मुलीच्या मदतीने महिला सेक्रेटरीचा क्रूरपणे खून केला. पूनम दिनेश मुन (वय 35) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी सावंत कुटुंबातील तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. पूनम मुन या गेल्या साडेतीन वर्षांपासून ॲड. संजय…

Read More

महात्मा फुले यांचे बहुजन वर्गाच्या उन्नतीसाठीचे योगदान अतुलनीय:महात्मा फुले जयंती कार्यक्रमात आमदार समाधान आवताडे यांचे प्रतिपादन‎

“क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या विचारांनी समाजाला नवदिशा दिली आणि समतेचा मार्ग दाखवला,” असे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी केले. . क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त मंगळवेढा येथील माळी गल्ली येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत…

Read More

शहराच्या विकासासाठी पालिका प्रशासनाचा पुढाकार:छत्रीतलाव आणि वडाळी उद्यानांच्या सौंदर्यीकरणावर भर; स्वच्छतेसाठी जनसहभागाचे आवाहन‎

शहराचा चेहरामोहरा बदलण्यासोबतच नागरी सुविधांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आता विकासात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी शुक्रवार १७ रोजी सकाळी ६.३० वाजता शहरातील विविध भागांचा प्रत्यक्ष दौरा करून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. शहर स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. अशा सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. दस्तूर…

Read More

भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर महापालिकेचा मोठा यू-टर्न:तक्रारींचा भडका, प्रशासनाचा निर्णय बदलला; अभियंता बदल्या पूर्णपणे रद्द

मुंबई महापालिकेत झालेल्या 122 अभियंत्यांच्या बदल्यांवर अखेर पूर्णविराम देण्यात आला आहे. बदल्यांमध्ये कथित गैरव्यवहार आणि ‘ट्रान्सफर मार्केट’चे आरोप पुढे आल्यानंतर प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला. ऑक्टोबर 2025 मध्ये या बदल्या करण्यात आल्या होत्या, मात्र सुरुवातीपासूनच या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अनेक तक्रारी, आक्षेप आणि चौकशीच्या मागण्यांमुळे हे प्रकरण सतत चर्चेत राहिले होते. या…

Read More

राज्यात उष्णतेचा कहर अन् अवकाळीचा तडाखा:एकीकडे कडक उन्हाळा, दुसरीकडे विजांसह पाऊस; शेतकऱ्यांची वाढली चिंता

राज्यात सध्या हवामानाचा विलक्षण आणि चिंताजनक बदल पाहायला मिळत आहे. एका बाजूला तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असून अनेक ठिकाणी तो 40 अंशांच्या पुढे गेला आहे, तर दुसऱ्या बाजूला काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या दुहेरी परिस्थितीमुळे सामान्य नागरिकांसह विशेषतः शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत होत असतानाच अवकाळी पावसामुळे पिकांचं…

Read More

मोदी है तो मुमकिन है आता दंतकथा, फक्त 'नमकीन'भाषणे उरली!:850 जागा करून सत्तेचा अमर पट्टा बांधण्याचा डाव उधळला- संजय राऊत

मोदी है तो मुमकीन है ही आता दंतकथा झाली आहे. फार तर आता मोदी है तो नमकीन है असे म्हणू शकतात. कारण ते नमकीन भाषणे करतात आणि त्यांचे लोकं जीभ चाटत टाळ्या वाजवतात. अमित शहा यांनी काल विधेयक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपमानित करण्यासाठी आणले काय? आम्ही दोन-तृतीयांश मते जमा करू शकत नाही, भाजपकडे स्वत:चे…

Read More

अशोक पर्वात संविधानाचा जागर; 500 प्रतींचे करणार वितरण:मूल्यांच्या जपणुकीसाठी सम्राट अशाेक प्रतिष्ठान, भीमशक्ती संघटनेचे आयाेजन

भारतीय सुवर्णयुगाचे शिल्पकार सम्राट अशोक यांच्या ऐतिहासिक कार्याला उजाळा देणाऱ्या राज्यस्तरीय “अशोक पर्व महोत्सवा’त यंदा एक विशेष आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात येत आहे. या महोत्सवात तब्बल ५०० भारतीय संविधानाच्या प्रतींचे वितरण करण्यात येणार असून, . मूर्तिजापूर तालुक्यातील भवनसुंदर वानखडे यांचा हा उपक्रम असून त्यांनी ५०० संविधान प्रतींचे दान देत समाजापुढे आदर्श ठेवला आहे. सामाजिक, धार्मिक…

Read More

विधानपरिषद रणधुमाळीत एकनाथ शिंदेंचा पहिला चेहरा जवळपास निश्चित:दुसऱ्या जागेवर धक्का रणनीती? अकार्यक्षम मंत्र्यांवर गंडांतर

महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीची घोषणा होताच सत्ताधारी शिवसेना शिंदे गटामध्ये राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. 10 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत 12 मे रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात उमेदवारीबाबत रणनीती आखली जात असून,…

Read More

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:ज्या शाळेने दिले 7 पोलिस, 1 सैनिक, ती आज भरतेय फक्त एका विद्यार्थ्यासाठी

१९६७ सालची गोष्ट… लामकाना तांड्यावर एक जिल्हा परिषद शाळा सुरू झाली. जवळपास २५० घरांचा हा गजबजलेला तांडा. या शाळेत शिकलेली मुलं पुढे मोठी झाली. याच मातीत घडलेले ७ तरुण पोलिस झाले, एक जण आर्मीत गेला, तर दोघे रेल्वेत रुजू झाले. शाळेचा नावलौकिक वाढत होता. पण काळ बदलला, विकासाची गंगा शहरात आली, मात्र लामकाना तांड्यापर्यंत पोहोचलीच…

Read More

‘माण, कोरडा’वरील 19 बंधारे कोरडे टेंभूच्या पाण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा:17 गावामधील 3300 हेक्टर क्षेत्रावरील बागायती पिके धोक्यात‎

सांगोला तालुक्यातील शेतीला आधार देणाऱ्या माण आणि कोरडा नद्यांवरील १८ बंधारे सध्या पाण्याअभावी कोरडे पडल्याने शेतकऱ्यांसमोर भीषण संकट उभे राहिले आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने नदीपात्रात पाणी साचले नाही, परिणामी ३३०० हेक्टर क्षेत्रातील पिके आता वाळण्याच्या मार्गावर आहेत. शेतीसोबतच जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला असून, प्रशासन कधी पावले उचलणार, असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत….

Read More