Headlines

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 'जन जंगल' पुस्तकाचे प्रकाशन:किशोर रिठे यांच्या पुस्तकात 5 दशकांतील वन्यजीव संवर्धनाचा आढावा

जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र वन्यजीव विभागातर्फे नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेत (IIM) एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ निसर्ग व वन्यजीव अभ्यासक आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) संचालक किशोर रिठे यांच्या ‘जन जंगल’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. मराठीत लिहिलेल्या या पुस्तकात भारतातील…

Read More

पिंपरीत शोककळा:आर्थिक विवंचनेतून एकाच कुटुंबातील तिघांची सामूहिक आत्महत्या

पुण्यातील पिंपरी येथील मोरवाडीतील करिष्मा ग्लोरी सोसायटीमध्ये आर्थिक विवंचनेतून विषारी पदार्थ सेवन केलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. पती विनोद पिळे यांच्या मृत्यूनंतर उपचाराधीन असलेल्या पत्नी सिरजा पिळे आणि मुलगी पूर्णिमा पिळे यांचीही प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांमध्ये विनोद पिळे (वय 50), त्यांची पत्नी सिरजा पिळे (वय 45) आणि…

Read More

100 रुपयांचे चिंचोके लाखाला तर मध 7 लाख रुपये लिटर!:भोंदूबाबा अशोक खरातच्या फसवणुकीचे ED कडून धक्कादायक खुलासे

‘दैवी शक्ती’च्या नावाखाली भक्तांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने काही धक्कादायक पुरावे समोर आणले आहेत. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, खरातने आर्थिक संकट दूर होऊन व्यवसायात भरभराट होईल आणि दैवी शक्ती प्राप्त होईल, असे खोटे आमिष दाखवून अवघी एक हजार रुपये मूळ किंमत असलेली पुष्कराज व डायमंडसदृश अंगठ्यांची जोडी भक्तांना तब्बल 2.62…

Read More

पत्राचाळ प्रकरणात जेलमध्ये जाऊन आलेले संजय राऊत '420':त्यांनी गृहमंत्र्यांवर बोलू नये, तेवढी त्यांची लायकी नाही- नीतेश राणे

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात जाऊन आलेला संजय राऊत स्वतः 420 आहे आणि खिचडी घोटाळ्यात पैसे खाणाऱ्या या व्यक्तीची देशाच्या गृहमंत्र्यांवर टीका करण्याची लायकी नाही, अशा शब्दांत भाजप नेते नीतेश राणे यांनी राऊतांवर टीका केली आहे. आपण घरात सुरक्षित आहोत कारण अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे. प्रत्येकाला आंदोलन करण्याचे स्वतंत्र…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलसाठी 30 ते 40 लाख टन उसाचा वापर; साखरेचे दर 21 टक्के वाढले, 15 दिवसांत भाव 43 वरून थेट 52 रुपयांवर पोहोचले

पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचा वाढता वापर, उसाचे घटलेले उत्पादन आणि साखरेची निर्यात. यातच शासनाने साखरेचा कोटा कमी केल्याने चहाचा कप, गोड पदार्थ, सणावाराचे फराळ यंदा सर्वसामान्यांच्या खिशाला अधिक महाग पडणार आहेत. गेल्या 15 दिवसांत साखरेचे किरकोळ दर 43 रुपयांपासून थेट 52 रुपयांपर्यंत म्हणजे सुमारे 21 टक्के दर वाढले आहेत. याचा थेट परिणाम प्रत्येक कुटुंबाच्या मासिक…

Read More

सफाई कामगारांचे थकीत वेतन वसुलीसाठी शिफारस करणार:चांदवडला आढावा बैठकीमध्ये मुकेश सारवान यांचे आश्वासन‎

नगरपरिषद हद्दीतील सफाई कामगारांचे थकीत वेतन व किमान वेतनातील फरक ठेकेदाराकडून वसूल करण्याची शिफारस संबंधित विभागांकडे करण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग मुंबईचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी दिले. सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत गुरुवारी तहसील कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत सफाई कामगारांनी ठेकेदारामार्फत आर्थिक व श्रमिक शोषण होत असल्याचे सांगत निवेदन…

Read More

केबीएच आश्रमशाळेत 50 वृक्षांचे रोपण:‘दिव्य मराठी’च्या ‘एक वृक्ष, एक जीवन” अंतर्गत मानूरला राबवला उपक्रम; देशी वृक्षांना प्राधान्य‎

. मानूर येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या के. बी. एच. आश्रमशाळेच्या प्रांगणात ५० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. शाळेच्या परिसरातील पूर्वनियोजित खड्ड्यांमध्ये नीम, वड, पिंपळ, करंज आणि आंबा आदी सुगंधी, छायादार व औषधी वृक्षांची लागवड केली . महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘दिव्य मराठी’च्या ‘एक…

Read More

राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी समन्वयाने हटवणार अतिक्रमणे:जामखेडच्या विकासासाठी सर्वपक्षीय एकजूट; बैठकीत निर्णय‎

गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डीच्या कामाला गती देण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राष्ट्रीय महामार्गालगतच्या शासकीय भूखंडांवरील अतिक्रमणे नियमानुसार हटविण्याचा निर्णय महसूल, राष्ट्रीय महामार्ग विभाग, . कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन आवश्यक सहकार्य करणार असून सर्व विभागांनी समन्वयाने काम करून महामार्गाचे रखडलेले काम तातडीने मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त केला. मुस्लिम…

Read More

पारनेर आगारात पाच नवीन राजमाता जिजाऊ बस दाखल:आमदार काशिनाथ दाते‎यांच्या हस्ते लोकार्पण‎

पारनेर आगाराच्या ताफ्यात पाच नवीन राजमाता जिजाऊ बस दाखल झाल्या आहेत. आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते या बसेसचे शनिवारी लोकार्पण करण्यात आले. महामंडळाच्या अन्य बसच्या तुलनेत या नवीन बस अत्याधुनिक आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आमदार दाते म्हणाले, राज्य सरकार विविध घटकांतील नागरिकांना प्रवास दरात मोठ्या प्रमाणावर सवलती देते. लाडक्या बहिणींना निम्म्या दरात…

Read More

शहर खड्डेमय:अकोटमधील अंतर्गत रस्ते बनले मृत्यूचे सापळे; रस्त्यांची चाळण, पावसानंतर सरकारी यंत्रणांचा बेताल कारभार चव्हाट्यावर‎

शहरातील अंतर्गत तसेच मुख्य चौकातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून अकोट खड्डेमय झाले आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसने खड्ड्यात बसून आंदोलन केले होते. निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. सर्वाधिक समस्या प्रमुख चौकांमध्ये असते. या ठिकाणी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे येथे…

Read More