धर्मांध शक्ती सत्तेत असल्याने महाराष्ट्रात बुवाबाजीला खतपाणी:विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा; दाभोलकरांची काढली आठवण
धर्मांध शक्ती सत्तेत असल्यामु्ळे महाराष्ट्रात अघोरी विद्या, कर्मकांड व बुवाबाजीचे स्तोम माजल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या प्रकरणी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या दिवंगत नरेंद्र दाभोलकर यांची आठवण काढली आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतरही महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची अंमलबजावणी होत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असे ते म्हणालेत. भोंदू…