विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय गेमचेंजर ठरू शकतो:निवडणूक बिनविरोध करण्याकडे सत्ताधारी भाजपचा कल
महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आता सर्वांचे लक्ष एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे लागले आहे की, उद्धव ठाकरे पुन्हा विधानपरिषदेच्या रिंगणात उतरणार का? त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ 13 मे रोजी संपत असल्याने ते पुन्हा सभागृहात येतील का, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर या चर्चेला अधिकच उधाण आले आहे. भारत निवडणूक आयोगाने…