Headlines

तोगडियांविरोधात अमरावतीत तीव्र निदर्शने:महिला पत्रकाराबाबतच्या वक्तव्यावरून पत्रकार संघाचे आंदोलन

अमरावती येथे आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलाचे प्रमुख डॉ. प्रवीण तोगडिया यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने बुधवारी, १५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केले. डॉ. तोगडिया यांच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनाचे कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी अमरावतीत माध्यमांशी बोलताना डॉ. तोगडिया…

Read More

नाशिक आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरण:वेषांतर करून रॅकेटचा पर्दाफाश, आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा संशय; पोलिसांचे खळबळजनक खुलासे

नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणी आणि महिलांचे लैंगिक शोषण करून त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचे अत्यंत धक्कादायक प्रकरण नुकतेच समोर आले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नाशिक पोलिस दलातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चक्क ‘वेषांतर’ करून कंपनीत प्रवेश मिळवला आणि पुराव्यांसह या रॅकेटचा पर्दाफाश केला. तसेच या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे का याचा तपास…

Read More

पुणे RMC असोसिएशनचा 'सुरक्षेसाठी कार्यविराम' जाहीर:आज मध्यरात्रीपासून रेडी मिक्स कॉंक्रिटचा पुरवठा स्थगित

पुणे आरएमसी असोसिएशनने उद्योगातील अनुपालन, सुरक्षा मानके आणि धोरणात्मक सुसंगती मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार, पुणे जिल्ह्यातील सर्व आरएमसी प्रकल्पांमध्ये बुधवार, १५ एप्रिल २०२६ च्या मध्यरात्रीपासून काही दिवसांसाठी ‘तात्पुरता व संरचित कार्यविराम’ जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत रेडी मिक्स कॉंक्रिटचे (RMC) उत्पादन आणि पुरवठा पूर्णपणे बंद राहील. रेडी मिक्स कॉंक्रिट हे…

Read More

कोणाची तरी 'वाट' लावण्यासाठीच खरात प्रकरण बाहेर काढले:शेतकऱ्याला नाही, पण खरातला पाणी मिळतंय – राज ठाकरे

नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघाले असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच आपली परखड प्रतिक्रिया दिली आहे. “हे प्रकरण म्हणजे कोणाची तरी वाट लावण्यासाठी जाणीवपूर्वक बाहेर काढलेली खेळी आहे,” असे सांगतानाच त्यांनी पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर आणि ‘विकल्या गेलेल्या’ यंत्रणेवरही जोरदार प्रहार केला. एका व्यंगचित्राच्या कार्यक्रमात बोलताना…

Read More

बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू:आईच्या कुशीतून ओढून नेले; भंडाऱ्यात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र होत असताना, १५ एप्रिल रोजी पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात एका पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. विर्शी शेतशिवारात ही घटना घडली. आशिका काशिनाथ मिरी (वय ५) असे मृत बालिकेचे नाव आहे. ती छत्तीसगडमधील बलोदा (बाजार) जिल्ह्यातील सुहेला गावची रहिवासी होती आणि तिचे कुटुंब विर्शी येथे विटाभट्टीवर कामासाठी आले होते. बुधवारी…

Read More

खरातने सांगितले मित्र जिवंतय, पण दुसऱ्याच दिवशी मृतदेह सापडला:शिवाजी सहाणेंनी सांगितला किस्सा; दमानियांच्या आरोपांवर स्पष्टीकरण

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात नाव जाहीर केल्यानंतर माजी आमदार शिवाजी सहाणे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना खरातची भविष्यवाणी कशी फोल ठरली, याचा खुलासा केला आहे. आपला एक मित्र बेपत्ता असताना त्याच्या शोधासाठी आपण खरातशी संपर्क साधला होता. त्यावेळी खरातने तो मित्र सुखरूप असल्याचे सांगितले होते, मात्र दुर्दैवाने दुसऱ्याच दिवशी त्या…

Read More

औंढा नागनाथजवळ भीषण अपघात:खांडेश्‍वरी मंदिराजवळ भरधाव पिकअपची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, एक जखमी

औंढा नागनाथ शिवारात खांडेश्‍वर देवीच्या मंदिरा जवळ भरधाव पिकअपची दुचाकीस धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी ता. १५ दुपारी घडली आहे. गंभीर जखमींवर औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथील नवनाथ कऱ्हाळे…

Read More

महापालिकेत आत्मे दिसतात, तिथे मुडदे गाढले जायचे:पालिकेचे ग्रहण सुटण्यासाठी इमारत बदला, मंत्री संजय शिरसाट यांचे अजब विधान

छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी महापालिकेच्या इमारतीबाबत केलेल्या एका अजब आणि खळबळजनक विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. “ज्या जागेवर महापालिकेची इमारत उभी आहे, तिथे पूर्वी मुडदे गाढले जायचे. हा कब्रस्तानचा भाग असल्याने तिथे आत्मे फिरतात आणि त्यामुळेच तुम्ही बेचैन होता,” असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी यांनी केले आहे. या विधानामुळे…

Read More

महापालिकेतच चोरी:स्थायी समिती सभागृहातून नगरसेविकेच्या पर्समधून 20 हजार लंपास; पालिका भवनातच चोरीचा धक्कादायक प्रकार

शहरातील सार्वजनिक ठिकाणी चोरीच्या घटना वारंवार घडत असताना आता थेट मुंबई महापालिकेच्या इमारतीतच चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात एका नगरसेविकेच्या पर्समधून 20 हजार रुपये चोरीला गेल्याने प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही घटना वार्ड क्रमांक 56 मधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका लक्ष्मी भाटिया यांच्या बाबतीत घडली आहे. त्या…

Read More

आदित्य ठाकरेंनी कार्याध्यक्षपदी निवड होण्याची चर्चा फेटाळली:म्हणाले – प्रस्तुत बातमीत काहीही तथ्य नाही, अशी कुठलीही चर्चा पक्षात नाही

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड होण्यासंबंधीची बातमी जोरकसपणे फेटाळून लावली आहे. प्रस्तुत बातमीत काहीही तथ्य नाही, अशी कोणतीही चर्चा सध्या पक्षात सुरू नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे राज्याच्या राजकारणात ठाकरे गटातील नेतृत्व परिवर्तनाविषयी सुरू झालेल्या चर्चेवर पडदा पडला आहे. गत काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात…

Read More