Headlines

Gokul Gite Decision Looms; Vidhan Parishad Election Jitters for Mahayuti

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महायुतीसमोरील राजकीय अडचणी कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहेत. राज्यसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांना उमेदवारी न मिळाल्याने निर्माण झालेली चर्चा अद्याप थांबलेली नसतानाच आता नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर नेते गोकुळ गीत . नाशिकमध्ये भाजपलाच भाजपचे आव्हान नाशिक पदवीधर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत गोकुळ गीते यांनी स्वतःचा प्रभाव निर्माण…

Read More

सरकारने कर्जमाफी करताना जाचक निकष लावून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली:खुडसरगावचे शेतकरी आक्रमक, फसव्या कर्जमाफीचा निषेध

सत्ता मिळवण्यासाठी २०२४ च्या निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांना ‘सरसकट कर्जमाफी’चे आश्वासन दिले होते. मात्र, सत्ता आल्यानंतर शासनाने कर्जमाफी करताना अनेक जाचक निकष लावून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सरकारचे हे धोरण म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा करणारा प्रकार असून, सरकारने दिलेले आश्वासन तात्काळ पूर्ण करावे, अशी मागणी राहुरी तालुक्यातील खुडसरगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे. आज खुडसरगाव येथे…

Read More

वेरूळ घाटात अपघात:दोन वाहनांची समोरासमोर भीषण धडक, दोन जण गंभीर जखमी

वेरूळ मार्गावरील धोकादायक मानल्या जाणाऱ्या वेरूळ घाटात रविवारी सकाळी कार आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांच्या तत्परतेमुळे जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास एमएच २० जीएक्स ६३७१ क्रमांकाची होंडा मोटारसायकल खुलताबादहून…

Read More

पोलिस अधिकाऱ्याने निवृत्तीनंतर घोटी येथे पिकवले "मियाझाकी'' आंबे:4 वर्षांत 8 किलो उत्पादन‎, भारतात किलोला 2 लाख रुपयांचा भाव

स्थानिक गुन्हे शाखेतून निवृत्त झालेले आणि मूळचे‎नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील असलेले किसन‎‎नजन पाटील यांनी आपल्या चार‎‎वर्षांच्या अथक मेहनतीतून‎‎जपानमधील अत्यंत दुर्मिळ‎‎मानला जाणारा “मियाझाकी”‎‎आंबा घोटी येथील मातीत‎‎यशस्वीपणे पिकवला आहे.‎‎पहिल्याच बहारात त्यांनी तब्बल‎‎८ किलो आंब्यांचे यशस्वी‎उत्पादन घेतले असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या‎आंब्याला प्रति किलो ३ लाख रुपयांपर्यंतचा उच्चांकी‎भाव मिळतो. भारतात याला दीड ते दोन लाख रुपये‎किलोचा भाव मिळतो.‎ निवृत्तीनंतर…

Read More

ताशी 30-40 किमी वेगाने वाऱ्यासह छत्रपती संभाजीनगरात पावसाची शक्यता:मान्सूनपूर्व हालचाली आणि वातावरणातील अस्थिरतेमुळे हवामानात बदल

उन्हाच्या तीव्र झळांनी त्रस्त असलेल्या संभाजीनगरकरांसाठी आजचा दिवस हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ८ जून रोजी शहरात पाऊस पडण्याची शक्यता असून, ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील. सोमवारी शहराचे कमाल तापमान ४० अंश सेल्सियस तर किमान तापमान २४ अंश सेल्सियस राहण्याचा अंदाज आहे. दुपारनंतर आकाशात ढग दाटून येतील आणि…

Read More

अमळनेरकर महाराज संघाच्या 8 व्या‎पारायणात 3,500 भाविक सहभागी‎:6 समित्यांच्या माध्यमातून 200 स्वयंसेवक कार्यरत, 10 लाख खर्च‎

अधिकमासानिमित्त आयोजित ८‎दिवसांच्या कथा, अखंड हरिनाम‎सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण‎सोहळ्याने शहरात एका‎आध्यात्मिक पर्वाची अनुभूती दिली‎आहे. अमळनेरच्या सखाराम‎महाराजांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या‎या उपक्रमात तब्बल ३,५०० भाविक‎एकाच मंडपाखाली बसून‎ज्ञानेश्वरीचे पारायण करत आहेत.‎या आयोजनासाठी महिनाभरापासून‎आयोजकांची तयारी सुरू होती.‎पारायणासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथ थेट‎गोरखपूरहून मागवले आहेत.‎ सुमारे १५०० भक्तांचा परिवार‎असलेला हा संप्रदाय आहे.‎अमळनेरकर महाराज सेवा संघाच्या‎वतीने आयोजित केलेला हा आठवा‎मोठा कार्यक्रम आहे. या‎सप्ताहादरम्यान…

Read More

जागतिक पोहे दिवस:नागपूरमध्ये 3 हजार किलो तर्री पोह्याचा विक्रम, इंदूरमध्येही अनेक कार्यक्रम

जागतिक पोहे दिनानिमित्त नागपूर आणि इंदूरमध्ये अनेक कार्यक्रम झाले. नागपूरमध्ये शेफ विष्णू मनोहर यांनी सुमारे ३,००० किलो तर्री पोहे तयार करून १० हजारांवर लोकांना मोफत वाटले. हा त्यांचा जागतिक विक्रम ठरला आहे. या उपक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये झाली. वर्ल्ड रेकॉर्ड समन्वयक रेणू जामदार यांच्या हस्ते विष्णू मनोहर यांना विक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात…

Read More

जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीचा ‘सहकार’:निष्ठावंतांच्या हाती सतरंज्या, आजी-माजी आमदारांच्या 9 पाल्यांसह 5 लोकप्रतिनिधी प्रथमच निवडणुकीत

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक पारंपरिकदृष्ट्या कार्यकर्त्यांची निवडणूक मानली जाते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना डावलून दिग्गज नेते, त्यांची मुले-मुली, भाऊ आणि इतर कुटुंबीयांनाच अधिक संधी दिली जात असल्याचे चित्र आहे. विधानसभा, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांप्रमाणेच आता सहकार क्षेत्रातही घराणेशाहीचा शिरकाव झाल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. जिल्हा बँक निवडणुकीचा सध्या जोरदार धुरळा उडाला आहे….

Read More

समृद्धी महामार्गावर कार पुलावरून‎ कोसळली:दोघे जागीच ठार‎, खडकनारळा डोणगावजवळ घडलेली घटना‎

शिर्डीहून छत्रपती संभाजीनगरकडे ‎‎भरधाव जाणाऱ्या कारचालकाचे ‎‎नियंत्रण सुटल्याने कार समृद्धी‎महामार्ग चॅनल क्रमांक ५६-५७‎मधील समृद्धी महामार्गावरून थेट ‎‎पुलाखाली जाऊन पडली. यात मुंबई ‎‎येथील दोन जण ठार, तर पाच जण‎गंभीर जखमी झाले.‎ ही घटना शिल्लेगाव पोलिस‎ठाण्याच्या हद्दीतील खडकनारळा‎डोणगावजवळील समृद्धी मार्गाच्या‎पुलाखाली रविवारी सकाळी घडली.‎ या घटनेत हुमेरा मोहसीन शेख‎(३१, रा. कल्याण) व हरिम जुनेद‎अहमद (८, रा. ठाणे मुंबई)…

Read More

भागवत शास्त्र आपल्या मनातील मृत्यूची भीती नाहीशी करते:त्याचे वाचन गरजेचे, न्हावी येथील भागवत कथेत राहुल भोळे यांचे निरूपण‎

भागवत शास्त्र हे माणसाच्या मनातील मृत्यूची भीती नाहीशी करणारे श्रेष्ठ शास्त्र आहे, असे निरूपण सावरगावकर राहुल महाराज भोळे यांनी केले. येथील सद्गुरु नारायणनाथ मंदिरामध्ये अधिक मासाचे (पुरुषोत्तम मास) औचित्य साधून आयोजित श्रीमद् भागवत पुराण कथा वाचन व गीता पारायण सोहळ्यात ते बोलत होते. कथेचे वाचन करताना भोळे यांनी सांगितले की, अभिमन्यू पुत्र राजा परीक्षित याला…

Read More