Headlines

पालकमंत्र्यांनी विरोधकांना गोंजारले,‎मतांसाठी आघाडीतील नेत्यांच्या घरी‎:राष्ट्रवादीचे आमदार नारायण पाटील यांच्याशी जेऊर येथे गुप्तगू‎

जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुका एकमेव असा आहे, की नवे जुने भाजपचे नेते कार्यकर्ते एक दिलाने काम करत आहेत. भाजप पक्षासाठी मोहोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये विश्वासू ,निष्ठावंत नेत्याची गरज होती. ती आता माजी आमदार राजन पाटील यांच्या माध्यमातून मिळाली. त्यांनी काहीच मागितले नाही. परंतु येणाऱ्या पुढील काळामध्ये ते आमच्या मांडीला मांडी लावून बसलेले तुम्हा सर्वांना दिसतील. त्याचबरोबर विधान…

Read More

कवठा कडू आमसभेत गोंधळ; आरोपांनी तापले वातावरण:ग्रामस्थांचा सत्ताधाऱ्यांवर भडीमार, उत्तरांअभावी संताप अनावर

तालुक्यातील कवठा कडू ग्रामपंचायतीच्या ५ जून रोजी आयोजित आमसभेत विविध विकासकामांतील कथित गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून मोठा गोंधळ उडाला. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत जाब विचारला. मात्र, अनेक प्रश्नांना स . ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावात प्रत्यक्षात एकच सार्वजनिक शौचालय असताना ग्रामपंचायतीच्या नोंदीत तीन सार्वजनिक शौचालये दाखवल्याचा आरोप केला. घनकचरा व्यवस्थापनासाठी मशीन खरेदीसाठी खर्च…

Read More

Hingoli Police Lodge FIR: 19.99 Lakhs Turmeric Theft

हिंगोली शहरालगत लिंबाळा औद्योगिक वसाहतीमधून चोरट्यांनी गोदामाचे शटर वाकवून 19.99 लाख रुपये किंमतीचे 353 कट्टे हळदीचे पोते चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली असून या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात रविवारी ता. 7 गुन्हा दाखल झाला आहे. . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरालगत औद्योगिक वसाहतीमध्ये स्टार ॲग्रोवेअर हाऊसिंग मॅनेजमेंट कंपनीचे गोदाम आहे. या ठिकाणी शेतकरी तसेच कंपनीचा…

Read More

ओबीसी समाज एकवटल्यास सत्ताधाऱ्यांना घरी बसावे लागेल:तुमचा DNA OBC चा असेल तर आरक्षण वाचवा, लक्ष्मण हाकेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या वातावरण चांगलेच तापले असून, ओबीसींना मिळणाऱ्या सर्व सोयी-सुविधा मराठा समाजालाही लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. एकीकडे मनोज जरांगे हे मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे यासाठी सातत्याने आंदोलने करत आहेत, तर दुसरीकडे यामुळे मूळ ओबीसींवर अन्याय होईल अशी ठाम भूमिका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याकडून…

Read More

नाशिक TCS धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा:हो, मीच दिले नमाजचे ट्रेनिंग; मुख्य आरोपी निदा खानची तपास यंत्रणांसमोर कबुली

नाशिक येथील नामांकित टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ आणि सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला पोलिसांनी अटक केल्यानंतर, पोलिस कोठडीतील चौकशीदरम्यान तिने अत्यंत धक्कादायक कबुली दिली आहे. “होय, मीच पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचे रीतसर ट्रेनिंग दिले,” अशी कबुली तिने दिली आहे. या…

Read More

तटकरे विरुद्ध रोहित पवार वाद पेटला!:वर्षा बंगल्याचे उंबरठे कोणी झिजवले, सगळी माहिती माझ्याकडे; सुनील तटकरेंचा थेट इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यातील राजकीय शीतयुद्ध आता पूर्णपणे चव्हाट्यावर आले आहे. अनिकेत तटकरे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर आयोजित बैठकीनंतर सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रोहित पवार आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत बोचऱ्या आणि परखड शब्दांत…

Read More

बळीराजाची चिंता वाढली:15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी, घाईघाईने पेरणी न करण्याचे प्रशासनाचे आवाहन

राज्यातील बळीराजा ज्या मान्सूनच्या पावसाची चातकासारखी वाट पाहत आहे, त्याबाबत आता एक चिंताजनक वृत्त समोर आले आहे. मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असला, तरी किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर आणि मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावण्याची शक्यता हवामान खात्याच्या सध्याच्या अंदाजावरून वर्तवण्यात आली आहे. परिणामी, आगामी आठवडाभरात राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता अत्यंत कमी…

Read More

मोदी सरकारने महागाईचे 'अच्छे दिन' आणले:नाराज होऊन 2-3 दिवस गावी जाण्याशिवाय शिंदेंकडे पर्याय नाही, भाजप-शिंदे गटात फक्त आडवा अन् जिरवा सुरू- अंबादास दानवे

देशात ‘अच्छे दिन’चे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारने प्रत्यक्षात मात्र महागाईचेच अच्छे दिन आणले असून, यामुळे सामान्य जनता होरपळून निघाली आहे, असे म्हणत उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. छत्रपती संभाजीनगरात वाढत्या महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात आयोजित ‘जनआक्रोश आंदोलना’दरम्यान ते माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी गॅस सिलिंडर डोक्यावर घेऊन छत्रपती शिवाजी…

Read More

परतवाडा सेक्स स्कँडल:पोलिसांच्या भूमिकेवर हिंदू संघटनांचे गंभीर आरोप; नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या अहवालातून धक्कादायक वस्तुस्थिती समोर

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-अचलपूर लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणात पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक हिंदू संघटनांनी पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा थेट आरोप केला आहे. ‘नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स, विदर्भ’च्या सत्यशोधन समितीच्या अहवालात हे आरोप आणि वस्तुस्थिती स्पष्टपणे मांडण्यात आली आहे. या अहवालानुसार, मुख्य आरोपी अयान अहमद आणि त्याच्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतरही पोलिसांकडून गुन्ह्याची…

Read More

"भाई आया रे गॅस सिलिंडर’ गीत वाजणार:जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आदेश, सुरक्षित वापराची सवय लागणार‎

घरगुती गॅस सिलिंडरच्या सुरक्षित वापराबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात एक स्तुत्य पाऊल उचलण्यात आले आहे. यापुढे जिल्ह्यातील सर्व गॅस वितरण वाहनांवर (डिलिव्हरी व्हॅन्स) “भाई आया रे गॅस सिलिंडर’ हे विशेष सुरक्षा गीत अनिवार्यपणे वाजवले जाणार आहे. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी भारत पेट्रोलियम (बीपीसीएल), हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल) आणि इंडियन ऑईल (आयओसीएल) च्या…

Read More